काही वेळा नंतर…
ध्रुवी आणि तिच्या फ्रेंड्सनी जंगलात प्रवेश केला मनात एक अनामिक भीती होतीच पण त्याच बरोबर जंगल देखील शांत होत जस काही ते कुणाची तरी वाट पहात होत आणि आता त्या जंगलाला ते सावज सापडलं होत.
त्यांनी जंगलात प्रवेश केला त्यांची पाऊले पुढे पुढे सरकू लागली आणि पायवाट मागे पडत गेली. खर तर हा अनुभव सगळ्यांसाठी नवा नव्हता कारण त्यांनी या आधी ही अश्या खूपश्या ट्रिप केल्या होत्या.
पण तरी यावेळेस मात्र काही तरी वेगळं होत एकदम विलक्षण ते तसेच पुढे जातं होते जंगलाचा आनंद घेत होते आणि अचानक एक मंद पण थोडीशी भयावह हवेची झुळूक आली आणि कुठल्या तरी आवाजाचा मागोवा घेत ते तिथेच स्तब्ध झाले.
आणि अचानक मागून दबक्या पावलांचा मध्येच पैंजणाचा आवाज येऊ लागला तस सगळे भानावर येऊन लगेच चालू लागले.
काही वेळा नंतर..
खूप चालल्यावर ध्रुवीला अचानक तहान लागली आणि ती मध्येच थांबली.
“विक्रम, यार आता चालणं कठीण झाल आहे खूप तहान ही लागली रे तुझ्याकडे पाण्याची बाटली आहे का?” ध्रुवी ने काकूळतीला येऊन विचारलं.
“हो.. हो घे न दोन तीन बाटल्या आधीच घेऊन ठेवल्या होत्या घे.” पाण्याची बाटली देत विक्रम म्हणाला.
आणि लगेच सगळ्यांनी पाणी पिल थोडा आराम केला व परत चालायला सुरवात केली.
काही वेळा नंतर…
चालत असताना अचानक त्यांना एक गडद काळी सावली दिसली ती सावली हळू हळू त्यांच्या जवळ जवळ यायला लागली तस ते भीतीने थर थर कापू लागले एक क्षण त्यांना समजलच नाही हे सगळ सुरु काय आहे मग त्यांचा ही धाबेवाल्यावर विश्वास बसू लागला आणि एक क्षण त्यांना ही वाटू लागलं जे स्थानिक लोक बोलतात ते खर तर नाही.
“यार तो धाबेवाला म्हणत होता ते खर तर नाही.” चालता चालता विवेक ने विचारलं
“अरे, बाप रे.. विवेक तु आमच्या बरोबरच आहेस आम्हाला वाटलं तु मध्येच आम्हाला सोडून गेलास.” ध्रुवीने विचारलं
“अस का विचारतेस मी कुठे जाणार तुम्हाला सोडून.” लगेच विवेक म्हणाला
“यार किती बोलता तुम्ही थोड शांत रहा समोर बघा ती सावली अजून आपल्याजवळ येत आहे आय थिंक आपण झाडांमागे लपून बसुत म्हणजे नेमक काय आहे ते समजेल.” विक्रम समजावत म्हणाला
आणि सगळे झाडामागे लपून बघू लागले.
काही वेळा नंतर…
ती सावली त्यांच्या समोरून निघून गेली तोच आणि सगळे तिथेच सावलीला बघत उभे राहिले तोच काही क्षणात त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती येऊन उभी राहिली आणि कानात “मी आली आहे” एवढच म्हणाली तोच सगळे त्या दिशेने बघू लागले पण मागे कुणीच नव्हतं ते बघून सगळेच घाबरले आणि पळत सुटले त्यांच्या मागे कोण आहे याचा विचार न करता नुसतं पळत सुटले आणि एका पडक्या घराजवळ येऊन थांबले तोच त्यांची नजर त्या घरावर पडली.
आणि त्यांनी बघितलं तिथे काही लोक खूप साऱ्या पेट्या घरात नेऊन ठेवत आहेत ध्रुवी आणि तिचे फ्रेंड्स त्या लोकांवर नजर ठेऊन त्यांना बघू लागले.
“गाईज तुम्हाला ही तेच वाटतय का जे मला वाटतय.” विक्रम ने सगळ्यांना विचारलं
“हो, विक्रम हा सगळा काही तरी वेगळाच प्रकार वाटतोय मला काय वाटतय माहित आहे जे आपल्या बाबतीत झाल ते ही याचाच तर भाग नाही.” ध्रुवीने आपली शंका बोलून दाखवली.
“यस ध्रुवी मला ही तसच वाटतय पण ही लोक आहेत तरी कोण आणि काय करत आहेत. एक मिनिट मी याचा व्हिडीओ शूट करतो आणि अजित काकाला कळवतो.” विक्रम बोलला
काही क्षणा नंतर…
सब इन्स्पेक्टर अजित ठाकूर आपल्या केबिन मध्ये बसून फाईल चेक करत असतात तोच फोन वाजतो.
“हॅलो, बोल विक्रम कसा आहेस?” फाईल चेक करत अजित ठाकूर विचारतात.
“काका लगेच फोन चेक करा मी तुम्हाला एक व्हिडीओ क्लिप सेंड केलीये ती बघा आम्ही ध्रुवशील घाटीच्या जंगलात ट्रिपला आलो आहोत तिथे आम्हाला एका पडक्या घरात काही तरी संशयित होताना दिसलय आणि लगेच आम्ही त्याचा विडिओ काढून तुम्हाला पाठवलय त्याच बरोबर मी लोकेशन ही सेंड केलय तुम्ही लगेच निघून या” विक्रम आपल्या काकांना फोन करून बोलावून घेतो.
काही वेळा नंतर…
विक्रमने सेंड केलेल्या लोकेशन वर सब इन्स्पेक्टर अजित ठाकूर आपली फौज घेऊन पोहोचतात आणि तिथल्या गुंडांना पकडतात तसेच तो सगळा खजिना देखील जप्त करतात.
अशा रीतीने एका खूप मोठ्या रॅकेट चा पर्दाफाश होतो. जेव्हा त्यांची कसून चौकशी होते तेव्हा समजतं त्या जंगलात नागमणी वगैरे अस काही नव्हतच लोकांना जे दिसायचं ते त्यांचे भास होते लोकांना घाबरवण्या साठी केलेला बनाव ज्यामुळे लोकांना खजिन्याच सत्य समजू नाही आणि लोक आपली काम करत राहावीत.
काही दिवसा नंतर…
त्या घटने नंतर सगळे आपापल्या घरी परतात. आणि सरकार कडून सगळ्यांना 1 लाखाचं प्राईज देखील मिळत.