शिंपल्यातील अप्रकाशीत मोती : आदरणीय संजना इंगळे
लहाणपणापासूनच प्रतिभासंपन्नतेचे वरदान लाभलेल्या संजना ईंगळे यांनी विविध व्यासपिठावर लिहण्यास सुरवात केली. वाचनाची आवड आणि उत्तम निरीक्षणशक्ती यामुळे त्यांनी समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य लेखणीच्या माध्यमांतून केले.त्यांच्या अनेक कथा वाचकांच्या मनावर राज्य करु लागल्या.एक प्रतिभावान लेखिका म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.त्यांनी विविध विषयावरील जवळजवळ १५०० च्या वर कथा लिहलेल्या आहेत.द बॉस, टेक्निकल संसार , घराणं, भाकीत , आॕफिसर , हिरवा संंघर्ष , रामराज्य या त्यांच्या गाजलेल्या कथा आहेत. सहजसोपी भाषा , विषयानुरूप सुंदर लेखन , वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता , वैचारिक प्रगल्भता यामुळे त्यांचे लेखन वाचकांच्या आवडू लागले.लेखिका म्हणून त्यांची वाटचाल खूपच प्रेरणादायक व नवोदित लेखकांना मार्गदर्शक ठरली.
संजना ईंगळे यांचा लेखनाचा प्रवास सुखद चालू होता परंतू लेखकांच्या अनंत अडचणी चालू होत्या यासाठी लेखकासाठी कांहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी ' ईरा ' या व्यासपिठाची निर्मिती केली.अत्यंत संघर्षमय परिस्थितितीतून वाटचाल करताना लेखकांना मदतीच्या भावनेने प्रेरीत करताना मार्गदर्शन केले.अनेक नवलेखकांंचा चांगला प्रतीसाद मिळाला.इतर कोणत्याही व्यासपिठाकडून लेखकांना मानधन मिळत नव्हते पण ईरा व्यासपिठाकडून प्रथम लेखकांना मानधन मिळवून देण्याचे कार्य संजना ईंगळे यांनी केले आहे.विविध स्पर्धांचे आयोजन , वेळेत स्पर्धेचा निकाल, बक्षीसांची घरपोच व्यवस्था , लेखकांना जेष्ठ लेखकांच्याकडून मार्गदर्शन , ऐतिहासिक चॕम्पियन ट्राॕफी व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन आणि सर्व लेखकांच्याबरोबर उत्तम संवाद यामुळे अल्पावधीतच ' ईरा ' व्यासपिठाने सर्वदूर लौकिक मिळवला यातून संजना ईंगळे यांचे वैचारिक व साहित्यक प्रगल्भता दिसून येते.
संजना ईंगळे यांनी लेखनक्षेत्रातील या भरारीमुळे अनेक नवलेखक तयार झाले.ग्रामीण भागातील लेखकांना त्यांच्यामुळे चालना मिळाली.विशेषतः महिला लेखिका उत्साहाने लिहू लागल्या.एका महिला लेखिकामुळे झालेला हा बदल निश्चितच अभिमानास्पद आहे.आज ईरा व्यासपिठामुळे चांगले लेखक तयार होत आहेत.संजना ईंगळे याच्या या कार्याची प्रसार माध्यमांनी दखल घेताना ' महाराष्ट भूषण ' या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.एका लेखिकेचा हा प्रेरणादायक प्रवास साहित्यक्षेत्राला नवी झळाळी देणारा आहे.
एक उदयोन्मुख लेखिका म्हणून त्यांचा प्रवास चालू होता ; परंतु स्वतःच्या लेखनाकडे दुर्लक्ष करत केवळ लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून ईराची स्थापना केली. भरपूर लेखनसंपदा असताना त्यांचे एकही पुस्तक प्रकाशीत झाले नाही. आपला बहुमुल्य वेळ लेखकांच्या हितासाठी खर्च केला. य्यांच्या प्रतिभेच्या शिंपल्यातील शब्दमोती अप्रकाशीत राहिला आहे ही खंत सतावणारी आहे. भविष्यात ईरा स्वतः पुस्तकनिर्मिती करेल त्यावेळी ही इच्छा पुर्ण व्हावी हीच अपेक्षा आहे.
ईरा नेहमीच लेखकांना आदराचे स्थान देते. ईरामध्ये लेखक इतका छान रुळला आहे की ईरा म्हणजे ' प्रेमळ कुटुंब' म्हणून सर्वत्र ओळखू लागले आहे. हा संवाद सर्वांना हवाहवासा वाटल्यामुळे ईराने लेखकांच्या भेटीगाठी व साहित्यिक देवाणाघेवाण व्हावी यासाठी दरवर्षी ईराचे गेटटुगेदर ठेवले आहे. याला लेखकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत पुणे व नाशिक येथे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले आहे.आगामी काळात ही संकल्पना जोर धरत असून भविष्यात आशा संमेलनातून लेखकांचा संवाद वाढणार आहे. यामध्ये आदरणीय संजना मॕडम यांचा दूरदृष्टीय हेतू स्पष्ट होतो.
ईरा नेहमीच लेखकांना आदराचे स्थान देते. ईरामध्ये लेखक इतका छान रुळला आहे की ईरा म्हणजे ' प्रेमळ कुटुंब' म्हणून सर्वत्र ओळखू लागले आहे. हा संवाद सर्वांना हवाहवासा वाटल्यामुळे ईराने लेखकांच्या भेटीगाठी व साहित्यिक देवाणाघेवाण व्हावी यासाठी दरवर्षी ईराचे गेटटुगेदर ठेवले आहे. याला लेखकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत पुणे व नाशिक येथे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले आहे.आगामी काळात ही संकल्पना जोर धरत असून भविष्यात आशा संमेलनातून लेखकांचा संवाद वाढणार आहे. यामध्ये आदरणीय संजना मॕडम यांचा दूरदृष्टीय हेतू स्पष्ट होतो.
© नामदेव पाटील