अस्मिता एक सॉफ्टवेअर इंजिनीर शिक्षण पूर्ण झाल्यावर सगळ्या आई वडिलांप्रमाणे तिचे ही आई वडील लग्नासाठी मागे लागले पण तिला जॉब करायचा होता स्वतःच्या पायावर उभ राहायचं होत.पण घरचे काही जॉब साठी जाऊ देईना तिला. मग तिने पुढे शिकायचं ठरवलं. पण घरच्यांचा लग्नावरच जोर होता. तिच्या आणि तिच्या वडिलांमध्ये पैंज लागली होती. तु कर तुझ्या entrance exam ची तयारी तोवर मी तुझं लग्न ठरवितो कि नाही बघच.
लग्नासाठी ऑनलाईन मॅट्रिमोनी साईट वर प्रोफाइल बनविलेला होता तिने. तिचे वडील मुलांचे प्रोफाइल बघून घेत तिच्याबरोबर बसून. सगळं पटलं तर कुंडली डिटेल्स बघायचे.दुसरीही स्तळं आली कि कुंडली जुळवायची, ती जुळली कि "बघायचा प्रोग्राम " व्हायचा.असे दोन तीन प्रोग्राम झाले. हे सगळं तिला पटत नव्हतेच, फक्त बघण्यावरून कस कुणी कुणाशी लग्न करू शकतो?लग्न कराव तर समोरच्याशी मन मोकळ बोलून... 2-4 गाठी भेटी करून असं तीच मत होत. त्यातच तिला अमेयचा इंटरेस्ट आला ऑनलाईन मॅट्रिमोनी साईट वरून. तिने प्रोफाइल चेक केला, मुलगा हँडसम होता शिवाय फॉरीन ला जॉब करणारा तिने त्याच्याबद्दल अजून माहिती मिळावी म्हणुन दुसऱ्या सोशल साईट्सवर चेक करायला सुरुवात केली. ती चेक करतच होती तर लगेच अमेयची तिथे पण तिला फ्रेंडरीक्वेस्ट आली आणि तिनेही ती एकसेप्ट केली.आणि मग त्यांची बोलणी चालू झाली.
त्यांनी आपापल्या घरी सुद्धा हे सांगितलं.घरच्यांनी लगेच कुंडली डिटेल्स घेतली. कुंडली जुळे पर्यंत यांची बोलणी चालूच होती फोनवर... तुझ्या अपेक्षा माझ्या अपेक्षा वगैरे वगैरे...
योगायोगाने कुंडली पन जुळली. जुळायचं असल कि सगळंच जुळून येत म्हणतात न ते असं. पण अस्मिता ला कुठे तरी वाटत होत हे काही वर्कआऊट होणार नाही आपण आपल्या स्टडी वर फोकस करायला हवा. याला कारण ही तसेच होत.मुलगा हँडसम, फॉरीनला जॉब करणारा आणि खूपच गोरापान होता..आणि आपला रंग काळासावळा आपण कसे बर चालणार त्याला.आजकाल सगळ्याच मुलांना गोऱ्यापान मुली हव्या असतात. तिने स्पष्ट तसें अमेयला पण सांगितले. पण तो म्हणाला मला कलर सोबत काय घेणं देण नाही.मला बायको स्वभावाने चांगली हवी.आणि मला जशी होऊ तशीच आहेस तू. त्याने त्याच्या घरच्यांना माझ्या घरच्यांसोबत बोलणी करायला लावली.बोलणी झाली मग बघायचा प्रोग्राम ठरला. त्यांची फोनवर बोलणी चालूच होती.तुझे घरचे काय म्हणाले माझे घरचे काय.फोटो तसे बघितले होतेच सोशल साईट वर तरी लेटेस्ट फोटो सेन्ड करन, सेल्फी सेन्ड करन, विडिओ कॉल वगैरे वगैरे चालू च होता. फोटो घरच्यांना पण दाखवत होते दोघ. सगळं असं स्वप्नवत वाटत होत.
बघण्याचा प्रोग्राम झाला.अमेयचे वडील डॉक्टर होते, घरचे सुशिक्षित होते. परिस्थिती जेमतेम असली तरी माणुसकी धरून होते. अस्मिताचे वडील बागायतदार होते. तिला कधी कसलीच कमी जाणवली नाही तिच्या घरी. आमची बोलणी चालूय हे अस्मिताच्या वडिलांना माहित होते.त्यांना वाटलं आमची मन जुळली आहे मग बाकीचा विचार काय करायचा.मन जुळली कि सगळं जुळून येत असं त्यांचं मत.पण आईला मुलगा प्रत्यक्ष बघितला कि पूढची बोलणी करू असं मत. आणि अमेयच्या वडिलांचे मत असं कि ते खूप मोठी लोक आपल्या तोलामोलाची नाही. आणि आईच मत असं कि मुलगी काळीसावळी तुला शोभणार नाही.
आम्ही आमच्या घरच्यांचे विचार एकमेकांना सांगितले.मग माझं मत असे कि आई वडील आपल्याच भल्याचा विचार करतात.तुझे घरचे नसतील रेडी तर इट्स ओके आपण इथेच थांबवू हे सगळ.या उलट त्याचे म्हणणं असे कि मी समजावेल त्यांना तू नको टेन्शन घेऊ.तुम्ही लग्नाची तारीख काढा.अस्मिता शॉक च झाली अरे अजून आपण एकमेकांना बघितलं पण नाही आणि लग्नाची तारीख कशी काढा म्हणतोयस तू. अमेय म्हणाला बघतो की रोजच बघतो. मला जशी बायको हवी होती तशी तू परफेक्ट आहेस.
अस्मिता बोलली कि तू ये इंडिया ला प्रत्यक्ष भेटू आपण मग ठरवू पुढचं.कधी येणारयेस तू बोल.
अमेय म्हणाला मला एवढ्यात नाही ग येता येणार मी नुकताच आलोय. लग्नाच्या तारखा कोणत्या महिन्यात आहे ते सांग मी त्या महिन्यात येतो लगेच आपण लग्न करू.आणि इकडे येऊ मला जास्त थांबता पण नाही येणार.
हे सगळं विश्वास न बसण्यासारखच होत तिच्यासाठी.त्याच दरम्यात अस्मिता ने एंट्रन्स क्लिअर केली होती आणि ती पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाणार होती.पण त्या आधी अमेयला प्रॉमिस हवं होत की तू दुसऱ्या मुलांची स्तळं बघणार नाहीस.
यावर ती म्हणाली अरे हे माझ्या हातात नाही. ते माझे घरचे ठरवतील .तो म्हणाला मी बोलतो तुझ्या घरच्यांशी आणि त्याने खरंच घरातल्या सगळ्यांशी बोलणी केली. अगदी आजी सोबात सुद्धा त्याचा स्वभाव होताच तसा तो कुणालाही आपल्या बोलण्याने जिंकुन घ्यायचा आणि तेच झाल सगळ्यांना तो आवडला.
ही गोष्ट पचायला थोडी जडच होती की मुलगा मुलीने एकमेकांना प्रत्यक्ष न बघता लग्न ठरणं. त्यामुळंच कि काय या बद्दल बाकी नातेवाईकांमध्ये काहीही नाही कळवलं. लग्नाची तारीख नोव्हेंबर मध्ये आहे तेव्हा मुलगा आला की मग बघायचा प्रोग्राम होईल आणि मग पुढचं ठरवू तोवर विषय इथेच थांबवू अस ठरलं.
अस्मिता ला ही शंका वाटत होती तो आलाच नाही तर, हे सगळं खोटं असेल तर उगाच नंतर दुःखी होण्यापेक्षा आपला शिक्षण पूर्ण करू. मग पुढे काय होत. तो येतो कि नाही. ते बघूया पुढच्या भागात....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा