विश्वाने निहारिकाला अश्या प्रकारे उत्तर देणं हे बाकीच्यांना खटकल होतं. पण विश्वाचा चेहरा बघून सगळे नंतर बघू म्हणून गप्प बसले.
त्यांनी थोड्या गप्पा मारून ते आपापल्या घरी निघून गेले. त्यात गप्पा मारत असताना विश्वा गप्पच होता. साहिल सगळ्यांकडे बघत 'मी बघतो' म्हणून मुलांना इशाऱ्याने सांगितल. आपल्या घरी जात असताना साहिलने प्रफुल्ल आणि आतिशला घरी पाठवल. आणि तो विश्वाला घेऊन त्यांच्या बिल्डिंगच्या बागेमध्ये घेऊन गेला.
विश्वा " साहिल तू मला इथे का आणल आहेस."
साहिल " तू आधी मला हे सांग की निहारिकाला बघून तुझा चेहरा रागीट का झाला ? आणि तिच्यासोबत अस का वागला ?" जेव्हा सगळे बोलत होते तेव्हा विश्वा शांत उभा होता आणि जस तो तिला बघायचा तस त्याच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला राग दिसून येत होता.हे विश्वाचे बदलणारे हावभाव साहिलने बघितलेले.तसेच मुली सोडून प्रफुल्ल आणि आतिशने पण बघितलेले. त्यावरून समजल की नक्की काहीतरी झाल आहे. म्हणून साहिल त्याला जाब विचारण्यासाठी बागेत घेऊन आला.
विश्वा तिरकसपणे " वाईट लोकांना वाईटच वागणूक द्यायची असते."
साहिल " म्हणजे ?"
विश्वा " सांगतो, त्या ग्रीन वूड बिल्डिंगमध्ये खूनबद्दल मी दोन तीन दिवस अगोदर एका माणसाकडून ऐकलं होतं. पण मला वाटतं या खुनामागे निहारिकाचा हात आहे. मी काल तिला एका मुलासोबत बोलताना बघितल होत."
साहिल " काय ? तुला वेड लागलंय का विश्वा ? ती अस का करेल ? एक महिना अगोदरच ओळख झाली तिच्यासोबत. मी तिला चांगल ओळखतो. ती अस नाही करणार. तुझा गैरसमज झाला आहे."
विश्वा " तू काहीही बोल तिच्याबद्दल पण मी निश्चितपणे सांगू शकतो की या खूनामागे तिचाच हात आहे."
साहिल " तू अस कस बोलू शकतो.तिच्याबद्दल पुरावा आहे का तुझ्याकडे ?"
विश्वा " नाही, पण आज रात्री बारा वाजता समजेल. मी तिला एका मुला सोबत बोलताना ऐकलं होत की ती आज रात्री बारा वाजता भेटणार त्याला."
साहिल " शक्य नाही. तुझा गैरसमजच झाला आहे अस दिसतंय."
विश्वा " तू माझ्यासोबत नाही आला तरी चालेल मीच जाईन एकटा आणि पुरावा शोधून तिला पकडेन."
साहिल " ठीक आहे कर तुला काय करायचं ते. पण शंभर टक्के सांगतो की निहारिका अस काही करणार नाही."
विश्वा " ठीक आहे बघुया."
ते दोघे बोलून आपल्या घरी निघून जातात.
भूतकाळ..
सकाळची वेळ ११:००
लायब्ररीमध्ये..
विश्वा लायब्ररीमध्ये जात असताना त्याला दोन जणांचा हळू बोलण्याचा आवाज येत होता. त्या दोन जणांच्या मुखातून ग्रीन वूड बिल्डिंगच नाव ऐकून तो त्यांना दिसणार नाही अश्या ठिकाणी त्यांच्या जवळ थांबतो आणि कान देऊन त्यांच बोलण ऐकतो.
ते दोन जण निहारिका आणि अर्णव असतात. विश्वाने फक्त त्या दोघांचं शेवटचं बोलण ऐकल होत.
निहारिका " ग्रीन वूड बिल्डिंगच्या पाठी मागे रात्री बारा वाजता भेटू आणि सोबत ते कॅमिकल पण आण. "
अर्णव " हो समजल. आणि हो हे कोणाला समजायला नाही पाहिजे की मी तुझी मदत करतोय."
निहारिका " हो, हे कोणाला नाही समजणार." बोलून दोघ तिथून निघून जातात. तर इथे त्यांच बोलण ऐकून विश्वाचा चेहरा रागाने लालबुंद होतो.
यावरून विश्वाचा गैरसमज होतो. त्याला वाटत की निहारिका हे सर्व करत आहे.
निहारिका दिसायला एकदम सुंदर कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी. राहणीमान एकदम साध , अभ्यासामध्ये हुशार , सगळ्यांना प्रेमाने समजावणारी , राग कमी पण एकदा राग आला की तिला शांत करणे खूप अवघड होत असे. तिच्या घरी आई गृहिणी तर बाबा एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आणि लहान भाऊ दहावीत शिकत होता.
निहारिका, सिया , प्रिया आणि रूनाली या चौघींची ओळख पहिल्या वर्षाला कॉलेजमध्ये होते. हळूहळू यांची मैत्री घट्ट होत जाते. या चौघी एकमेकांना मदत करत आणि मज्जा मस्ती करत जीवन जगत होत्या.
संकेतच घर..
संकेत आणि त्याचे वडील कोणत्यातरी गहन गोष्टीवर बोलत होते.
संकेत " बाबा , ते केमिकल विकण्यासाठी मी तुमची मदत करेन. "
संकेतचे वडील " हो , पण ही गोष्ट कोणालाही समजायला नाही पाहिजे समजल. "
संकेत " हो बाबा. तुम्ही काळजी करू नका. मी याबद्दल कोणालाच समजू देणार नाही. "
संकेतचे वडील " हा , तेवढा विश्वास आहे तुझ्यावर. ( सोफ्यावरून उठत ) मी आलोच माझ्या साथीदाराला भेटून." बोलून घराबाहेर निघून गेले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा