"नवऱ्याची व मुलींची वाट बघत असता सुकन्या गॅलरीत बसली होती... संध्याकाळची काम तिची झालीच होती...
आणि असेही दररोज तिला ते येण्याअगोदर सगळी काम आटपून मुलीच्या आणि नवऱ्याच्या सेवेसाठी हजर व्हावे लागायचे..
आणि असेही दररोज तिला ते येण्याअगोदर सगळी काम आटपून मुलीच्या आणि नवऱ्याच्या सेवेसाठी हजर व्हावे लागायचे..
नाहीतर नवरा ओरडायचा दिवसभर काय करतेस अजून तुझी काम पडलेलीच आहेत...
म्हणून ती उगाच घरात भांडण नको म्हणून ती अगोदरच सगळं करून ठेवायची...
आज सुद्धा सगळ आटोपून सांजवेळचं निरीक्षण करत ती बसली होती..
आजकाल तिला ही सांजवेळ जास्तच खायला उठायची...
तिच्या मनात या सांजवेळ बद्दल उगाच मनात यायचं
कधी कधी कातरवेळ ही
खूपच उदास भासते
अशी कातरवेळ सारखंच
मन सुद्धा कातर होते..
खूपच उदास भासते
अशी कातरवेळ सारखंच
मन सुद्धा कातर होते..
हृदयातली अबोल स्पंदने
आपोआपच धडधडतात
भूतकाळातल्या आठवणींना
उजाळा देत राहतात..
आपोआपच धडधडतात
भूतकाळातल्या आठवणींना
उजाळा देत राहतात..
मन खूपच बेचैन होतं
डोळे उगाच झिरपू लागतात
हृदयात लपलेले आपलेच
उगाच आठवत राहतात..
डोळे उगाच झिरपू लागतात
हृदयात लपलेले आपलेच
उगाच आठवत राहतात..
संध्या च्या सूर्यास्ताप्रमाणेच
मन खूप निस्तेज होत जाते
थोड्यावेळापूर्वीचे रंगीन आभाळ
जसे आपोआप रंगहीन होते..
मन खूप निस्तेज होत जाते
थोड्यावेळापूर्वीचे रंगीन आभाळ
जसे आपोआप रंगहीन होते..
गुलाबी थंडीतले थंड वारे
जसे अंगाला बोचत राहतात
मनातल्या कडू गोड आठवणी
सुद्धा उगाच उजाडल्या जातात.
जसे अंगाला बोचत राहतात
मनातल्या कडू गोड आठवणी
सुद्धा उगाच उजाडल्या जातात.
आणि खरोखरच तिचे डोळे भरून आले... तिच्या चिमुकल्याच्या आठवणींनी...
"तिला आठवले ते दिवस... आज पर्यंत तिने जगलेले आयुष्य... विचार करता करता ती भूतकाळात गेली...
तिचा घडून गेलेला भूतकाळ
******
******
"तिचे नाव सुकन्या रामभाऊ देसले तिच्या माहेरचे शाळेत असतानाचे हे नाव..
ती यावर्षी नववीला होती... नुकतच पंधराव वर्ष सोडून सोळावं लागलं होतं..
आज पर्यंत ती आई बाबा भाऊ बहीण सगळ्यांची अगदी लाडकी होती... सगळेजण तिला घरात लाडू बाई म्हणून लाडाने बोलवायचे...
मात्र बाबांनी तिचं नाव आवडीने सुकन्या ठेवलं होतं...
घरात सगळ्यात लहान शेंडेफळ म्हणून तिचं खूप कौतुकच व्हायचं..
गावातल्या शाळेत दहावीपर्यंत शाळा होती तिथं ती जायची...
सगळ्यात मोठा भाऊ सुरज आणि त्याच्या पाठची एक बहीण सुरेखा आणि ती सुकन्या...
सुरेखा ताई तिची मोठी ताई, सातवीत असतानाच तिचं लग्न झालं होतं...
सुकन्या, मात्र मला शाळेत जायचय शाळा शिकून मास्तरीन व्हायचंय हा हट्ट करायची म्हणून नववी पर्यंत ती शिकली... आणि यंदा नववीला चांगले मार्क मिळाले ही होते दहावीला जाणार होती..
"ती अती लाडाने असेल कदाचित पण एकदम बिनधास्त जगणारी.. मनाला पटेल तसं वागणारी... खूप मोठ्याने खडखडून हसणे मोठ्याने बोलणे.. हा तर तिचा स्वभावच होता... स्वभाव बोलका असल्यामुळे सगळ्यांशीच तिची मैत्री असायची...
शाळेत जायला लागली किंवा गल्लीतून असंच चालत राहिली की तिचं तोंड मात्र गुपचूप बसत नसायचं..
समोरची वेनू आजी दिसली की तिला म्हणायचं अग आजी हाड मोडतील ना गुपचूप घरात बस कुठे चढते त्या धाब्यावर... सतत कामच करत असते...
आणि आजीचं लक्ष नाही हे बघून आजीने वाळत घातलेली तीळ किंवा शेंगा मूठ भरायची आणि पटकन निघून जायची
आजी म्हणायची हो का मग ये ना तू माझ्यावाटची काम करायला...
बघते तर तिचा पत्ताच नाही आजी ओरडायची चोर कुठली...
लगेच पुढे जाऊन भुऱ्या दादा भाकरी करायला बसलेला असायचा... त्याला बोलायचं अरे दादा बायको केव्हा आणशील घरात.. कुठपर्यंत हाताने भाकरी बनवशिल....?
तो म्हणायचा," जा तूच शोधून आण ना मग तुझ्या वहिणीला...
रस्त्याने लहान मुलांचे डोक्यावर मारायचं कुणाचे गाल ओढायचे असं करतच ती शाळेत पोहोचायची...
शाळेत सुद्धा बडबड शाळेतले सर खूप बोलायचे... ती थोडा वेळ गुपचूप बसायचे नंतर सतत बक बक सुरु व्हायची तिची...
सर गावातलेच ओळखीचे असल्यामुळे... लगेच म्हणायचे की कुणाचं नशीब फोडशील काय माहित तू... बिचाऱ्याचे कान किटतील तुझ्या बक बकने...सगळी मुलं हसायची...
ती म्हणायची, " मला लग्नच करायचं नाही..
"गल्लीत शेजारी पाजारी सगळेच तिला कोणी लाडू बाई कोणी सुकन्या म्हणून हाक द्यायचे सगळेच तिच्याशी बोलायचे ती पण मनमोकळे सगळ्यांना बोलायची...
आणि एवढी बिनधास्त की तिला काही विचारायला लाज म्हणजे बिलकुल वाटायची नाही...
एकदा तिची आई आणि शेजारची कमल काकू गप्पा करत होते... तिने आईला विचारले.. अग आई न्हान येणे म्हणजे काय ग?
तिचा प्रश्न ऐकून कमल काकू तोंडाला पदर लावून हसू लागली... आई म्हणाली, " ओय! निर्लज्ज कुठली, " कुठेही काही विचारतेस का ग! लगेच आईने उंच मान करून तिच्या वडिलांकडे बघितले... आणि म्हणाली, " तुझ्या जिभेला काही हाडच नाही बरं तुझे बाबा इथे नाही... पुरुषां समोर असं बोलले तर किती लाजिरवाणी आहे ही गोष्ट...
तिच्या बाल मनाला प्रश्न पडायचा की यात लाजिरवाणी गोष्ट मी काय केलं?
कमल काकू म्हणाले, " अग एवढी मोठी घोडी झाली तरी हिला अजून काहीच कसं माहित नाही ग बाई पक्की वेंधळी आहे तुझी मुलगी... एवढ्या एवढ्या लहान लहान मुली किती हुशार असतात... आणि ही फक्त बोलण्यातच पटाईत आहे...
इतक्यात सुकन्याच्या आईने तिला खाली बसवलं हा प्रश्न तुझ्या मनात कसं काय आला... तुला आले का ग न्हान...
सुकन्या म्हणाली, " अग आई मी पुष्पी च्या घरी अभ्यासाला गेली होती.. अभ्यास करून घरी येण्यासाठी निघाले तर पुष्पी ची आई म्हणाली, "अगं लाडू तुला न्हान आले बघ, अजून प्रथमच आलं का ग या अगोदर नव्हतं का?
तर मी त्या मावशीच्या तोंडाकडे बघायला लागली... आणि विचारलं म्हणजे काय असतं ग मावशी?
तर ती मावशी हसायला लागली खुळीच दिसते बाई... बघ तुझे कपडे कसे भरले आहेत मागे... चल पटकन जा घरी आणि आईला सांग... पुष्पा हिला सोबत घेऊन जा ग!
मग पुष्पी म्हणाली, " अगं मला एक वर्षापासून झालं असं...आणि तुला आता...
आई, ' त्या दोघी मला काहीच सांगत नव्हत्या म्हणून मी पटकन इथे आली मला कसतरीच होतंय ग आई माझ्या पोटात पण दुखतंय....हे असं काय झालं ग मला.... आणि सुकन्या रडू लागली..
कमल काकू म्हणाली," अगं वेडपट माय! रडतीस कशाला... सगळ्यांना होत असं त्यात तुलाही झालं त्यात काय नवल... आता तू मोठी झालीस... त्याचीच ही लक्षणे...
सुकन्या म्हणाली, " म्हणजे मग आता काय होणार?
काहीच नाही तुझं लवकर लग्न करावे लागेल... मुलगी मोठी झाली की तिचं लवकर लग्न करून द्यावं लागतं...
सुकन्या लगेच तिथल्या तिथे उड्या मारू लागली आणि रडू लागली नाही मला अजून लग्न करायचं नाही मला दहावी शिकून डीएड करायचं आहे आणि मास्तरीन व्हायचं आहे... उगाच काय पण बोलू नको काकू...
कमल काकू उठली आणि घरी निघाली आणि जाता जाता म्हणाली अति लाडाचे हे परिणाम आहेत मुलीच्या जातीचे एवढे लाड नको करायला पण तुमच्या घरात खूपच लाड होतात तिचे म्हणून ही अशी वातरली...
आई उठली तिच्या बखुटीला धरलं आणि तिला न्हाणी घरात घेऊन गेली...
त्यानंतर त्यांच्या घरात एक खोली होती तिथे तिला बसवलं आणि सांगितलं की चार दिवस पर्यंत तू इथेच बसायचं इथेच तुला जेवण वगैरे सगळं मिळेल... इकडे तिकडे वस्तूंना हात लावू नको....
देवघरात जाऊ नकोस... सुकन्या म्हणाली," अग आई मी माझ्या कान्हाचे दर्शन घेतल्या वाचून जेवायला बसत नाही आणि असं कसं सांगतेस तू?
आई त्रासून म्हणाली, " काही नको घेऊ चार दिवस दर्शन,' काही बिघडणार नाही मनातल्या मनात घे वाटल्यास तस चालेल...
तिला आश्चर्य वाटले अरे बापरे एवढे मोठे संकट आजपर्यंत दोन मिनिट एका जागी न बसणारी चार दिवस पर्यंत खोलीतच राहायचं तिथेच झोपायचं खायचं प्यायचं सगळं तिथेच कसं होईल माझं हे असं काय असतं... आणि मुलींनाच का?
तिने लगेच भोळेपणाने प्रश्न विचारला आई मुलांना पण येते का असं न्हान... आई तिच्यावर जोराने ओरडली... ए गप बस ग... वेड्यासारखी काही पण काय बोलतेस... बेअक्कल कुठली .... आता बोलली पुन्हा असा शब्द बोलू नकोस निदान कुठल्या पुरुषां समोर तरी बोलू नकोस खूप लाज विकून खाल्ली तु... वेडपट कुठली....
तिला कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नीट मिळत नव्हतं...तिच्या मनात येणारे सगळे प्रश्न अनउत्तरीतच होते मनातच घुटमळत होते...
तिला पण काहीच कळत नव्हतं...
त्यानंतर तिच्यावर रोखठोक सुरू झाले... एकटी दुखटी कुठे जाऊ नकोस... मुलांसोबत बोलू नकोस... एवढेच काय ती घरात तिच्या बाबांना दादाला अगोदर बिनधास्त त्यांच्या गळ्यात हात टाकून गप्पा करायची... आता मात्र आईने त्यांच्यापासून सुद्धा लांबच राहायला सांगितलं दुरूनच बोलायला सांगितलं...
हे मात्र तिच्या भोळ्या भाबड्या मनाला पडलेले एक कोडंच होतं... हे असं काय सुरू आहे माझ्यासोबत तिला काहीच कळत नव्हतं...
उत्तर फक्त तीला एवढेच मिळायची की आता तू मोठी झालीस... तुला शहाण्यासारखं वागावे लागेल...
तिच्या मनात एक वेळ असा विचार यायचा की मोठे होण्याची एवढी चूक असते... आणि एवढी शिक्षा भोगावी लागते... त्यापेक्षा आपण लहानच बरे होतो...
**************************वाचा आता पुढच्या भागात
....क्रमशा...