Login

शोध सत्याचा भाग - ११ ( अंतिम )

कोण असेल तो खुनी ? ती आणू शकेल का खुनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा शोध सत्याचा..


रूनालीच ऐकून विश्वासोबत बाकीच्यांना पण धक्का बसतो,
विश्वा " मग त्यादिवशी ते रात्री बारा वाजता. नंतर संकेतला क्लासरूममध्ये भेटण हे सगळ काय होत."


रूनाली " ते सगळ जे.पी आणि के.के यांना पकडण्यासाठी आणखी  पुरावा शोधत होती. "

विश्वा " काय ? "

रूनाली " हो , तिला आधीच माहिती होत की यामागे हे दोघ आहेत. तिच्याकडे त्यांच्याबद्दल पुरावे पण होते. "

साहिल " तिच्याकडे पुरावे होते तर तिने ते पोलिसांना द्यायचे होते. अस लपवून का ठेवले ? त्यात जे.पी आणि के.के यांना हे सगळ करून काय भेटणार आहे?"

रूनाली " कारण ती अडकली होती. त्या जयप्रकाशने तिला धमकी दिली होती. की जर तू पुरावे पोलिसांना दिले. तर या लोकांसारखे तुझ्या पण आई वडिलांना मारणार. म्हणून ती काही करू शकत नव्हती. पण तिला काहीही करून त्यांचा चेहरा समोर आणायचा होता. म्हणून तिने संकेत जे केमिकल विकत होता. तेच केमिकल आहे की नाही हे बघण्यासाठी अर्णवची मदत घेतली. त्यादिवशी रात्री बारा वाजता यासाठीच ती अर्णवला भेटलेली. पण अर्णवला परवानगी नसल्याने तिने कसबस ते केमिकल तपासले. त्यात तिला समजल की संकेत जे केमिकल विकत होता ते तेच केमिकल आहे. ज्याने जयप्रकाश आणि केशव लोकांना मारत होते. त्यादिवशी ती संकेतला जाब विचारण्यासाठी त्याला भेटलेली. पण दोघांमध्ये वाद होऊन , दोघांनी कोण जिंकेल ? म्हणून एकमेकांना चेलेंज केलेलं. तिला सगळ सत्य समजल्यावर तिने निर्णय घेतला , की काहीही झालं तरी याबद्दल पोलिसांना सांगून टाकू. पण मध्येच त्या जयप्रकाशची योजना तिला समजली, की तो शिबिरामध्ये बाटल्यांची हेराफेरी करण्यात येणार आहे. ती लोकांना त्रास नको म्हणून ती जिथे हेराफेरी करणार आहे त्या ठिकाणी हे सगळ होण्यापासून रोखण्यासाठी गेलेली. राहिली गोष्ट या लोकांनी अस का केल ? तर जे.पी यांना सेक्रेटरी व्हायचं होत. त्यांनी तस नावही दिलेल. पण लोकांनी त्यांना निवडून नाही आणलं. याचाच राग ते या लोकांवर काढत होते. त्यात जे.पी के.के कडून केमिकल विकत घेत होता. तर के.केला याचा फायदा होणार होता. मग काय चांगले पैसे भेटणार म्हणून के.के खुश होता. त्यात के.केने आपल्या मुलाला पण या कामामध्ये सामील करून घेतलं. "

आता समजल असेल सगळ सत्य मिस्टर विश्वा. "


रूनाली जे बोलली ते ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता. सोबत ती जे काही करत होती त्याच्या अभिमानही वाटत होता.


आतिश " खूपच धीट मुलगी आहे ही. "

रूनाली " मी तिच्यासोबत त्या ठिकाणी जाणार होती. मी तिथे गेलेली पण ती मला कुठेच दिसली नाही. मला काळजी वाटतेय. एकतर तिचा फोन पण लागत नाही आहे. "


विश्वा " तिला मी एका खोलीत बंद करून ठेवलं आहे. आणि ती खोली कोणाला दिसणार नाही अश्या ठिकाणी आहे. कदाचित तिथे रेंज नसणार म्हणून तिचा फोन लागत नसेल."

रूनाली " काय ? तू वेडा आहेस का ? अस कस तू तिला बंद करून ठेवू शकतो. "

साहिल " इथे बोलत बसून काही होणार नाही. आपल्याला तिथे जावं लागेल. आणि वेळ पण निघून जात आहे. लवकरच हे सगळ आपल्याला रोखायच आहे. "

साहिलच ऐकून सगळे निहारिकाकडे जाणार तर तिथे जयप्रकाश येतात.
जयप्रकाश कुत्सित हसत " जा.. जा.. आता खूप वेळ झाला, म्हणजे तिच्यावर केमिकलचा परिणाम झाला असेल. थोड्याचवेळात ती तुम्हाला सोडून कायमची निघुन जाईल. "

जयप्रकाशच ऐकून सगळ्यांना राग येतो. विश्वा त्यांची कॉलर पकडून रागात " तुझी हिंमत कशी झाली तिच्यासोबत अस करायची. "

जयप्रकाश हसत " त्रास तर तू पण तिला दिला आहे. "
त्यांच ऐकून तो शांत होतो.
त्याला शांत झालेल बघून जयप्रकाश कॉलर सोडवून घेत " तुम्हीच ठरवा लोकांना वाचवायचं की तुमच्या त्या जिवलग मैत्रिणीला." एवढ बोलून ते तिथून निघून जातात.


त्यांना गेलेल बघून विश्वा लगेच " तुम्ही इथे बघा. मी निहारिकाकडे जातो.  रूनाली तू पोलिसांना कळवून त्यांना सगळ सांग आणि ते पुरावे माहिती आहे का तिने कुठे ठेवले आहे ? "

रूनाली" हो माहिती आहे. "

विश्वा " मग ते पुरावे पोलिसांना दे. " बोलून विश्वा ताबडतोब तिथून निघून जातो.


विश्वाला गेलेल बघून बाकीचे पण लगेच जिथे पुरावे ठेवले आहेत तिथे जातात. त्यांना पुरावे निहारिकाच्या खोलीमध्ये एका ड्रॉवरमध्ये  लपवून ठेवले होते. त्या पुराव्यात त्यांना काही व्हिडीओ भेटलेले ज्यात जयप्रकाश , केशव आणि संकेत केमिकलची देवाणघेवाण करत होते.

थोड्याचवेळात तिथे पोलीस आले आणि तिघांनाही पकडून घेऊन गेले. पोलिसांनी तिघांना पकडल्यावर समजल की या तिघांनी निहारिकाला मारायची योजना आधीच आखली होती.त्या खोलीमध्ये दूर यांनीच सोडलं ज्यात केमिकल मिसळलं होत. त्यामुळे निहारिका बेशुध्द झालेली.

आधी सगळे लोक काही क्षण घाबरलेले पण नंतर आपल्यावरच संकट टळलं म्हणून त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


इथे विश्वा पोहोचला तर त्याला निहारिका बेशुध्द पडलेली दिसली. त्याने वेळ न दवडता तिला पटकन  दवाखान्यात घेऊन गेला.

दवाखान्यात गेल्यावर समजल की तिच्या शरीरात जास्त केमिकल नव्हता. त्यामुळे काही उपचाराने तिचा जीव वाचला होता. तिची आधी झालेली स्थिती बघून विश्वाला स्वतःचा खूपच राग येत होता.


सगळ सुरळीत झाल्यावर असेच दोन तीन दिवस निघून गेलेले. या तीन दिवसात निहारिका विश्वासोबत एकही शब्द बोलत नव्हती. विश्वा तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत होता. शेवटी त्याने काहीतरी योजना आखली आणि ती अमलात आणण्यासाठी कामाला लागला.


कॉलेजमध्ये..

निहारिका नेहमीप्रमाणे दहा मिनिटे अगोदर कॉलेजमध्ये आली. लेक्चर सुरू व्हायला वेळ आहे समजून ती कॅन्टीनच्या दिशेने आली. बघते तर विश्वा सर्वांसमोर माफीचं एक मोठं कार्ड घेऊन उभा होता.

तिला आलेल बघून विश्वा लगेच ते कार्ड बाजूला ठेवून पळत तिच्याजवळ आला. आणि गुडघ्यावर बसत तिच्यासमोर पिवळा गुलाब पडकून " निहारिका, मी तुला खूप त्रास दिला आहे. काही न समजून घेता तुझ्यावर दोष दिला. जेव्हा मला सगळ खर समजल, तेव्हा मला स्वतःचाच खूप राग आलेला. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला , त्यासाठी मी तुझी मनापासून माफी मागतो.

माझ्याशी मैत्री करायला आवडेल का तुला ?  "


निहारिका थोडा विचार करून त्याच्या हातातून ते पिवळा गुलाब घेत " हो , आवडेल तुझ्याशी मैत्री करायला."

निहारिकाचा होकार ऐकून साहिल आणि सिया " यासाठी पार्टी तर बनतेच. "

दोघांच्या बोलण्याला दुजोरा देत सगळे " हो. "

प्रफुल्ल फोन समोर पकडत सगळ्यांना " हे इथे बघा. "

सगळ्यांच लक्ष फोनमध्ये जात तर त्यांचा फ्रेंड झोनचा एक सेल्फी काढला जातो. तो सेल्फी आता एक गोड आठवण म्हणून फोनमध्ये कैद राहणार होती.