प्रज्ञा बो-हाडे : प्रज्ञावान लेखिका
मंद वारा सुटला होता.वा-याच्या झुळकेने झाडांची पाने सळसळत होती.धुके सर्वत्र पसरले होते.त्याची पखरण सतत सुरु होती.पाखरांची किलबिलाट सुरु होती.प्रसन्न पहाट उगवली होती.सुर्यकिरणांचा कवडसा डोकावून पहात होता.चमचमणारी सुर्यकिरणे दवबिंदूची चकाकी वाढवत होती.बागबगीच्यात फुलांचे ताटवे सजले होते.गुलाब आपली नजाकत वाढवत होता.मोग-याचा सुंगध मनमोहक होता.सोनचाफा आपली अत्तराची कुपी खोलत होता.जाई , जुई , अबोली आपल्या रसरशीत फुलांनी सज्ज होत्या.निसर्ग असा आपले सौंदर्य खुलवत होता कारण आज ईराच्या आदरणीय लेखिका प्रज्ञा तांबे बो-हाडे यांचा वाढदिवस होता.
शब्दांवर प्रभुत्व ठेवणे , त्यांना आपलेसे करणे , त्यांना प्रेम देणं , त्यांचा आदर करणं , त्यांच्यावर निर्विकार भावनेने संस्कार करणं हे ज्याला जमते त्यांला शब्द मानाचा मुजरा करतात. हेच शब्द कथा , कविता , चारोळी यामध्ये बरसतात तेंव्हा लेखणी समृद्ध होते आणि वाचक सुखावून जातो.लेखकांची लेखणी हे काम नित्य नियमाने करत आली आहे.मनाच्या तरल भावना लेखणीत गुंफताना त्यांना कशाचेच भान नसते.लेखणास असुरलेली लेखणी सदा उत्साहाने बहरलेली असते.अशीच शब्दांने सजलेली लेखणी आदरणीय प्रज्ञा तांबे बो-हाडे यांची आहे.
प्रज्ञाजींच्या लिखाणात वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता आहे.ईराच्या व्यासपीठावारील त्यांचे कसदार लेखन त्यांच्या लेखणीत किती मार्मिकता आहे दाखविते.लेखणातील सातत्य हे त्या लेखकाचे लिखाणातील प्रभाव दर्शवते.अनेक आव्हानांना जेंव्हा सकसतेने तुम्ही पाठलाग करता तेंव्हा यश तुमच्या जवळ येते.प्रज्ञाजींच्या लेखणात अंतःकरणातील सोज्वळता आहे.विषयाची हाताळणी करताना सखोल आणि स्पष्ट विश्लेषण करणे ही त्यांची खाशीयत आहे.ईरा व्यासपीठावर त्यांचा विचारांचा दर्जा उंचावत चालला आहे.प्रगल्भ लेखिकेच्या दिशेने त्यांची वाटचाल आणखी प्रेरणादायक होणार आहे.
ईरा व्यासपीठावर वैविध्यपूर्ण लेखन करताना वारसदार, आपली यारी लई भन्नाट हाय ,आपलेच दात आपलेच ओठ, साथ आपली शतजन्माची ,मी कशाला आरशात पाहू गं,तू तर माझी सावली, मातृत्व,अनोळखी दिशा,नियतिची परिभाषा, जगण्याला पंख फुटले, कस्तुरीचा सहवास तू ,घरोघरी मातीच्या चुली , घरकुल अशा कथा व कथामालिकातून त्यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. ईराच्या चॕम्पियन व इतर स्पर्धेतील त्यांचा सहभाग प्रेरक असतो. शृंगारीक वागणे त्यांना फार आवड असलेमुळे संस्कृतीचे जतन करणे त्यांना आवडते.एकमेकांत मिसळून रहाणे , आदर करणे , मदत करणे यामध्ये त्यांना ज्यादा स्वारस्य आहे.हसतमुखाने स्वागत करणे , मैत्रिणींच्यात गप्पा मारणे हा त्यांचा नित्याचा छंद आहे.या सगळ्या गुणांची ईराच्या संमेलनामध्ये प्रचिती आली.अशा या सोज्वळ,दिलदार, दिलखुलास लेखिकेचे पुढील आयुष्य आरोग्यसंपन्न व सुखदायक जावे हीच सदिच्छा ...!!