Login

प्रेम आणि संयम....भाग 3 अंतिम

प्रेम आणि संयम असेल तर नातं टिकवता येतं.
प्रेम आणि संयम...भाग 3 अंतिम

"मुलीसाठी लग्नानंतरची ही तिची प्रेम कथा ही एक सुंदर कल्पना असते, जिथे दोन व्यक्ती विवाहबंधनातून अधिक घट्ट नात्यात येतात आणि एकमेकांच्या सहवासात प्रेमाची नवी व्याख्या अनुभवतात."

एके दिवशी, समीरने अनघाला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी सरप्राईज देऊन आश्चर्यचकित केले. त्याने भारताच्या उत्तरेकडील एका सुंदर हिल स्टेशनवर रोमँटिक वीकेंडला जाण्याची योजना आखली होती.

ठरल्याप्रमाणे दोघेही निघाले.

ते हिरव्यागार डोंगरावरून चालत असताना, समीरने अनघाचा हात हातात घेतला आणि म्हणाला,

“मला माहित आहे आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाले आहे, पण मला असे वाटते की आपण कायमचे एकत्र आहोत. अनघा, तू मला आता पूर्ण कर.”

अनघाच्या डोळ्यात अश्रू तरळले,

“मलाही असेच वाटते, समीर तुम्ही माझा जिवलगा आहात  आणि मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही.”

त्या रात्री, ते शेताजवळ बसले असताना, समीरने एक छोटा डबा बाहेर काढला आणि म्हणाला,

“अनघा, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे.” त्याने एक सुंदर हिऱ्याची अंगठी उघडण्यासाठी बॉक्स उघडला.
आणि तिच्या पुढ्यात ठेवला.
अनघा आश्चर्यचकित होऊन म्हणाली,
“समीर, सुंदर आहे हे! पण का?”

समीरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला,
“मला माहित आहे की आपल्या आधीच लग्नाच्या अंगठीची देवाणघेवाण केली आहे, पण मला आपल्या एनिवर्सरीनिमित्त तुला काहीतरी खास द्यायचे होते. ही अंगठी माझ्या तुझ्यावरील प्रेमाचे प्रतीक आहे, अनघा. मी प्रेम करण्याचे वचन देतो आणि तुझा सदैव आदर करतो.”

अनघाने समीरला घट्ट मिठी मारली आणि कुजबुजली, “माझंही तुमच्यावर प्रेम आहे समीर, रोजच एखाद्या परीकथेसारखा वाटतो.”

त्या दिवसापासून समीर आणि अनघाने प्रत्येक दिवशी त्यांचे प्रेम साजरे करायचे ठरवले, मग ते एकत्र असोत किंवा वेगळे. त्यांची प्रेमकहाणी नुकतीच सुरू झाली आहे असे त्यांना वाटत होते आणि ते त्यांना पुढे कुठे घेऊन जाणार हे पाहण्यासाठी उत्सुक होते.

जसजसे वर्ष सरत गेले तसतसे समीर आणि अनघाचे प्रेम अधिकच घट्ट होत गेले.

अहिंसेने वागून सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आपल्या समाजात आजही घरेलू हिंसाला कितीतरी स्त्रीया बळी पडतात. घरगुती हिंसा सर्रास सुरूच आहे. कुणी बोलतं, कुणी बोलत नाही. अहिंसेचा मार्ग अवलंबला तर कितीतर तुटणारी नाती वाचतील. नातं जपता येईल. आज अनघा त्याच्याशी प्रेमाने वागली म्हणुन तिचा संसार वाचला, असाच प्रयत्न प्रत्येकाने केला तर समाजातील हिंसा कमी होईल. कुठेना कुठे या गोष्टीला आळा बसेल आणि संसार फुलतीलं.

समाप्त:

ऋतुजा वैरागडकर


******* माहेरून मागव — कथा
" तुपात छान परतव ते काजू बदाम. आणि लाडू बनवताना अखडता हात घेऊ नकोस. " आशाबाई आपल्या सुनेला रश्मीला सांगत होत्या." हो आई परतते. " असं म्हणत रश्मीने काजू बदाम तुपावर परतून घेतले. आणि ती अक्रोड तुपात टाकणार तोच आशाबाई म्हणाल्या, " अगं थांब. अक्रोड कशाला टाकतेस ? "" आई मला लाडुमध्ये अक्रोड आवडतात. म्हणून थोडे टाकतेय. " रश्मी म्हणाली." हे बघ, भ्रमात राहू नकोस. हे लाडू स्वातीसाठी बनवायला लावतेय मी. एवढं तूप आणि काजू बदाम तुझ्यावर का उधळू मी ? तुला हवं असेल तर तुझ्या माहेरून मागव. मी कशी देतेय माझ्या लेकीला ? " आशाबाईचं बोलणं ऐकून रश्मी उडालीच.रश्मी - प्रकाशच लग्न होऊन दोन वर्ष झाले होते. नोकरीनिमित्त रश्मी प्रकाश सोबत दुसऱ्या शहरात राहत होती. रश्मीला पाचवा महिना सुरू झाला आणि प्रकाशला कामानिमित्त बाहेर गावी दोन महिने जावं लागलं. रश्मीच्या माहेरी तिची आई नव्हती म्हणून बाळंतपण सासरी करायचं असं प्रकाशाने ठरवलं. त्यामुळे बाहेरगावी जाण्यापूर्वी त्याने आपल्या आई वडिलांकडे रश्मीला सोपवलं. प्रकाशचे वडील सुद्धा कामामुळे जास्त वेळी बाहेरच असायचे.घरी आल्यापासून आशाबाईंनी तिला कामाला लावलं होत. म्हणाल्या की, " काम करत राहिलीस की डिलिव्हरी नीट होईल. " रश्मी ऐकत गेली. आज मात्र सासूचा नवीन चेहरा समोर आला. तिला लक्षात येऊ लागलं की घरात फळ आली तरी परत दिसायची नाहीत. विचारलं तर म्हणायच्या " खराब होती, तर कधी बाजूची मुले आलेली त्यांना दिली. "जेवणात तूप पण नसायचं. तिच्या त्यावेळी सगळंच एकदम लक्षात आलं. तिला आता रडू आवरत नव्हतं. ती रूम मध्ये जाऊन रडली. तिच्या मनात कधी विचार सुद्धा आला नाही की सासूबाई असं वागतील. तिला प्रकाशला सर्व सांगावं वाटत होत पण कुठेतरी तो लांब आहे. त्याला टेन्शन नको म्हणून ती गप्प होती.त्यानंतर ती जेवढ्यास तेवढं वागू लागली. जेवणात तिला मन मारावं लागत होत. तिला कधी स्वतःच्या घरी परत जाते असं झालं होत. तिला सातवा महिना लागला तसं सर्वजण डोहाळे जेवण विषयी विचारू लागले. तेव्हा आशाबाई म्हणाल्या, " आमच्याकडे सुनेचं डोहाळे जेवण तिच्या माहेरी होत. सासरी नाही. "एक दिवस प्रकाश अचानक घरी आला. सर्वाना आनंद झाला पण प्रकाशच्या नजरेतून तिची रोडवलेली शरीरायष्टी सुटली नव्हती. प्रकाशला भेटायला गावातले काही लोकं, तसेच नातेवाईक सुद्धा आले होते. तेवढ्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.सर्वजण बाहेर बघत होते. रश्मीचे बाबा, भाऊ आणि आत्या आत आल्या. त्यांना पाहून रश्मी आणि प्रकाशला आनंद झाला. प्रकाशाने त्यांना बसायला सांगितलं." अचानक कसं येणं केलं बाबा ? नाही म्हणजे फोन वगैरे नाही केलात म्हणून विचारलं." प्रकाशने विचारलं" रश्मीला न्यायला आलोय. " रश्मीचे बाबा म्हणाले." अहो बाबा पण डोहाळे जेवण झालं की नेणारच आहात ना ? मग आता कशाला ? " प्रकाश आणि सासरे एकदम म्हणाले." पण तुमच्यात तर सुनेचे डोहाळे जेवण करत नाहीत ना ? म्हणून म्हणल, मुलीचं पहिलं बाळांतपण आहे. काही हौस नको राहायला म्हणून तर तिकडे सर्व तयारी करायला सांगूनच आलोय. " रश्मीचे वडील." कोण म्हणाल तुम्हांला ? की आमच्याकडे सुनेचे डोहाळे जेवण होत नाही म्हणून ? आधी पासूनच अशी प्रथा आहे ना ? की सुनेचे डोहाळे जेवण सासरी होत आणि मग सून तिच्या माहेरी बाळांतपणासाठी जाते. " प्रकाशचे वडील म्हणाले." अहो, माझ्या नणंदबाई तुमच्या नात्यातच लागतात. पंधरा दिवसांपूर्वी इकडे येणं झालं त्यांचं, तेव्हा त्यांनी आशाबाईंना डोहाळे जेवणाचं विचारलं तेव्हा त्याचं म्हणाल्या. 'आमच्याकडे सुनेचं डोहाळे जेवण नाही होत म्हणून.' माझी वहिनी नसली तरी माझ्या भाचीच डोहाळे जेवण करायचं म्हणून मी माझी शेतातली कामे सोडून आलीये. " यावेळी रश्मीची आत्या म्हणाली." काय ओ ? हे काय ऐकतोय आम्ही ? सुनेचं डोहाळे जेवण आपल्याकडे होत नाही ? हे कधीपासून सुरू झालं ? " प्रकाशच्या वडिलांच्या आवाजात कडकपणा होता." नाही तसं नाही... ते तिला जास्त लोकं आले तर त्रास होईल म्हणून म्हणाले मी. " आशाबाई सारवासराव करत होत्या.एवढ्या वेळी गप्प बसलेली रश्मी शेवटी बोललीच, " बाबा, आत्या मला तुमच्यासोबत यायचं आहे. मला घेऊन चला. "रश्मीच बोलणं ऐकून सर्वजण तिच्याकडे बघू लागले. पूर्ण वाचा लिंकवर https://irablogging.com/blog/maherun-magav_44746
0

🎭 Series Post

View all