खरंच इतकं सोपं असत का जीव देण.. असतं तर मला का नाही जमलं. लाईफ मध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडल्या जेव्हा मला जीव द्यावासा वाटला. पण कुणीतरी धरला हात आणि थांबवलं मला. मी पण थांबले.
पण गोष्ट एवढ्यावर थांबणार थोडीच होती. तो धरलेला हात मीच सोडवून गेले पुढे आणि पुढे परत तेच... सगळ्याच गोष्टी मनाविरुद्ध होऊ लागल्या की भयंकर चिडचिड.. रात्री झोप ण येण.. शून्यात हरवून बसण.. रडणं.. ते रडणं कुणी बघायलाही नाहीये याच्या मुळे तर अजून depress होणं.. आपलं कुणीच नाही.. आपल्यावर कुणीच प्रेम करत नाही..मग कुणासाठी जगायचं आपण.. मग नको जगायला आपण.. जीव देऊन टाकू अस विचार येन.. कुणीतरी ऐकेल का माझं.. मला सांगेल का म कुठे चुकली.. मी काय करायला हवं.. पण कोण ऐकनार माझं सगळ्यांना स्वतःची टेन्शन.. असे हजारो विचार डोक्यात फिरतात
आज सुशांत सिंग राजपूत ने केली आत्महत्या.. त्यावर सगळेच म्हणताय speak up.. shear your प्रॉब्लेम्स and bla bla... पण खरंच असतं का कुणी रेडी ऐकायला.. मला तर नव्हत भेटलेल कुणी त्या situation मध्ये.. आणि असाल तरी मोकळेपणाने बोलण्यासाठी तेवढ्या डेप्थ पर्यंत conversession होतात कुठे आजकाल.. hello कशी आहेस.. मी मजेत.. तू कशी आहेस.. मी पण मजेत... एव्हढ्यावरच संपतात सगळी conversession...
already जवळच्या व्यक्तीने ट्रस्ट तोडलेला असतो मग अनोळखी व्यक्ती जसा की मानसोपचार तज्ञ वर ट्रस्ट ठेऊन सांगणार कसा त्याला प्रॉब्लेम.
मग यावर solution काय.. तर आपला प्रॉब्लेम् आपण स्वतःच सोडवायचा. मग ते कसे..हेच सांगतो हॅप्पीनेस कोर्स, आर्ट ऑफ लीव्हींग चा.. नाही मी कुणाची पब्लिसिटी बिलकुल करत नाही.. मी फक्त माझा अनुभव तुम्हाला सांगतेय....
मी पण डिप्रेशन मध्ये होते.. शोधात होते शॉर्टकट... कुठेतरी दूर पळून जाण्याचा पण ज्यांनी धरला माझा हात.. ते म्हणाले जाऊ नको माझ्या परवानगीशिवाय मला गरज आहे तुझी.. नाही ते माझे आई वडील.. न भाऊ बहीण.. न मित्र मैत्रीण.. न नवरा..मग कोण आहे ते..?
ते म्हणताय रडावसं वाटतंय मग रड.. संताप करायचंय मग कर पण situation पासून पळू नको.. खूप सोपं आहे पळून जाण.. पण त्याने काय permnant solutuiom भेटणार नाही.. आणि temporary रिलीफ काय कामाचा..
मग काय करू मी..
काही नाही शांत बस आणि 4 मोकळे स्वास घे.. शांत हो आणि बघ काही सुचतंय का.. पळन्याशिवाय... सुचलं तर गो फॉर इट.. नाहीतर ये परत मी इथेच आहे..
नाही सुचलं न मग कर आता हॅप्पीनेस कोर्स.
ते काय असतं.
कळेलच कोर्स केला की..
त्याने काहीच फरक नाही पडला तर..
इट्स ओके.. पण एकदा try करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये न..
मग काय केला हॅप्पीनेस कोर्स. त्याने माझे प्रॉब्लेम नाही सॉल्व झाले.
मी कुठे म्हटलं मी तुझे प्रॉबलेम सोडविल. त्याने तू डिपेन्डन्ट झाली असतीस माझ्यावर . पण ते प्रॉब्लेम सोबत डील करण्याचं strength मी तुला दिलीय..
आणि हो हे खरच होत.. माझे प्रॉब्लेम संपले नाही.. ते कुणाचेच संपणार नाही.. आपण मॅजिक वर्ल्ड मध्ये नाही रिअल लाईफ मध्ये राहतोय.. पण मी आता हॅपी आहे. life किती स्पेशल आहे. प्रॉब्लेम सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच आहे.. पण successful तेच झाले ज्यांनी त्यांचे प्रॉबलेम्स दूर करून त्यांना ignore करून पुढे गेले.
Life is so soo precisious.. कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्या मी करू शकते आणि मी माझा वेळ आणि आयुष्य किती फालतू गोष्टींचा विचार करून टेन्शन घेण्यात घालवत होते ते कळलं माझं मलाच.. थँक्स to गुरुजी founder of आर्ट ऑफ लिविंग.
नाही हे फक्त मला नाही सगळ्या हॅप्पीनेस कोर्स केलेल्यांनां वाटतंय.
खोटं वाटत असेल तर प्रूफ youtube, facebook, google अशा सगळ्याच सोशल साईट्स वर त्यांच्याबद्दल वाचायला, बघायला मिळेल... आणि खूप sucessful लोकांची उदाहरणं पण बघायला भेटतील... जसं की आपले prime minister नरेंद्र मोदीजी, सगळ्यांना हसवणारा कपिल शर्मा, प्राजक्ता माळी, सोनाक्षी सिन्हा, कार्तिक आर्यन असे असंख्य सेलेब्रिटी सुद्धा आहेत ज्यांनी आपले अनुभव youtube वर टाकलेय.
मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे की सगळ्यांनी हॅप्पीनेस कोर्स करायला हवा. आत्ता तर अजूनच सोपं झालाय. तुम्ही घरात बसून करू शकता ऑनलाईन.
बघा विचार करा आणि फक्त स्वतःसाठी.. स्वतःच्या हॅप्पीनेस साठी करा एक हॅप्पीनेस कोर्स... :)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा