परित्याग
भाग २
भाग २
एक दिवस ती सासूबाई बरोबर देवळात गेली होती. तिथे एका बुवांचे प्रवचन चालू होते. ते म्हणत होते, “आपल्याला कोणी रागवले किंवा मारले तर आपल्याला त्रास का होतो? बघा विचार करा. जर आपण मनातून अस पक्क ठरवले तर आपल्याला त्रास होईल का? एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसली तर निग्रहाने आपण ती गोष्ट करत नाही. किंवा मनाविरूद्ध करतो आणि हळूहळू आपल्याला ते करण्याची इतकी सवय होते की आपण यांत्रिकपणे ती करतो. आनंद आणि दुःख हे आपल्या मानण्यात असते. एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद होतो म्हणजे काय होते? तर आपल्या मनाला चांगले वाटते. आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर आपल्याला दुःख होते कारण आपल्याला ते आवडत नाही. ही आवड आपल्या मनावर अवलंबून असते आणि त्यासाठी आपले मन आपल्या ताब्यात असावे लागते. हे सगळे एकदम एकाएकी होत नाही. त्यासाठी खूप तपस्या करावी लागते. आणि गुरू शिवाय ह्या गोष्टी शक्यही होत नाहीत. त्यासाठी योग्य गुरू मिळणे आवश्यक आहे. म्हणून भक्ती मार्ग सोपा मार्ग माऊलींनी सांगितला. मग अगदी आपल्या नावडीची गोष्ट करताना भगवंताचे नामस्मरण करायला काय हरकत आहे? नामस्मरणाने आपल्याला खूप गोष्टी साध्य होतात.” ते बोलत होते, इतक्यात सासूबाईंनी तिला घरी जाण्यासाठी बोलावले. पण जे ऐकले त्याचा परिणाम वैभवीच्या मनावर झाला.
त्यादिवशी त्या बुवांचे प्रवचन ऐकले आणि वैभवी विचार करू लागली. तशी ती फार शिकलेली नव्हती, पण तिचे आजोबा आणि बाबा कायम निरनिराळे अभंग गात असत, त्यामुळे तिला लहानपणापासून अभंगाची गोडी होती. त्या बाबांच्या किर्तनामुळे ती परत जागी झाली. ती आजोबा बाबांनी गायलेले अभंग आळवू लागली. काम करताना हरीनाम घेऊ लागली.
हेचि थोर भक्ति आवडते देवा ।
संकल्पावी माया संसाराची।।
ठेविले अनंते तैसेची रहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ।।धृ।।
वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ ।
भोगणे ते फळ संचिताचे ।।
तुका म्हणे घालू तयावरी भार ।
वाहू हा संसार देवापायी ।।
हळूहळू ह्या अभंगाचे सार तिच्या लक्षात आले. “भक्ती करणे म्हणजे नुसते नामस्मरण करणे नाही. नामस्मरणाने मन शुद्ध होते, शांत होते. आपल्या जवळचे सगळे भगवंताच्या चरणी अर्पण करणे. आपण केलेले कामही त्याच्या चरणी अर्पण करावे आपले सुखदुःख सुद्धा त्याच्याच चरणी घालावे. कारण तोच सर्व नियंता आहे. तो आपल्या दुःखाचे हरण करतो.” तिच्या आजोबांनी तिला सांगितलेले तिला आठवले. तिने आता अगदी मनापासून नामस्मरण करायला सुरवात केली.
जशी जशी ती नामस्मरणाचा आणि परमेश्रर चरणी लीन होऊ लागली, तसा तिच्यात बदल होऊ लागला. आधी ती कुणी रागावले, मारले तर तिला दुःख होई, ती रडत राही. आपलेच नशीब खोटे म्हणून ती नशिबाला दोष देत रहात असे. “बाकी सगळे सुखात असताना माझ्याच वाटेला हे दुःख का?” हे असे प्रश्न तिच्या मनात येत असत. आता ती आपल्या मनाला सांगत असे, “ हे तुझ्या कर्माचे फळ आहे. मागच्या जन्मी तू काय कर्म केलेस हे तुला आठवते का? कुणाला उपाशी ठेवले की कुणाला डाग दिलेस? आठवत नाही ना, पण त्याचे फळ तर तुला भोगावे लागणारच ना?” ती तिच्या मनाला भावनांना काबूत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. दिवाळीच्या सणाला आईने दिलेली नवी साडी सासूबाईंनी काढून घेतली तर इतके वाईट वाटले होते तिला. “मला दिलीय” इतकेच बोलल्यावर तिला मार खावा लागला होता. तिच्या बांगड्या काढून घेतल्या तेव्हाही तिला खूप दुःख झाले होते. पण आता काही झाले तरी तिला वाईट वाटत नसे. ती म्हणे,
“असे काय माझे इथे नारायणा
देहही तुझा, देवा नारायणा”
हेचि थोर भक्ति आवडते देवा ।
संकल्पावी माया संसाराची।।
ठेविले अनंते तैसेची रहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ।।धृ।।
वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ ।
भोगणे ते फळ संचिताचे ।।
तुका म्हणे घालू तयावरी भार ।
वाहू हा संसार देवापायी ।।
हळूहळू ह्या अभंगाचे सार तिच्या लक्षात आले. “भक्ती करणे म्हणजे नुसते नामस्मरण करणे नाही. नामस्मरणाने मन शुद्ध होते, शांत होते. आपल्या जवळचे सगळे भगवंताच्या चरणी अर्पण करणे. आपण केलेले कामही त्याच्या चरणी अर्पण करावे आपले सुखदुःख सुद्धा त्याच्याच चरणी घालावे. कारण तोच सर्व नियंता आहे. तो आपल्या दुःखाचे हरण करतो.” तिच्या आजोबांनी तिला सांगितलेले तिला आठवले. तिने आता अगदी मनापासून नामस्मरण करायला सुरवात केली.
जशी जशी ती नामस्मरणाचा आणि परमेश्रर चरणी लीन होऊ लागली, तसा तिच्यात बदल होऊ लागला. आधी ती कुणी रागावले, मारले तर तिला दुःख होई, ती रडत राही. आपलेच नशीब खोटे म्हणून ती नशिबाला दोष देत रहात असे. “बाकी सगळे सुखात असताना माझ्याच वाटेला हे दुःख का?” हे असे प्रश्न तिच्या मनात येत असत. आता ती आपल्या मनाला सांगत असे, “ हे तुझ्या कर्माचे फळ आहे. मागच्या जन्मी तू काय कर्म केलेस हे तुला आठवते का? कुणाला उपाशी ठेवले की कुणाला डाग दिलेस? आठवत नाही ना, पण त्याचे फळ तर तुला भोगावे लागणारच ना?” ती तिच्या मनाला भावनांना काबूत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. दिवाळीच्या सणाला आईने दिलेली नवी साडी सासूबाईंनी काढून घेतली तर इतके वाईट वाटले होते तिला. “मला दिलीय” इतकेच बोलल्यावर तिला मार खावा लागला होता. तिच्या बांगड्या काढून घेतल्या तेव्हाही तिला खूप दुःख झाले होते. पण आता काही झाले तरी तिला वाईट वाटत नसे. ती म्हणे,
“असे काय माझे इथे नारायणा
देहही तुझा, देवा नारायणा”
क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा