रात पुनवेची आली भाग 16
मागील भागात आपण पाहिले दौलती लग्न करायला नकार देतो . सखू म्हातारबा पाटलांना काही गोष्टी सांगते . दौलती काशीसोबत पळून जायचे ठरवतो . आता पाहूया पुढे.
सखुचे बोलणे आठवून म्हातारबा पाटलांना राग येत होता . आजपर्यंत त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा . आज त्यांच्या लाडक्या दौलती आज त्यांचा शब्द धुडकावून लावत होता . यामागचे कारण एक मुलगी असल्याने त्यांना काहीही करून तिचा शोध घ्यायचा होता .
याबाबत कोणावरही विश्वास न ठेवता स्वतः शोध घ्यायचा असे ठरवून म्हातारबा रात्रीची वाट बघत होते .
आईने सरळ दिलेला इशारा ऐकला आणि काशी घाबरली . आता लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक होते . आतुरतेने रात्रीची वाट काशी पहात होती . सूर्य अस्ताला गेला आणि गाव अंधारात बुडाले . काशी हळूच मागच्या दारातून बाहेर पडली .
दौलती रानातून नेहमी भेटायच्या जागेवर आला . थोड्याच वेळात काशी येताना दिसली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले .
" काशी , आता काही दिवसांनी हे समद पाण्याखाली जाणार . "
" व्हय , हे वडाच झाड , नदीच्या काठावर हे छोट मंदिर सगळ जाणार . "
काशीने उत्तर दिले .
काशीने उत्तर दिले .
" आपल्याला गाव सोडायला लागलं काशी . "
दौलती तिचा हात धरून म्हणाला .
दौलती तिचा हात धरून म्हणाला .
" व्हय , पर आता नाही . आता आपून पळून गेलो तर आपल्याला पकडायला समदी तुटून पडत्याल . "
" आबा आमच लगीन लावायच म्हणत्यात . "
" त्यासनी सा महिन थांबवा . गाव पाण्याखाली जाताना आपून पळून जायचं . "
" काशी , तुझी साथ कधीच सोडणार न्हाय . "
दौलतीने काशीला मिठीत घेतले .
दौलतीने काशीला मिठीत घेतले .
लांबून बोलणे ऐकू येत नव्हते . थोड्या वेळाने काशी जायला निघाली . ती जवळून जाताना म्हातारबा पाटलांनी तिला पाहिले आणि त्यांना प्रचंड राग आला . त्यांनी तिला धडा शिकवायचा असे ठरवले .
ते दोघे निघून गेले आणि पाटील निघाले .
" पाटील थांबा . सबुरीन घ्या ."
सखू मागून पुढे झाली .
सखू मागून पुढे झाली .
" तू ? तुझ्याकडन शिकायची गरज न्हाय . काशीला नाहीशी करून टाकतो . "
" काशी गायब झाल्यावर दौलती गप बसल व्हय ? काळ येळ बघून डाव साधा . "
सखू विचारांचा भुंगा सोडून निघून गेली .
त्यानंतर धरणाचे काम वेगाने सुरू झाले . माती , दगड फोडणे , त्याची वाहतूक अशी कामे वेगाने सुरू झाली . पहिला टप्पा पावसाळा यायच्या आधीच पूर्ण करायचा होता . विल्यम जातीने लक्ष ठेवून होता . काशी त्याला भेटून पुढची व्यवस्था करत होती . दौलती देखील पैसे आणि इतर व्यवस्था करण्यात व्यस्त होता .
" राधा , आम्ही ठरवलं तसं व्हईल नव्ह ? "
दौलतीने विचारले .
दौलतीने विचारले .
" व्हय , पर सावध रहा . गावात बांडगुळ कमी न्हाईत . "
" व्हय , आबा ह्यात यायला नग . त्यांना आधी समजल तर ? "
" धाकल पाटील काशी आणि तुम्ही भेटताना जपून . कोण पाठलाग करत न्हाय ना ? हे बघूनच भेटा . "
" व्हय , समदी काळजी घेतो आम्ही . "
राधाचा निरोप घेऊन दौलती निघाला .
राधाचा निरोप घेऊन दौलती निघाला .
थोडे दूर गेल्यावर अचानक कोणीतरी त्याचा हात धरला .
" कोण हाय ? "
दौलती गरजला .
दौलती गरजला .
" आता , ह्यो नाजूक हात सगळ्या अंगावरन फिरला हाय पाटील . "
सखू पुढे झाली .
सखू पुढे झाली .
" हात सोड . "
तिला बाजूला ढकलून दौलती निघून गेला .
तिला बाजूला ढकलून दौलती निघून गेला .
सखू मात्र सुडाच्या आगीत जळत होती .
काहीही करून एक रात्र दौलती माझा व्हायला हवा . ह्या विचाराने तिला झपाटले होते . काशी त्याच्या आयुष्यात आल्याने त्याने आपल्याला झिडकारून टाकले हेच सखुला मान्य होत नव्हते .
" काशे आटीप लवकर . कापड धुवायला जायचं हाय . "
झामा ओरडली .
झामा ओरडली .
" व्हय , ही काय आलेच . रखमाला संग घ्यायचं हाय ."
कपडे गाठोड्यात बांधत काशी म्हणाली .
कपडे गाठोड्यात बांधत काशी म्हणाली .
रखमा आणि धाकटी बहीण यांना घेऊन काशी नदीकडे निघाली .
" अय रखमा , झामा , काशी थांबा की . "
सखू पळत आली .
सखू पळत आली .
" ही नटवी कशाला हाक मारती ? "
रखमा चिडली .
रखमा चिडली .
" सोबत नसलं कुणी जायला . "
काशीने उत्तर दिले .
" हिला ? गावातून लई सोबती हाय तिचं . "
तोपर्यंत सखू पोहोचली .
तोपर्यंत सखू पोहोचली .
चौघी दोहाजवळ आल्या . लवकर आल्याने डोहाजवळ ह्या चौघी होत्या फक्त .
कपडे धुवत असताना साडी विसळण्यासाठी काशी थोडीशी आत उतरली . ती एका दगडावर उभी होती . सखुने दगडावर एका बाजूने जोरात धक्का दिला आणि काशी पाण्यात पडली . डोहात पुढे भोवरा होता . काशी पट्टीची पोहणारी असूनही भोवरा कापत बाहेर येणे सोपे नव्हते .
आता काही काशी वाचणार नाही असे वाटत असताना कोणीतरी धपकन पाण्यात उडी मारली .
भीमा काशीला बाहेर घेऊन आला .
" जरा जपून काम करा . नाहीतर मराल ."
भीमा रागाने बोलून निघून गेला .
भीमा रागाने बोलून निघून गेला .
दौलतीने त्याला काशीच्या आसपास राहायला सांगितल्याने आज काशीचा जीव वाचला होता .
इकडे दूर पठारावर लोकांना शेतीसाठी जमीन वाटप सरकारकडून झाली होती . पांढरी आणि काळी अशी आखणी होऊन घरे बांधण्याची लगबग सुरू झाली .
नवीन गावठाण वेगाने आकाराला येत होते . पावसाळा तोंडावर आल्याने आता कधीही गाव सोडून जायच्या तयारीत गावकरी होते . अजून पंधरा दिवसात पाऊस सुरू होईल अशी शक्यता असताना त्या दिवशी संध्याकाळी पाऊस सुरू झाला .
अवकाळी असेल असे दुर्लक्ष केलेला पाऊस उघडायचे नाव घेईना . डोंगरातून पाण्याचे लोट वाहायला लागले .
चार दिवस झाले तरी पाऊस चालूच होता . धरणात पाणी साठायला सुरुवात झाली . ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांनी तातडीने गावकऱ्यांना गाव सोडायच्या सूचना दिल्या .
शक्य होईल तेवढे सामान सोबत घेऊन लगेच गाव सोडायची तयारी सुरू करा अशी सूचना आली . कासू आक्काने देवीला अभिषेक केला आणि मंदिराचे दरवाजे बंद केले . मूर्ती अचल असल्याने सोबत नेता येणे शक्य नव्हते .
दौलती आणि काशी दोघांनी ओळखले हीच ती वेळ . काशीने सगळी तयारी केली . आता नेहमीच्या जागेवर भेटायचे ठरले .
काशी आणि दौलती एकत्र येतील का ?
ह्या प्रेमातून काही वेगळे संकट निर्माण होईल का ?
ह्या प्रेमातून काही वेगळे संकट निर्माण होईल का ?
वाचत रहा .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर
अष्टपैलू 2025 स्पर्धा .
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा