संस्कृती रक्षक ? खरंच ?? भाग अंतिम
जलद लेखन स्पर्धा
©® आरती पाटील - घाडीगावकर
मैत्री आणि नीलम ला माहित होतं की पोलीस स्टेशनला त्यांना त्रास दिला जाईल पण दोघी जे होईल त्याला समोऱ्या जायला तयार होत्या.
दोघीही हवालदार सोबत पोलीस स्टेशनला येतात. इन्स्पेक्टर सुजित दोघीना आत केबिन मध्ये बोलावतात. त्या आत आल्यावर त्यांना बसायला सांगतात आणि दोघींसमोर चहा ठेवतात. ते पाहून दोघींना ही थोडं आश्चर्य वाटलं.
इन्स्पेक्टर सुजित पुढे बोलू लागले.
इन्स्पेक्टर सुजित, " तुम्हांला काय वाटत ? हे सर्व एवढं सोपं आहे ? "
मैत्री, " म्हणजे ? "
इन्स्पेक्टर सुजित, " त्या ओंकार आणि त्याच्या टोळीला पकडणं ? "
नीलम, " पोलीस असून तुम्हाला ते अजून जमलं नाहीये. सोपं नाहीये आलंय लक्षात. पोलीस आपलं काम नीट करतील तेव्हा ना ? "
इन्स्पेक्टर सुजित, " तुम्हांला इथे येऊन किती वेळ झाला ? म्हणजे या जिल्ह्यात ? "
मैत्री, " सात- आठ महिने. "
इन्स्पेक्टर सुजित, " तरीच तुम्हांला सर्व माहित नाहीये."
नीलम गोंधळून विचारते, " म्हणजे ? "
इन्स्पेक्टर सुजित, " हा ओंकार 'सुधीर राजे' या नेत्याचा खास माणूस आहे. संस्कृती वाचवण्याचा ठेका आपणच घेतला आहे असा त्याचा समज आहे. शिवाय ओमकारच्या अश्या वागण्यामुळे मुली पारंपरिक कपडे घालायला मजबूर होतात. आणि आपल्या जिल्यात संस्कृती कशी जपली जाते याच वेगळं दृश्य दाखवून सुधीर राजे आपली राजकीय इमेज साठी फायदा करून घेतो.
मागच्या वेळी ज्या दोन मुलींना त्याने जळालं होतं ना? त्यातली एक मला राखी बांधायची. 'अवनी' नाव होतं तिचं. फार गोड होती. पूर्वी आमच्या शेजारी राहायची. तिच्या सोबत जे झालं त्याबद्दल चीड माझ्या मनात आहेच पण प्रत्येक वेळी सुधीर राजे च्या वरद हस्ता मुळे तो बाहेर येतो.
याच केस संदर्भात मी त्या अटक केली होती. वर्षभर तो जेल मध्येच होता. पण राजकीय डावपेच खेळून त्याला जामीनावर बाहेर काढलं आहे. आणि बाहेर येताच त्याने पुन्हा तेच सुरु केलं.
ओंकार विरोधात काही केलं तर सुधीर राजे जगू देणार नाही हे माहित असल्यामुळे कोणी ओमकारच्या नादी लागत नाही. त्या दिवशी तुम्ही तक्रार केल्यावर त्याला पकडून आणलं होतं पण 2 दिवसात पुन्हा त्याला बेल मिळाली आणि तो बाहेर आला.
मला माहित होतं तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून मी एक पोलीस तुमच्या मागावर ठेवला होता. ओंकार चौकात दिसताच त्याने आम्हांला सावध केलं म्हणून तर आम्ही वेळेवर पोहचलो. "
मैत्री थोडीसी रागातच, " म्हणजे त्याला शिक्षा होणारच नाही का ? "
इन्स्पेक्टर सुजित आत्मविश्वासाने, " होणार ना नक्की होणार. पण त्यासाठी सुधीर राजे चा सपोर्ट गेला पाहिजे. "
मैत्री, " आणि ते कसं होणार ? "
इन्स्पेक्टर सुजित, " तुम्ही दोघीच करू शकता ते. "
मैत्री आणि नीलम एकमेकींकडे गोंधळून पाहतात आणि म्हणतात, " आम्ही ? "
इन्स्पेक्टर सुजित, " होय, तुम्हीच. तुमची तयारी असेल तर कसं ते मी सांगतो. "
मैत्री आणि नीलम आत्मविश्वासाने म्हणतात, " आम्ही नक्की करू. "
इन्स्पेक्टर सुजित, " छान, ऐका तर मग, २ दिवसांनी मोठ्या मैदानावर यू. पी. एस. सी. विध्यार्थी साठी सभा आयोजित केली आहे. त्यात सुधीर राजे पण येणार आहे. टी. व्ही वर लाईव्ह प्रक्षेपण असेल. तेव्हा तुम्ही...." असं म्हणतं इन्स्पेक्टर सुजित सर्व प्लॅन सांगतात.
प्लॅन ऐकून मैत्री आणि नीलमच्या चेहऱ्यावर स्मित येत. आणि पोलीस प्रोटेकशन मध्ये त्या हॉस्टेल वर येतात.
२ दिवसांनी.......
मोठ्या मैदानावर मैत्री आणि नीलम स्काफ चेहऱ्यावर लावून आपल्या जागेवर बसल्या होत्या. सर्व न्यूज चॅनेल वाले आले होते. थेट प्रक्षेपण ची तयारी होती. हजारो च्या संख्येत विद्यार्थी तेथे बसले होते. सुधीर राजे तिथे आले आणि कार्यक्रम सुरु झाला. काही स्वागत गीते, दीप प्रज्वलन, भाषण, वैगरे.
थोड्या वेळाने सुधीर राजे यांचं विद्यार्थ्यांना उत्साहाने अभ्यास करा असं भाषण करतात. सूत्रसंचालन करणारा व्यक्ती नंतर म्हणतो. कोना विद्यार्थ्याला आपलं मत, अभ्यास नियोजन किंवा इतर काही बोलायचं असेल तर मंचवार तुमचं स्वागत आहे. यावर मैत्री हात वर करते आणि मंच्यावर येते.
मैत्री सर्वाना अभिवादन करते आणि बोलायला सुरुवात करते.
मैत्री, " सुधीर साहेब, एक प्रश्न आधी मला तुम्हाला विचारायचा आहे. विचारू का ? "
सुधीर राजे, "हो हो, विचार ना. "(समोर मीडिया असल्यामुळे नाही म्हणू शकत नव्हते. )
मैत्री," तुम्ही तुमच्या बऱ्याच भाषनांमध्ये म्हणता की आमच्या जिल्ह्यात संस्कृती जपली जाते. म्हणजे नक्की काय सांगू शकाल का ? "
सुधीर राजे, " आपल्या जिल्ह्यात मुली, बायका पारंपरिक कपडे घालतात. लज्जा आणि मर्यादेचं पालन करतात. "
मैत्री, " एवढं म्हणजे संस्कृती का ? "
सुधीर राजे आपला राग नियंत्रणात ठेवत, " मग तू सांग संस्कृती म्हणजे काय ? "
मैत्री, " सांगते ना, नक्की सांगते कारण तुमच्या सारख्या अनेकांना संस्कृती म्हणजे नक्की काय अजून कळलंच नाहीये. "
सर्व कॅमेरे आता मैत्री कडे शिफ्ट झाले होते.
मैत्री, " संस्कृती म्हणजे जुने चांगले विचार, हुशारी, नीतिमत्ता, संस्कार जपणे. तुम्ही आणि तुमच्या सारख्याच काही जणांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि आपण समाजाचे, संस्कृती चे रक्षक आहोत. आमचं नं ऐकणाऱ्याच जीव घेऊ पण संस्कृती शाबूत ठेवू हा तुमचा अजेंडा आहे. "
सुधीर राजे रागाने लाल होतं म्हणतो, " तू काय आरोप लावतेयस माझ्यावर कळतंय का तूला ? मी नेता आहे इथला. लोकांच्या, समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय मी. "
मैत्री, " हो करताय ना. काम करताय. तो समोर उभा असलेला ओंकार ज्याने दोन मुलींना जाळून मारलं त्याला सपोर्ट करताय. त्याने संस्कृती वाचवली ना ? "
एका पत्रकारने तिला प्रश्न विचारला ( त्याला देखील बातमी हवीच होती ना ), " मॅडम, तुम्ही जे बोलताय ते खरं आहे का ? आणि का जळालं त्या मुलींना ? "
मैत्री रागाने थरथर करत म्हणते, " कारण यांच्या सो कोल्ड संस्कृती मध्ये जिन्स घालण बसत नाही. सॉरी मुलींनी जीन्स घालण बसत नाही. त्या मुलींनी जीन्स घातली होती आणि त्यामुळे यांची संस्कृती धोक्यात आली आणि त्यांनी त्या मुलींना जळालं ते देखील भर चौकात. आणि जाळणाऱ्यावर साहेबांचा वरद हस्त असल्यामुळे तो बाहेर आहे. "
पत्रकार, " पण मॅडम, तुम्हांला कसं माहित की यात सुधीर राजेंचा हात आहे. "
मैत्री, " कारण सध्या हा प्रकार माझ्यासोबत घडला आहे. माझ्या फक्त जिन्स घालण्याने मला अगदी टोकाचा त्रास दिला मला रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस मध्ये तक्रार दिल्या नंतर ही माझ्यावर आणि माझ्या मैत्रीण वर हल्ला करण्यात आला त्यात आम्ही जखमी झालोत या जखमा तुम्ही पाहू शकता. ( मैत्री हात पुढे करत म्हणाली. ) आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा या ओमकारने आमच्या समोर या सुधीर राजे ना फोन केला आणि म्हणाला,' आपली संस्कृती मी जपतोय. त्यासाठी यांना मारावंच लागेल. त्यामुळे पुढचं तुम्ही सांभाळून घ्या.' "
मैत्री च्या अश्या बोलण्याने ओंकार बडबडला आणि म्हणाला, " नाही साहेब, त्यावेळी मी तुम्हांला फोन केलाच नव्हता. त्यानंतर थोड्या वेळाने केला होता. कारण तेव्हा पोलिसांची व्हॅन तिथे आली होती. " नकळत ओंकार खरं बोलून गेला आणि सर्व महाराष्ट्राने ते ऐकलं. सुधीर राजेंना काय बोलाव ते सुचत नव्हतं.
बडबडून सुधीर राजे म्हणाला, " मी तर याला ओळखत देखील नाही. "
सुधीर राजेंच्या अश्या बोलण्याने ओंकार घाबरला आणि म्हणाला, " असं काय करताय साहेब, तुमच्या बोलण्यामुळे तर या संस्कृती चं रक्षण करायला मी तयार झालो. तुम्हीच माझी वेळोवेळी मदत केली आणि आता तुम्ही मला ओळखतच नाही ? "
मैत्री, " नाहीच ओळखणार, कारण त्यांचं काम राजकारण करणं आहे. आणि तुझ्यासारखे उपट सुभ त्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरतात. आपलं डोकं वापरातच नाहीत. अरे संस्कृती वाचवण्यासाठी तू सर्व केलंस म्हणतोस ? तू कधी त्याचा अभ्यास केला आहेस का ? तूला खरंच माहित आहे का संस्कृती म्हणजे काय ? "
सर्वत्र शांतता असते. मैत्री बोलायला सुरुवात करते.
मैत्री, " मी सांगते संस्कृती म्हणजे काय ? रामाने वडिलांचा शब्द ठेवण्यासाठी वनवास जवळ केला, सीताने आपल्या पतीची साथ देत वनवास भोगला, मोठ्या भावावर अन्याय झाला आहे हे माहित असल्यामुळे लक्ष्मण भावासोबत वनवासात जातो. उर्मिला आपल्या पतीच्या वियोगातही त्याच्या घरच्यांची काळजी घेत, भरत आपला भाऊ परत येई पर्यंत नंदीग्राम मध्ये थांबतो. ही आहे आपली संस्कृती. प्रेम, आपलूकी, विश्वास, शब्दाचा, थोरांचा आदर ही आहे आपली संस्कृती.
मैत्री, " मी सांगते संस्कृती म्हणजे काय ? रामाने वडिलांचा शब्द ठेवण्यासाठी वनवास जवळ केला, सीताने आपल्या पतीची साथ देत वनवास भोगला, मोठ्या भावावर अन्याय झाला आहे हे माहित असल्यामुळे लक्ष्मण भावासोबत वनवासात जातो. उर्मिला आपल्या पतीच्या वियोगातही त्याच्या घरच्यांची काळजी घेत, भरत आपला भाऊ परत येई पर्यंत नंदीग्राम मध्ये थांबतो. ही आहे आपली संस्कृती. प्रेम, आपलूकी, विश्वास, शब्दाचा, थोरांचा आदर ही आहे आपली संस्कृती.
कुंतीच्या नकळत बोलल्या गेलेल्या शब्दाचा ' जी भिक्षा घेऊन आलात ती सर्व भाऊ वाटून घ्या. ' याचा देखील मान ठेवतात. द्रौपदी इंद्रप्रस्त ची अर्थमंत्री होती. तिला जेवढं माहित होतं राज्यात येणाऱ्या पैशाबद्दल. तेवढं इतर कोणत्याही पांडवला माहित नव्हतं. स्त्रीला तिच्या योग्यतेनुसार तिचं पद आणि मान देण ही आहे आपली संस्कृती.
मैत्रेयी, घोषा, अपाला, गार्गी, लोपामुद्रा या स्कॉलर स्त्रिया त्यांच्या त्यांच्या काळात होऊन गेल्या आणि त्याच्या ज्ञानाचा आदर केला गेला. ही आहे आपली संस्कृती.
लुटी मध्ये कल्याणच्या सुभेदारची सुन समोर पाहून महाराज्यांनी तिला साडी - चोळीचा मान देऊन परत पाठवलं. ही आहे आपली संस्कृती.
अरे खिलजी, मुगल भारतात आले त्यापूर्वी स्त्रियांना मान होता, सन्मान होता. बाल - विवाह, सती या प्रथा कधी आल्या ? कारण पृथ्वीराज आणि संयोगिता यांच्या इतिहासचं वाचन केलं तर लक्षात येईल की संयोगिता साठी स्वयंवर ठेवलं होतं. म्हणजे ती नक्कीच मोठी असणार. कारण स्वयंवर म्हणजे स्वतः वर निवडणे. ती लहान असती तर वर कसा निवडू शकली असती ? म्हणजे बाल - विवाह हा नंतर आला.
रावण मेल्यावर मंदोदारी, बाली मेल्यावर तारा, दुर्योधन मेल्यावर भानुमती सती नाही गेल्या. म्हणजे हे देखील नंतर जोडलं गेलंय.
खिलजी, मुगल भारतात आले. त्यांच्या संस्कृती मध्ये स्त्री चं अस्तित्वचं नाहीये. हवं तसं वापरता येणारी ती फक्त एक वस्तू आहे. त्यामुळे ते तसेच वागायचे आणि आपण काय केलं ? हळूहळू आपली संस्कृती विसरून ते अवलंबल. स्त्री ला काय विचारायचं? नाही का ? आपण नक्की कोणाची संस्कृती जपतोय याचा नक्की विचार करा.
मला माहित आहे की सध्या काही मुलींनी तरतम्य सोडलं आहे. कुठे, कधी, कसं वागावं, राहावं हे कळतच नाही त्यांना. पण म्हणून सर्व मुली चुकीच्या नाही ना होतं. आणि तुम्ही म्हणतं असलं कपड्यांमुळे स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढले आहेत तर, साठीच्या आजी ते पाळण्यातल्या लेकी पर्यंत कोणीच सुरक्षित नाही. त्याच काय ?
आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्या सर्वाना आपला इतिहास माहित हवा. आपल्या मुलांना त्याचे धडे, त्याच ज्ञान आपण द्यायला हवं. त्यांच्या डोक्यात चांगले आणि आपली खरी संस्कृती अशी भरा की चुकीची मानसिकता तयारच नाही झाली पाहिजे. "
मैत्रीचं बोलणं पूर्ण झालं तसं तिच्या गालावर अश्रू आले. काही क्षण निरव शांतता आणि नंतर जोरात टाळयांचा कडकडाट झाला. नकळत ओंकार आणि सुधीर राजे यांनी गुन्हा मान्य केल्यामुळे त्यांना तिथेच अटक झाली. तिथे उपस्थित अनेक मुली या जाचातून सोडवल्याबद्दल मैत्रीचे आभार मानत होत्या.
समाप्त.
टीप : वरील कथा सत्य घटनेवर आधारित आहे. अगदी पाच - सहा वर्षांपूर्वी घडली आहे. ( कथा लिहिताना त्यात काही बदल नक्की केले आहे. परंतु जिन्स घातल्यामुळे जळण्याचा प्रकार खरा आहे. क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया या मध्ये हा भाग कव्हर केला आहे. ) आणि एका मुलीच्या धाडसा मुळे गुन्हेगारांना अटक देखील झाली आहे.
खरंच आजची गरज आहे आपल्या मुलांना चांगल्या - वाईट गोष्टींसोबतच आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख करून देणे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा