"सागर प्रितीचा कॉल आहे." अंघोळ करत असतांना आईचा आवाज सागरच्या कानावर पडला. तोच त्याने घाईघाईत आंघोळ आटोपती घेतली. लवकर तयारी करून घराच्या बाहेर केंव्हा पडतो व केंव्हा प्रितीला कॉल करतो असं त्याला वाटत होतं. आईने नाष्टा करण्याचा आग्रह केला. पण नाष्टा न करताच तो घराच्या बाहेर पडला. थोड्या अंतरावर जाताच प्रितीला कॉल केला. पण प्रितीने कॉल रिसिव्ह केला नाही. पुन्हा कॉल करू की नाही ? या विचारातच त्याने पुन्हा कॉल केला. पण यावेळेही प्रितीने कॉल रिसिव्ह केला नाही. आता मात्र सागर अपसेट झाला. "आपण त्याच वेळी अंघोळीला का गेलो ? आधी किंवा नंतर आंघोळ केली असती तर काय फरक पडला असता ? निदान प्रिती सोबत बोलायला तरी मिळाले असते. आता ती केव्हा कॉल करते अन केव्हा नाही." असं त्याच्या मनात सारखं येतं होतं. आता त्याला आंघोळ करण्याचा देखील पश्चताप होत होता. तोच त्याला प्रितीचा कॉल आला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा