सुमित्रा
©® सौ.हेमा पाटील.
दारावरची बेल वाजली तशा सुमित्राबाई दचकल्या.आत्ता या दुपारच्या वेळी कोण आले असा विचार करेपर्यंत परत बेल वाजली.काहीशा अनिच्छेनेच त्या दार उघडायला गेल्या.दारात उभ्या असलेल्या रमाबाईंना पाहून त्या म्हणाल्या, "तुम्ही? आत्ता यावेळी"?
रमाबाई म्हणाल्या, "आत येऊ का" ?
असे म्हणत त्या आत शिरल्या सुद्धा...
रमाबाई म्हणाल्या, "आत येऊ का" ?
असे म्हणत त्या आत शिरल्या सुद्धा...
दार लावत सुमित्रा बाई आत वळल्या तोपर्यंत रमाबाईंनी सोफ्यावर ऐसपैस बैठक मारली होती व शोधक नजरेने इकडेतिकडे पहात होत्या.
"मला जरा पाणी देता का"? असे म्हंटल्यावर सुमित्रा बाईंनी स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचे तांब्या भांडे आणले. फुलपात्र भर पाणी घटाघटा पिऊन रमाबाईंनी तांब्या भांडे खाली ठेवले.सुमित्राबाईंच्या प्रश्नार्थक नजरेकडे दुर्लक्ष करत त्यांनी विचारले,
"माधुरी दिसत नाही.बाहेर गेली आहे का"?
या प्रश्नामुळे सुमित्रा बाई जरा गडबडल्या,पण लगेच स्वतःला सावरत म्हणाल्या, " हो.तिच्याकडे तुमचे काम होते का? ती गावाला गेली आहे.चार दिवस येणार नाही.त्यामुळे चार दिवसांनी या".
या वाक्याचा रोख सरळसरळ रमाबाईंनी तिथून फुटावे असा होता.तो रमाबाईंना न कळण्याइतक्या त्या मुर्ख नव्हत्या.परंतु कळून न कळल्या सारखे करत त्या तिथेच बसून राहिल्या.
"मला जरा पाणी देता का"? असे म्हंटल्यावर सुमित्रा बाईंनी स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचे तांब्या भांडे आणले. फुलपात्र भर पाणी घटाघटा पिऊन रमाबाईंनी तांब्या भांडे खाली ठेवले.सुमित्राबाईंच्या प्रश्नार्थक नजरेकडे दुर्लक्ष करत त्यांनी विचारले,
"माधुरी दिसत नाही.बाहेर गेली आहे का"?
या प्रश्नामुळे सुमित्रा बाई जरा गडबडल्या,पण लगेच स्वतःला सावरत म्हणाल्या, " हो.तिच्याकडे तुमचे काम होते का? ती गावाला गेली आहे.चार दिवस येणार नाही.त्यामुळे चार दिवसांनी या".
या वाक्याचा रोख सरळसरळ रमाबाईंनी तिथून फुटावे असा होता.तो रमाबाईंना न कळण्याइतक्या त्या मुर्ख नव्हत्या.परंतु कळून न कळल्या सारखे करत त्या तिथेच बसून राहिल्या.
आता सुमित्रा बाईंपुढे दुसरा पर्यायच उरला नसल्याने त्या ही सोफ्यासमोरच्या खुर्चीवर बसल्या.
रमाबाई व सुमित्राबाई दोघीही एकाच माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याने रमाबाईंना अधिक तोडून बोलणे सुमित्रा बाईंना शक्य झाले नाही.खरे तर गेले दोन दिवस त्यांनी कामवालीला ही सुट्टी दिली होती. "गावी जाणार आहे, त्यामुळे मी निरोप दिल्याशिवाय येऊ नकोस" असे सांगितले होते. एकाच शहरात रहात असल्याने रमाबाईंकडेही तीच कामवाली होती.ती गेले दोन दिवस लवकर कामाला येत असल्याने त्यांनी सहजच तिला विचारले,"काय गं..लवकर येतेस.रोजच्या वेळेप्रमाणे माझे उरकले नाही".
तेव्हा ती म्हणाली," तुमच्या काळे बाई गावाला गेलेत ना.. त्यांच्या कामावर सुट्टी आहे,त्यामुळे लवकर येते".
यावर रमाबाई संभ्रमात पडल्या.काल तर काळे बाई शाळेत आल्या होत्या,परवा ही होत्या.आणि त्यांची नातवंडे ही दिसली होती शाळेत..मग काय झाले असावे? हा विचार त्यांना चैन पडू देईना.त्यामुळे रविवारची दुपार असूनही कामे लवकर उरकून त्या सुमित्राबाईंकडे येऊन पोहोचल्या होत्या.
सुमित्रा बाई तर होत्या, नातवंडांचाही आतल्या खोलीतून आवाज येत होता.मुलांना ठेवून माधुरी एकटीच गावाला कशी काय गेली असा विचार रमाबाईंच्या मनात आला.माधुरी नसताना काळेबाईंनी कामवालीला सुट्टी दिल्यामुळे रमाबाई बुचकळ्यात पडल्या होत्या.
तेव्हा ती म्हणाली," तुमच्या काळे बाई गावाला गेलेत ना.. त्यांच्या कामावर सुट्टी आहे,त्यामुळे लवकर येते".
यावर रमाबाई संभ्रमात पडल्या.काल तर काळे बाई शाळेत आल्या होत्या,परवा ही होत्या.आणि त्यांची नातवंडे ही दिसली होती शाळेत..मग काय झाले असावे? हा विचार त्यांना चैन पडू देईना.त्यामुळे रविवारची दुपार असूनही कामे लवकर उरकून त्या सुमित्राबाईंकडे येऊन पोहोचल्या होत्या.
सुमित्रा बाई तर होत्या, नातवंडांचाही आतल्या खोलीतून आवाज येत होता.मुलांना ठेवून माधुरी एकटीच गावाला कशी काय गेली असा विचार रमाबाईंच्या मनात आला.माधुरी नसताना काळेबाईंनी कामवालीला सुट्टी दिल्यामुळे रमाबाई बुचकळ्यात पडल्या होत्या.
शाळेत एकत्र काम करत असल्याने सुमित्राबाईंनी नाईलाजास्तव का होईना चहाचे आधण गॅसवर चढवले.त्यांच्या मागोमाग रमाबाई आत स्वयंपाकघरात गेल्या.त्या आत आलेल्या पाहून सुमित्रा बाई जरा कावऱ्याबावऱ्या झाल्या हे रमाबाईंच्या नजरेतून सुटले नाही.
चहा उकळेपर्यंत दोघींच्या अवांतर गप्पा सुरू होत्या.शाळेतील घडलेल्या गोष्टींवर बोलत बोलत त्यांनी दोघींना कपबशीत चहा गाळला.त्या चहा गाळत असताना बाथरुममधून कसला तरी अस्पष्टसा आवाज ऐकू आला.पण बोलण्याच्या नादात रमाबाईंच्या लक्षात आले नाही. सुमित्रा बाईंनी नातवंडांसाठी थोडा चहा व थोडे दूध मिक्स करुन कपांमध्ये ओतले व बशीत बिस्कीटे काढून एक बिस्कीटांची बशी व चहाची कपबशी रमाबाईंकडे सरकवली व नातवंडांना आतल्या रुममध्ये चहा बिस्किटे घेऊन गेल्या.
तेवढ्यात आत स्वयंपाकघराजवळ असलेल्या बाथरुम मधून कसला तरी आवाज आला.कसला आवाज येतोय याचा कानोसा घेतला, पण रमाबाईंना नीटसे कळले नाही. तेवढ्यात सुमित्रा बाई परत आल्या.दोघींनी चहा घेतला.रमाबाईंचे सगळे लक्ष बाथरुमकडे लागले होते.परत काही आवाज येतोय का यासाठी त्या कान टवकारुन ऐकत होत्या.
सुमित्रा बाईंना आपल्याला निरोप द्यायची फार घाई झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले.त्यामुळे चहा पिऊन होताच हळदीकुंकवाचा करंडा घेऊन त्या हळदीकुंकू लावण्यासाठी समोर उभ्या राहिल्या तेव्हा नक्कीच काहीतरी पाणी मुरतेय हे रमाबाईंच्या लक्षात आले.त्यांनी एकमेकींना हळदीकुंकू लावले आणि रमाबाईंनी आपली पर्स उचलली हे पाहून सुमित्रा बाईंनी निःश्वास सोडला हे रमाबाईंच्या नजरेतून सुटले नाही.
रमाबाईंनी उचललेली पर्स परत टेबलावर ठेवली . त्या टाॅयलेटच्या दिशेने चालू लागल्या हे पाहून सुमित्रा बाई गडबडल्या.
"कुठे चाललात"? असे त्यांनी रमाबाईंना विचारले.
"अहो मला शुगरचा त्रास आहे, तुम्हाला माहीतच आहे.जरा जाऊन येते". असे करंगळी दाखवत रमाबाई म्हणाल्या. सुमित्रा बाई तिथेच उभ्या राहिल्या.रमाबाई दार उघडून बाहेर येईपर्यंतचा काळ त्यांना युगानुयुगाचा वाटला.त्या बाहेर आल्या तेव्हा सुमित्रा बाईंना हायसे वाटले.पण त्या जेव्हा बाथरुम कडे वळल्या तेव्हा सुमित्रा बाई जोरात ओरडल्या,"बाथरुम कडे जायचे नाही".
प्रश्नार्थक मुद्रेने सुमित्रा बाईंकडे पहात रमाबाई तिथेच थांबल्या.
"अहो, मला पायावर पाणी घ्यायचेच.घरी जाताना मी विष्णू मंदिरात जाणार आहे.अशीच कशी जाऊ"?
यावर सुमित्रा बाई म्हणाल्या,"ते काही मला माहीत नाही.पण बाथरुम कडे जायचे नाही".
"का बरं? यापूर्वी अनेकदा गेलेय की तुमच्या बाथरुममध्ये"?
"पण आज जायचे नाही".
"पण का"?
यावर सुमित्रा बाईंना अचानक कारण सुचले.त्या म्हणाल्या, "बाथरुममध्ये फरशा निघाल्या होत्या म्हणून बसवलेत.त्यावर पाणी पडू द्यायचे नाहीय.तुम्ही बाहेरच्या नळावर पाय धुवा".
तेवढ्यात बाथरुम मधून हळू आवाजात हुंकारल्याचा आवाज आला.तो ऐकून रमाबाईंनी ठरवले आता काहीही झाले तरी बाथरुमचे दार उघडायचेच.एवढे सांगूनही रमाबाई पुन्हा बाथरुमकडेच वळलेल्या पहाताच सुमित्रा बाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली.रमाबाईंच्या हाताला धरुन त्यांना तेथून बाहेर ओढण्याचा प्रयत्न त्या करु लागल्या.त्यामुळे तर रमाबाई अधिकच हट्टाला पेटल्या व सुमित्रा बाईंच्या विरोधाला न जुमानता त्यांनी झटापट सुरू असतानाही चपळाईने बाथरुम ची कडी काढली व जोराने दार ढकलले.आता सुमित्रा बाईंचा विरोध लटका पडला होता,कारण समोरचे दृश्य पाहून रमाबाई अचंबित झाल्या होत्या.
चहा उकळेपर्यंत दोघींच्या अवांतर गप्पा सुरू होत्या.शाळेतील घडलेल्या गोष्टींवर बोलत बोलत त्यांनी दोघींना कपबशीत चहा गाळला.त्या चहा गाळत असताना बाथरुममधून कसला तरी अस्पष्टसा आवाज ऐकू आला.पण बोलण्याच्या नादात रमाबाईंच्या लक्षात आले नाही. सुमित्रा बाईंनी नातवंडांसाठी थोडा चहा व थोडे दूध मिक्स करुन कपांमध्ये ओतले व बशीत बिस्कीटे काढून एक बिस्कीटांची बशी व चहाची कपबशी रमाबाईंकडे सरकवली व नातवंडांना आतल्या रुममध्ये चहा बिस्किटे घेऊन गेल्या.
तेवढ्यात आत स्वयंपाकघराजवळ असलेल्या बाथरुम मधून कसला तरी आवाज आला.कसला आवाज येतोय याचा कानोसा घेतला, पण रमाबाईंना नीटसे कळले नाही. तेवढ्यात सुमित्रा बाई परत आल्या.दोघींनी चहा घेतला.रमाबाईंचे सगळे लक्ष बाथरुमकडे लागले होते.परत काही आवाज येतोय का यासाठी त्या कान टवकारुन ऐकत होत्या.
सुमित्रा बाईंना आपल्याला निरोप द्यायची फार घाई झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले.त्यामुळे चहा पिऊन होताच हळदीकुंकवाचा करंडा घेऊन त्या हळदीकुंकू लावण्यासाठी समोर उभ्या राहिल्या तेव्हा नक्कीच काहीतरी पाणी मुरतेय हे रमाबाईंच्या लक्षात आले.त्यांनी एकमेकींना हळदीकुंकू लावले आणि रमाबाईंनी आपली पर्स उचलली हे पाहून सुमित्रा बाईंनी निःश्वास सोडला हे रमाबाईंच्या नजरेतून सुटले नाही.
रमाबाईंनी उचललेली पर्स परत टेबलावर ठेवली . त्या टाॅयलेटच्या दिशेने चालू लागल्या हे पाहून सुमित्रा बाई गडबडल्या.
"कुठे चाललात"? असे त्यांनी रमाबाईंना विचारले.
"अहो मला शुगरचा त्रास आहे, तुम्हाला माहीतच आहे.जरा जाऊन येते". असे करंगळी दाखवत रमाबाई म्हणाल्या. सुमित्रा बाई तिथेच उभ्या राहिल्या.रमाबाई दार उघडून बाहेर येईपर्यंतचा काळ त्यांना युगानुयुगाचा वाटला.त्या बाहेर आल्या तेव्हा सुमित्रा बाईंना हायसे वाटले.पण त्या जेव्हा बाथरुम कडे वळल्या तेव्हा सुमित्रा बाई जोरात ओरडल्या,"बाथरुम कडे जायचे नाही".
प्रश्नार्थक मुद्रेने सुमित्रा बाईंकडे पहात रमाबाई तिथेच थांबल्या.
"अहो, मला पायावर पाणी घ्यायचेच.घरी जाताना मी विष्णू मंदिरात जाणार आहे.अशीच कशी जाऊ"?
यावर सुमित्रा बाई म्हणाल्या,"ते काही मला माहीत नाही.पण बाथरुम कडे जायचे नाही".
"का बरं? यापूर्वी अनेकदा गेलेय की तुमच्या बाथरुममध्ये"?
"पण आज जायचे नाही".
"पण का"?
यावर सुमित्रा बाईंना अचानक कारण सुचले.त्या म्हणाल्या, "बाथरुममध्ये फरशा निघाल्या होत्या म्हणून बसवलेत.त्यावर पाणी पडू द्यायचे नाहीय.तुम्ही बाहेरच्या नळावर पाय धुवा".
तेवढ्यात बाथरुम मधून हळू आवाजात हुंकारल्याचा आवाज आला.तो ऐकून रमाबाईंनी ठरवले आता काहीही झाले तरी बाथरुमचे दार उघडायचेच.एवढे सांगूनही रमाबाई पुन्हा बाथरुमकडेच वळलेल्या पहाताच सुमित्रा बाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली.रमाबाईंच्या हाताला धरुन त्यांना तेथून बाहेर ओढण्याचा प्रयत्न त्या करु लागल्या.त्यामुळे तर रमाबाई अधिकच हट्टाला पेटल्या व सुमित्रा बाईंच्या विरोधाला न जुमानता त्यांनी झटापट सुरू असतानाही चपळाईने बाथरुम ची कडी काढली व जोराने दार ढकलले.आता सुमित्रा बाईंचा विरोध लटका पडला होता,कारण समोरचे दृश्य पाहून रमाबाई अचंबित झाल्या होत्या.
बाथरुममध्ये सुमित्रा बाईंची सून माधुरी होती. तिचे हातपाय बांधले होते.तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता आणि तशा अवस्थेत तिला बाथरुममध्ये कोंडून ठेवले होते.तिच्या अंगावर मारल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या.काळेनिळे वळ ही उठले होते..
सुन्न होऊन रमाबाई हे दृश्य पहात असतानाच आतल्या खोलीत असलेली सुमित्राबाईंची दोन्ही नातवंडे धावतच बाथरुममध्ये शिरली व आईच्या अंगावर पडून तिला मिठी मारुन तिला बिलगून "आई, आई" करत रडू लागली.आईच्या अंगावर असलेल्या माराच्या वळांवरुन हात फिरवू लागली.आईच्या तोंडावरुन हात फिरवत एक नजर आज्जीकडे टाकून तिच्या वटारलेल्या डोळ्यांकडे बावरुन पहात रडू लागली.
हे पाहून रमाबाईंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
"हा काय प्रकार आहे काळे बाई"? असा प्रश्न त्यांनी सुमित्रा बाईंना विचारला.
"हा आमचा घरगुती प्रश्न आहे.तुमचा याच्याशी काय संबंध? चालू लागा". असे उलट सुमित्राबाईंनीच रमाबाईंना सुनावले.
सुन्न होऊन रमाबाई हे दृश्य पहात असतानाच आतल्या खोलीत असलेली सुमित्राबाईंची दोन्ही नातवंडे धावतच बाथरुममध्ये शिरली व आईच्या अंगावर पडून तिला मिठी मारुन तिला बिलगून "आई, आई" करत रडू लागली.आईच्या अंगावर असलेल्या माराच्या वळांवरुन हात फिरवू लागली.आईच्या तोंडावरुन हात फिरवत एक नजर आज्जीकडे टाकून तिच्या वटारलेल्या डोळ्यांकडे बावरुन पहात रडू लागली.
हे पाहून रमाबाईंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
"हा काय प्रकार आहे काळे बाई"? असा प्रश्न त्यांनी सुमित्रा बाईंना विचारला.
"हा आमचा घरगुती प्रश्न आहे.तुमचा याच्याशी काय संबंध? चालू लागा". असे उलट सुमित्राबाईंनीच रमाबाईंना सुनावले.
"अहो, लग्नाला दहा वर्षे झाली तुमच्या मुलाच्या..इतक्या वर्षांनंतरही सुनेची ही अवस्था? माणसे आहात की हैवान? थांबा आत्ताच पोलिसांना बोलावते".
"तुम्हाला हिचे गुण माहीत आहेत का? आल्या मोठ्या पोलिसांची भीती घालणाऱ्या..जा जा ! करा काय करायचेय ते ! कुणी आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही".
"तुम्हाला हिचे गुण माहीत आहेत का? आल्या मोठ्या पोलिसांची भीती घालणाऱ्या..जा जा ! करा काय करायचेय ते ! कुणी आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही".
रमाबाईंनी एकवार माधुरी कडे पाहिले.तिची दयेची याचना करणारी दृष्टी पाहून त्यांनी मनाशी काहीतरी निश्चय केला. माधुरीचे हातपाय सोडवण्यासाठी त्या पुढे झाल्या तसे सुमित्रा बाईंनी त्यांना मागे खेचले.पण त्यांना बाजूला सारत रमाबाईंनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. हे पाहून लेकरांनी पण आपल्या आईचे हातपाय सोडवणे सुरू केले.हे पाहून नातवंडांवर डोळे वटारत कर्कश आवाजात सुमित्रा बाई म्हणाल्या, "विसरला का पोरांनो! बाबांना कळले तर किती मार बसेल याचा विचार केला आहे का"?
हे ऐकून क्षणभर मुले बावरली.त्यांच्या डोळ्यात माराची भीती स्पष्टपणे उमटली.पण पुढच्याच क्षणी त्या भीतीवर आईच्या ममतेने मात केली व तिघे मिळून माधुरीला सोडवू लागले.हे पाहून सुमित्रा बाईंच्या अंगाचा तिळपापड झाला.त्यांनी आपल्या मुलाला फोन लावला,पण नेमकी लाईन व्यस्त असल्याने फोन लागला नाही.
हे ऐकून क्षणभर मुले बावरली.त्यांच्या डोळ्यात माराची भीती स्पष्टपणे उमटली.पण पुढच्याच क्षणी त्या भीतीवर आईच्या ममतेने मात केली व तिघे मिळून माधुरीला सोडवू लागले.हे पाहून सुमित्रा बाईंच्या अंगाचा तिळपापड झाला.त्यांनी आपल्या मुलाला फोन लावला,पण नेमकी लाईन व्यस्त असल्याने फोन लागला नाही.
रमाबाईंनी हाताचा आधार देऊन माधुरीला उभे केले.मुलांना जवळ घेऊन ती रडू लागली.तसे रमाबाई तिला म्हणाल्या,"आधी या नरकातून बाहेर पडा.इथे जास्त वेळ थांबणे धोक्याचे आहे".
सुमित्रा बाई वाट अडवून उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना बाजूला ढकलून रमाबाई माधुरी व मुलांसहीत बाहेर पडल्या.तेवढ्यात मुलांनी प्रसंगावधान राखत दरवाजाला बाहेरून कडी घातली.त्यामुळे सुमित्रा बाई त्यांच्या मागे येऊ शकल्या नाहीत. रमाबाई त्या सर्वांना घेऊन थेट बसस्टँडला आल्या.तिथून त्यांनी टेलिफोन बूथ वरून स्वतःच्या घरी फोन केला व घडला प्रकार थोडक्यात सांगून त्या माधुरी व मुलांसहीत बसमध्ये बसल्या.माधुरीला तिच्या माहेरी पोहोचवून मग माघारी फिरायचे असे त्यांनी ठरवले होते.नशिबाने तोपर्यंत सुमित्रा बाई अगर त्यांचा दिवटा चिरंजीव तिथे आला नव्हता.बस सुटली आणि रमाबाईंनी सुटकेचा निःश्वास टाकला.
सुमित्रा बाई वाट अडवून उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना बाजूला ढकलून रमाबाई माधुरी व मुलांसहीत बाहेर पडल्या.तेवढ्यात मुलांनी प्रसंगावधान राखत दरवाजाला बाहेरून कडी घातली.त्यामुळे सुमित्रा बाई त्यांच्या मागे येऊ शकल्या नाहीत. रमाबाई त्या सर्वांना घेऊन थेट बसस्टँडला आल्या.तिथून त्यांनी टेलिफोन बूथ वरून स्वतःच्या घरी फोन केला व घडला प्रकार थोडक्यात सांगून त्या माधुरी व मुलांसहीत बसमध्ये बसल्या.माधुरीला तिच्या माहेरी पोहोचवून मग माघारी फिरायचे असे त्यांनी ठरवले होते.नशिबाने तोपर्यंत सुमित्रा बाई अगर त्यांचा दिवटा चिरंजीव तिथे आला नव्हता.बस सुटली आणि रमाबाईंनी सुटकेचा निःश्वास टाकला.
माधुरीच्या माहेरी गेल्यावर माधुरी आईच्या गळ्यात पडून रडू लागली. आपल्या मुलीला सासुरवास आहे याची तिच्या माहेरी थोडीफार कल्पना होतीच.पण गेल्या दोन दिवसांपासून उपाशीपोटी तिला बाथरुममध्ये कोंडून ठेवले होते हे ऐकून तिच्या आई बाबांचे काळीज तुटले.त्यांनी रमा ताईंचे आभार मानले.
"आता मुलीला चुकूनही त्या नरकात परत पाठवू नका "असे सांगून रमाबाई परतल्या.
"आता मुलीला चुकूनही त्या नरकात परत पाठवू नका "असे सांगून रमाबाई परतल्या.
इकडे रमाबाई घरी परतल्या तर त्यांच्यापुढे वेगळेच ताट वाढून ठेवले होते. खरं तर घरी जाऊन कधी एकदा पाठ टेकतेय असे रमाबाईंना झाले होते.परंतु पोलिस त्यांच्या घरी त्यांचीच वाट पहात होते.सुमित्रा ताई व त्यांचा दिवटा मुलगा राजेश यांनी माधुरी व मुलांना रमाबाईंनी फूस लावून पळवून नेले अशी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती.त्यामुळे गेले दोन तास पोलिसांनी रमाबाईंच्या घरच्यांना नाना प्रकारचे प्रश्न विचारुन हैराण केले होते.रमाबाईंनी फोनवरुन जे जुजबी सांगितले होते ते घरच्यांनी पोलिसांना सांगितले होते.पण खिसा चांगलाच गरम केलेला असल्यामुळे पोलिसांचे त्यावर समाधान होत नव्हते.ते रमाबाईंच्या घरच्यांना वेडेवाकडे प्रश्न विचारुन त्रास देत होते.
रमाबाई पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.रमाबाईंना अगदी भंडावून सोडले.जवळपास अर्धातास तरी हा फार्स चालला होता. तेवढ्यात तेथे सुमित्रा बाईंच्या यजमानांची मोहनरावांची गाडी येऊन थांबली.गाडीतून उतरुन मोहनराव तिथे पोहोचले व त्यांनी पोलिसांना सांगितले की, "माधुरी व मुले माझ्यासोबत आहेत.उगाचच यांना का त्रास देत आहात"?
हे ऐकून पोलिसांनी त्यांना विचारले, "याचा पुरावा काय? तुमच्या मुलाने व पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्याला अनुषंगून आम्ही ही चौकशी करत आहोत".
तेव्हा त्यांनी माधुरीला हाक मारली व "मुलांना घेऊन इकडे ये "असे सांगितले.गाडीतून माधुरीला उतरलेली पहाताच राजेश व सुमित्रा बाईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला.पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला. सुमित्रा बाई यजमानांना म्हणाल्या," तुम्ही बाहेरच्यांना सामील होऊन घरची अब्रू चव्हाट्यावर टांगलीत हे बरे केले नाही".
यावर मोहनराव म्हणाले, "तुम्हाला थोडीतरी शरम वाटते का? गेली दोन वर्षे तुमच्यामुळेच मी वेगळा रहातोय.हे तुमचे वागणे मला मान्य नव्हते.माधुरीला तेव्हा ही मी म्हणत होतो, पोरी, इथून बाहेर पड.चल माझ्यासोबत.पण तिने ऐकले नाही. तिचा माणसातील चांगुलपणावर विश्वास होता.कधीतरी तुम्हां दोघांना पाझर फुटेल असे तिला वाटत होते.पण तिला अन्नपाण्यावाचून दोन दिवस बाथरुममध्ये बांधून ठेवण्यापर्यंत तुमची मजल गेली.आणि तिची चूक काय होती? तर तुझी बाहेर जाताना घालायची साडी तू धुवायला सांगितली होती,ती धुवायची विसरली होती पोर! यासाठी एवढी शिक्षा? कुठे फेडाल ही पापे! या पोरीने घरासाठी आणि तुमच्यासाठी काय केले नाही? राब राब राबली..तू तर पेशाने शिक्षिका आहेस ना..जगाला ज्ञानदानाचे काम करणाऱ्या तुझ्या घरात मात्र दिव्याखाली अंधारच होता.मी प्रयत्न करुनही तुमच्यात बदल करु शकलो नाही.पण आजपासून ही माझी सून नसून मुलगी आहे असेच समजून मी हिची पूर्ण जबाबदारी स्विकारली आहे.आजपासून आमचा आणि तुमचा संबंध संपला..जा इथून"!
हे ऐकून पोलिसांनी त्यांना विचारले, "याचा पुरावा काय? तुमच्या मुलाने व पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्याला अनुषंगून आम्ही ही चौकशी करत आहोत".
तेव्हा त्यांनी माधुरीला हाक मारली व "मुलांना घेऊन इकडे ये "असे सांगितले.गाडीतून माधुरीला उतरलेली पहाताच राजेश व सुमित्रा बाईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला.पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला. सुमित्रा बाई यजमानांना म्हणाल्या," तुम्ही बाहेरच्यांना सामील होऊन घरची अब्रू चव्हाट्यावर टांगलीत हे बरे केले नाही".
यावर मोहनराव म्हणाले, "तुम्हाला थोडीतरी शरम वाटते का? गेली दोन वर्षे तुमच्यामुळेच मी वेगळा रहातोय.हे तुमचे वागणे मला मान्य नव्हते.माधुरीला तेव्हा ही मी म्हणत होतो, पोरी, इथून बाहेर पड.चल माझ्यासोबत.पण तिने ऐकले नाही. तिचा माणसातील चांगुलपणावर विश्वास होता.कधीतरी तुम्हां दोघांना पाझर फुटेल असे तिला वाटत होते.पण तिला अन्नपाण्यावाचून दोन दिवस बाथरुममध्ये बांधून ठेवण्यापर्यंत तुमची मजल गेली.आणि तिची चूक काय होती? तर तुझी बाहेर जाताना घालायची साडी तू धुवायला सांगितली होती,ती धुवायची विसरली होती पोर! यासाठी एवढी शिक्षा? कुठे फेडाल ही पापे! या पोरीने घरासाठी आणि तुमच्यासाठी काय केले नाही? राब राब राबली..तू तर पेशाने शिक्षिका आहेस ना..जगाला ज्ञानदानाचे काम करणाऱ्या तुझ्या घरात मात्र दिव्याखाली अंधारच होता.मी प्रयत्न करुनही तुमच्यात बदल करु शकलो नाही.पण आजपासून ही माझी सून नसून मुलगी आहे असेच समजून मी हिची पूर्ण जबाबदारी स्विकारली आहे.आजपासून आमचा आणि तुमचा संबंध संपला..जा इथून"!
रमाबाईंच्या घराजवळ तोबा गर्दी जमली होती.आधीच लोकांना असे काही पहायला मजा वाटते, त्यात राजेशच्या अहंकारी व मीच श्रेष्ठ अशा स्वभावामुळे त्याचे शत्रूच जास्त होते.लोकांना हे पाहून बरे वाटले.
नवऱ्याचे हे शब्द ऐकल्यावर पाय आपटत सुमित्रा बाई व राजेश तिथून निघून गेले.शेजारच्या भावे काकांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन मोहनरावांना फोन करुन सगळा घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांनी रमाबाईंना माधुरी व मुलांना घेऊन जाताना पाहिले होते.तसेच तावातावाने बोलणाऱ्या राजेशचा आविर्भाव पाहून तो पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला निघाला आहे हे त्यांनी मोहनरावांना कळविले होते.
त्यामुळे मोहनरावांनी माधुरीच्या माहेरी जाऊन तिला व मुलांना आपल्या सोबत आणले होते.माधुरीचे आईवडील माधुरीला पाठवायला तयार नव्हते, पण मोहनरावांनी त्यांना सांगितले, "तुमची मुलगी ही माझी जबाबदारी आहे.माझ्यावर विश्वास ठेवा". त्यामुळे त्यांनी माधुरी व मुलांना त्यांच्या सोबत पाठवले.
मोहनरावांना माहीत होते, पोलिस नक्की पुरावा मागणार.. आपल्या मुलाला व पत्नीला ते चांगलेच ओळखून होते.
त्यामुळे मोहनरावांनी माधुरीच्या माहेरी जाऊन तिला व मुलांना आपल्या सोबत आणले होते.माधुरीचे आईवडील माधुरीला पाठवायला तयार नव्हते, पण मोहनरावांनी त्यांना सांगितले, "तुमची मुलगी ही माझी जबाबदारी आहे.माझ्यावर विश्वास ठेवा". त्यामुळे त्यांनी माधुरी व मुलांना त्यांच्या सोबत पाठवले.
मोहनरावांना माहीत होते, पोलिस नक्की पुरावा मागणार.. आपल्या मुलाला व पत्नीला ते चांगलेच ओळखून होते.
मोहनरावांनी रमाबाई व त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली व झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.तसेच माधुरीची व मुलांची सुटका केली म्हणून आभारही मानले.
तेथून ते माधुरी व मुलांना घेऊन आपल्या रुमवर आले.दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या वकील मित्राला फोन करून त्याची भेटण्यासाठी वेळ घेतली व घटस्फोटाची केस दाखल केली.
एक नव्हे तर दोन...होय! त्यांनी सुमित्रा बाईंपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.माधुरीच्या पाठीशी भक्कमपणे सासरेच उभे असल्याने राजेश व सुमित्रा बाईंनी जंग जंग पछाडले पण त्यांचे काहीच चालले नाही.याच मुद्द्यावर मोहनरावांचा घटस्फोट पण मंजूर झाला.घटस्फोट मिळताच वकीलातर्फे आपला बंगला चार दिवसांत खाली करण्याची रितसर नोटीस त्यांनी सुमित्रा बाई व राजेशला पाठवली.घर मोहनरावांच्या नावे असल्याने या दोघांचे काहीच चालले नाही.घर रिकामे झाले की मोहनराव माधुरी व मुलांसहीत तिथे रहायला गेले.मोहनराव निवृत्त प्राध्यापक असल्याने त्यांना पेन्शन चालू होती.जोडीला माधुरीने तिचे ब्लाऊज शिवण्याचे काम सुरू केले. अल्पावधीतच तिच्या उत्कृष्ट शिवणकलेमुळे तिला खूप कामे मिळू लागली. तिने कपडे शिवण्यासाठी दोन मुली कामावर ठेवल्या.ती फक्त कटींग करुन देत असे.यासोबतच तिने शिवणक्लास सुरु केले.त्यालाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.मग माधुरीला मागे वळून पहावेच लागले नाही.मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे मोहनराव जातीने लक्ष देत असत.त्यामुळे त्याबाबत माधुरी निर्धास्त होती.
एक नव्हे तर दोन...होय! त्यांनी सुमित्रा बाईंपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.माधुरीच्या पाठीशी भक्कमपणे सासरेच उभे असल्याने राजेश व सुमित्रा बाईंनी जंग जंग पछाडले पण त्यांचे काहीच चालले नाही.याच मुद्द्यावर मोहनरावांचा घटस्फोट पण मंजूर झाला.घटस्फोट मिळताच वकीलातर्फे आपला बंगला चार दिवसांत खाली करण्याची रितसर नोटीस त्यांनी सुमित्रा बाई व राजेशला पाठवली.घर मोहनरावांच्या नावे असल्याने या दोघांचे काहीच चालले नाही.घर रिकामे झाले की मोहनराव माधुरी व मुलांसहीत तिथे रहायला गेले.मोहनराव निवृत्त प्राध्यापक असल्याने त्यांना पेन्शन चालू होती.जोडीला माधुरीने तिचे ब्लाऊज शिवण्याचे काम सुरू केले. अल्पावधीतच तिच्या उत्कृष्ट शिवणकलेमुळे तिला खूप कामे मिळू लागली. तिने कपडे शिवण्यासाठी दोन मुली कामावर ठेवल्या.ती फक्त कटींग करुन देत असे.यासोबतच तिने शिवणक्लास सुरु केले.त्यालाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.मग माधुरीला मागे वळून पहावेच लागले नाही.मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे मोहनराव जातीने लक्ष देत असत.त्यामुळे त्याबाबत माधुरी निर्धास्त होती.
केलेल्या कर्मांची फळे भोगावीच लागतात.तीव्र कर्मे असतील तर याच जन्मी भोगावी लागतात. सुमित्रा बाईंनी मोहनरावांशी संधान साधण्याचा खूपदा प्रयत्न केला. मोहनरावांनी आयुष्यभर बायकोची अरेरावी सहन केली होती,जाऊदेत असतो एखाद्याचा स्वभाव! असे म्हणत ते सहन करत असत.आपला मुलगा राजेश आईच्या संस्कारांमुळे बिघडत चालला आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी खूप वेळा सुमित्रा बाईंना सावध करण्याचा प्रयत्न केला होता.पण त्यांनी आपल्या यजमानांच्या सांगण्याकडे कधीच लक्ष दिले नाही.शेवटी जे व्हायचे तेच झाले..
आज शहरात सगळीकडे फलक लागले होते,मोहनरावांचा नातू शुभम हा बारावीच्या बोर्डात चक्क पहिला आला होता.त्याच्यावर व कुटुंबियांवर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
सुमित्रा बाई ज्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या त्याच शाळेचा विद्यार्थी असल्याने शुभमचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जिल्ह्याचे पोलिस आयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शुभमचे आजोबा,आई यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.ते ऐकून माधुरीला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते.त्याचवेळी सुमित्रा बाई व राजेश यांचा कुठेही उल्लेख केला गेला नाही.कार्यक्रम संपल्यावर घरी जात असताना राजेश दारु प्यायलेल्या अवस्थेत त्यांना सामोरा आला.मोहनरावांनी गाडी थांबवली नाही.घरी आल्यावर शुभमने परत एकदा आईला व आजोबांना नमस्कार केला.डाॅक्टर होऊन समाजाची सेवा करायची असे शुभमने ठरवले होते.
दारावरची बेल वाजली.माधुरीने दरवाजा उघडला तर रमाबाई हातात पुष्पगुच्छ घेऊन उभ्या होत्या.त्यांना पाहून माधुरीला फार आनंद झाला.त्यांच्या हाताला धरुन प्रेमाने तिने त्यांना आत आणले.शुभमचे मनःपूर्वक कौतुक करुन त्यांनी त्याला पुष्पगुच्छ दिला.माधुरीने चहा बनवला.चहा पित असताना अवांतर गप्पा सुरू झाल्या.बोलता बोलता रमाबाई म्हणाल्या, "सुमित्रा बाईंबद्दल समजले का"?
यावर माधुरी काही बोलण्या आधीच मोहनराव म्हणाले,"तिचा आणि आमचा संबंध कधीच संपलाय".
यावर माधुरी काही बोलण्या आधीच मोहनराव म्हणाले,"तिचा आणि आमचा संबंध कधीच संपलाय".
रमाबाई म्हणाल्या, "सुमित्रा बाई पाय घसरून पडल्या.त्यांचा खुबा मोडला आहे. ऑपरेशन होऊ शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे.गेले दोन महिने त्या एका जागेवर आहेत.राजेश आईकडे लक्ष देण्याऐवजी दारु पिऊन बाहेरच भटकत असतो.पंधरा दिवसांपूर्वी आमच्या शाळेतील शिक्षिकांसोबत मी ही भेटायला गेले होते.तेव्हा त्या म्हणाल्या, माझ्याच कर्मांची फळे मी भोगतेय. वंशाचा दिवा म्हणून ज्याचे लाडकोड केले तो दोन दोन दिवस घराकडे फिरकत ही नाही. दोन दोन दिवस खायला काही मिळत नाही.माझी सगळी पेन्शन तोच दारुवारी उडवतो.मला खूप पश्चात्ताप होतोय.मी माझ्या देवगुणी सुनेला खूप वाईट वागवले. माझ्या नवऱ्याने समजवण्यासाठी दाताच्या कण्या केल्या, पण मी ऐकले नाही".
हे ऐकून माधुरीने मोहनरावांकडे पाहिले.त्या दृष्टीचा अर्थ समजून मोहनराव म्हणाले," प्रत्येक गोष्टीसाठी निर्धारित वेळ असते.आता वेळ निघून गेली आहे.तिच्यासाठी आपण काहीच करु शकत नाही.ती आणि तिचे कर्म..हा विषय या घरात पुन्हा कुणीही काढायचा नाही".
माधुरीने ही समजून घेत यावर परत कधीच चकार शब्द काढला नाही. मुलांनी आईची व आजोबांची जाणीव ठेवत दैदिप्यमान यश मिळवले..
माधुरीने ही समजून घेत यावर परत कधीच चकार शब्द काढला नाही. मुलांनी आईची व आजोबांची जाणीव ठेवत दैदिप्यमान यश मिळवले..
अशीच एक दिवस सुमित्रा बाई गेल्याची बातमी येऊन धडकली.तेव्हा मात्र माधुरीने मोहनरांवांची समजूत काढत त्यांना स्मशानभूमीत नेले.जाताना वाटेत फुलवाल्यापाशी त्यांनी गाडी थांबवायला सांगितली.त्या लोळागोळा होऊन पडलेल्या सुमित्रा बाईंच्या निष्प्राण देहावर मोहनरावांनी हिरवी साडी, बांगड्या, मोगऱ्याचा गजरा व हळदीकुंकवाचा चांदीचा करंडा ठेवला जो त्यांनी सुमित्रा बाईंना पहिल्या पाडव्याला भेट म्हणून दिला होता.आजवर त्यांनी तो जपून ठेवला होता.माधुरीच्या डोळ्यांत पाणी तरळले... सासऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेला आजवर पहात आलेल्या तिला त्यांच्या हृदयातील पत्नी विषयीच्या हळव्या प्रेमाची जाणीव झाली...नातवाने काळजीने आजोबांच्या हाताला धरुन त्यांना गाडीत बसवले. मुलाकडून एका बापाला जे हवे असते ते मोहनरावांना नातवाकडून मिळत होते.त्यांनी मोठ्या विश्वासाने आपला हात नातवाच्या हाती सोपवला. विमनस्क अवस्थेत असलेला राजेश या सगळ्या प्रकाराकडे डोळे फाडून पहात होता.आपलाच बाप आणि आपलाच मुलगा आपल्या चुकांमुळे आपल्या डोळ्यांसमोरुन दूर दूर जात असलेला पाहून आपण काय गमावले याची त्याला जाणीव झाली आणि त्याने मोठ्याने हंबरडा फोडला.पण त्याच्या दुःखात सहभागी होणारे कुणीच त्याच्या सोबत नव्हते.सोबत होती फक्त त्याने आयुष्यभर केलेल्या चुकांची जाणीव आणि त्याची अगतिकता....
समाप्त
©® सौ.हेमा पाटील.
दिनांक ३०/६/२०२४
समाप्त
©® सौ.हेमा पाटील.
दिनांक ३०/६/२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा