केल्याने देशाटन

प्रवासातील अनुभव मध्य प्रदेशातील




रविवारची निवांत सकाळ होती.सकाळी सकाळी दिपाचा फोन वाजला. खरंतर आठ वाजून गेले, तरी अंथरुणातून, उठायचा आळस होता. परंतु स्क्रीन वरती मीनाचं नावाच पाहुन, दिपाने फोन उचलला. मीना ,तिची खास मैत्रीण. दीपा ,मीना, नयना, आणि आणि नीता या चौघी जिवश्च कंठश्च मैत्रिणी. एकाच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या. गेल्या दोन वर्षातील मैत्री.पण वर्षानुवर्षे सोबत आहेत,असे वाटणारी. एकमेकींच्या सुखा दुःखात , त्या साथीदार. एकत्र शॉपिंग ,पिक्चर ,हॉटेलिंग आणि एकमेकींच्या घरी जाणे, सगळं काही छान एन्जॉय करणाऱ्या.
डिसेंबर महिन्यातील , सुरुवातीचे दिवस. टॉकीज मध्ये नुकताच झिम्मा पिक्चर रिलीज झालेला. दीपाला ,मीनाने, "पिक्चरला जायचं का ?"विचारायलाच फोन केला होता. दुपारी एक वाजता ,मल्टीप्लेक्समध्ये शो होता. रविवार असल्यामुळे सुट्टी होतीच .
घरातल्या आवरून सहज जायला जमणार होते. दीपाने,' हो 'म्हणताच ,तिने नयना आणि नीताला काॅन्फरन्सवर घेतलं आणि चौघींच्या मिळून मस्त पिक्चर पाहणे, मॉलमध्ये फिरणे ,आणि हॉटेलिंग ,थोडंसं वाटलं तर शॉपिंग असा प्लान ठरला.
सगळ्यांच्यि घरच्यांना यांची मैत्री माहिती होतीच आणि अधून मधून अशा ब्रेकची गरज ,त्यांना आहे हेही मान्य होते. स्वतःच्या मैत्रिणींसोबतच्या, स्पेसची गरज प्रत्येक स्त्रीला असते, हे घरचे समजुन घेणारे होते. त्यामुळे त्यांच्या या प्लॅनला घरच्यांची मान्यता मान्यता होतीच.
चौघीही छान पैकी पिक्चरला गेल्या. अनोळखी असणार्‍या, सात जणींची धम्माल ट्रिप , आनंदाची लयलूट बघून चौघीही भारावून गेल्या. पिक्चर नंतर नेहमीच्या हॉटेलमध्ये गेल्या. चौघांनीही आपापल्या आवडीप्रमाणे आँर्डर केलं आणि पिक्चर च्या गप्पा रंगल्या.
"खरंच किती छान ना ग !अशाप्रकारे मैत्रिणींखी ट्रीप." दीपा म्हणाली.
" होना प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. हे वाक्य तर अगदी मनात ठसलं. घरच्यांसोबत जातो आपण कधीकधी ट्रीपला ,पण शेवटी त्या ट्रीपमध्ये आपल्याला सगळ्यांना सांभाळणं आणि अरेंजमेंट याचं टेन्शन राहतच .घरच्या सगळ्यांना सोडून, फक्त आपणचं फिरायला किती छान." निता मिळाली.
" अगं आपण आत्तापर्यंत असं थोडंसं पिक्चर ,नाटक ,असं पाहायला जातच होतो ना. चला मग आता दोन रात्रीच्या ट्रीपला जाऊया आपण चौघी. " मीना म्हणाली.
नयना ने तर लगेच गुगल सर्च करायला सुरुवात केली, की दोन दिवस निवांतपणे कुठे जाता येईल ?
कोणी म्हणत होतं ,अलिबाग, तर कोणाला वाटत होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी जाऊया ,कोणाचे म्हणणं होतं मध्यप्रदेशात जाऊ .
चौघींची चर्चा होताहोता ,दोसे ,कॉफी सारं खाऊन झालं. पण एकमत काही होईना. मग शेवटी आधी तारखा तर ठरवूया, मग डेस्टिनेशन ,असं म्हणून चौघींनी एकमेकींचा निरोप घेतला. चौघींच्या व्हाट्सअप ग्रुप होताच, त्यामुळे त्या ग्रुप वर चर्चा सुरूच राहणार होती.

ग्रुप वर दोन-तीन दिवस चर्चा चांगलीच रंगली. शेवटी संक्रांती च्या दरम्यान सुट्ट्या घेऊन ,जाऊया, असं ठरलं. आणि आणि मग जायचं कुठे? याच्यावर चर्चा सुरू झाली. नाशिकपासून जवळच असणारे ठिकाण निवडायचे होते. खूप प्रवासही करायला नको आणि मजाही करता आली पाहिजे, काहीतरी छान बघायलाही मिळायला हवं. या सगळ्या अपेक्षा होत्याच. शॉपिंग तर हवंच हवं. शेवटी हो-नाही करता करता एकदाचा," मांडू, महेश्वर ,ओंकारेश्वर,इंदौर टूर ठरला.
यात प्रेक्षणीय स्थळ ,देवदर्शन ,खाबुगिरी,शाॅपिंग सारं काही एकत्र करता येईल, याविषयी,चौघींच एकमत झालं. दोन रात्री आणि तीन दिवस असं प्लानिंग सुरू झालं. तीनही दिवस घालायचे ड्रेस कोड ठरवले गेले. खाण्यापिण्याचा खाऊ, थोडाबहुत सोबत घेण्यात आला. अर्थातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जायचं, म्हणजे सुरक्षितता महत्त्वाची होती. त्यामुळे चौघींना आरामात बसून प्रवास करता येईल ,कशी ईनोवा बुक झाली.
दीपाच्या ओळखीचाच ड्रायव्हर आणि गाडी होती.
घरच्यांनीही ,तीन दिवस घरातली काही काळजी करू नका ,पूर्ण पणे मज्जा करा ,एन्जॉय करा, म्हणून मनापासून परवानगी दिली .
अखेर 14 जानेवारी चा दिवस उजाडला . 14 15 16 जानेवारी तारखा ठरल्या होत्या .थंडी ,ऊन असं आल्हाददायक वातावरण आणि पुढचे तीन दिवस फक्त आपल्या चौघींच्या राज्य. भरपूर गप्पा, फिरणं, खाणं ,पिणं,निवांत.आनंद,उल्हास,या सर्व भावना मनामध्ये उचंबळून येत होत्या .
आता शेवटी "गणपती बाप्पा मोरया"चा घोष केला.आणि सार्‍याजणी घातल्या निघाल्या सहलीला.
काय होणार या चौकडीच्या पहिल्याच ट्रीपमध्ये.
पाहुया पुढच्या भागात.


गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून चौघींच्या ग्रुप निघाला सोबतीला होता भूषण ड्रायव्हर सहाजणांना बसता येईल अशी आरामात मोठीच गाडी केली असल्यामुळे चौघेही ऐसपैस बसल्या होत्या.
नाशिक वरून गाडी निघाली पिंपळगावचा टोल नाका पार होईपर्यंत थोडंसं अवघडलेपण होतं पण हळूहळू आला मोकळेपणा पर्समधून एकीच्या दीपा च्या पर्समधून चॉकलेट्स निघाले आणि एकमेकींना देवाण-घेवाण झाली आणि मग सुरू झाल्या नॉर्मल गप्पा.
काय काय बघायचं कुठे राहणार आहोत, कुठे बुकिंग झालं ?या माहितीची देवाण घेवाण झाली. नयना नेट सर्च करुन टूर नियोजन केले होते.
फोनवर कॉन्टॅक्ट करून, राहण्याचे बुकिंग केलेले होते. त्यामुळे सर्वांनी, आपोआपच तिला टूर लीडर करून टाकलं, आणि कुठे थांबायचं, कुठे खायचं प्यायचं, सारे अधिकार तिला देऊन टाकले होते.
चांदवड चा टोल नाका गेला आणि त्या नाश्त्यासाठी थांबल्या. मिसळ पॉइंटवर. नाशिकला निरोप देता देता, मिसळ तर खायलाच हवी . चौघींनाही नाश्ता तर करायचा होता .त्यामुळे त्या हॉटेलमध्ये थांबल्या आणि मिसळ ऑर्डर केली .
चौघी मध्ये तीन मिसळ पुरेशा झाल्या. छान पैकी मिसळ खाल्ल्यानंतर ,झकास पैकी चहा घेतला आणि गाडी पुढे निघाली.
ओंकारेश्वर येण्याच्या थोडं अलीकडेच, एका धाब्यावर जेवण करून घ्यावं, असं या चौघींनी हे ठरवलं ,म्हणजे ओंकारेश्वराला जाऊन जेवणात वेळ जाणार नाही, आणि दर्शन करणे ,आजुबाजुचा परिसर पाहणे,होईल ,असा त्यांचा विचार होता .एकाच छानश्या धाब्यावर डाळ बाटी,चुर्मा आणि गट्ट्याची भाजी खाऊन ,त्यांनी मध्यप्रदेशात खाबुगिरीचा श्रीगणेशा केला.
चौघीजणी ही ओंकारेश्वर ला पोहोचल्या. तेथील भव्य मंदिर ,तो नदीकाठ आणि ते पवित्र वातावरण, बघून आपोआपच सगळ्यांच्या मनात एक भारावलेपण आलं. ओंकारेश्वरचं दर्शन केलं. डोळे बंद करून थोडंसं ध्यान केलं ,जवळच्या नदी तीरावर ती होडीतून शिरण्याची ही इच्छा चौघींना होतीच, त्याप्रमाणे एका होडीतून , नदीत फेरफटका मारून ,कावेरी आणि नर्मदाचा संगम पाहुनआल्या. नर्मदेचं ते शांत पवित्र रूप सगळंच अवर्णनीय होतं. आणि मुळातच ,मनात असणार निवांत पण त्याला आपोआपच वातावरणाची जोड मिळाली आणि मनात प्रसन्नता दाटून आली.
ओंकारेश्वर च्या घाटांवर थोडावेळ बसून,फेरफटका मारुन,मनात देवदर्शनाचे समाधान घेऊन ,त्या पुढे निघाल्या. राहिल्या
काहीही न बोलताच बरेच काही, स्वतःच स्वतःला कळत होतं. ओंकारेश्वर वरुन,गाडी पुढे निघाली. गाडी आता मांडूच्या दिशेने निघाली.
त्यांचा पहिला मुक्काम असणार होता मांडू ला. मांडू च्या एका छानशा हॉटेलमध्ये ,नयनाने आधीच बुकिंग करून ठेवलेलं होतं .मांडू ला पोहोचून ,हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण करुन, चौघीजणी ही झोपायला निघाल्या. चौघीजणी असल्यामुळे रूम दोन घेतल्या होत्या ,पण एकाच रूम मध्ये गप्पा मारत मारत ,साडेबारा कधी वाजले ,हे चौघी नाही कळलं नाही ,
मग मात्र
"उद्या सकाळी लवकर उठून मांडू फिरायचं ना." असं एकमेकींना सांगत, आपापल्या खोलीत दोघींची जोडी झोपायला गेली .मना मध्ये दुसऱ्या दिवशी मांडू फिरण्याची उत्सुकता होतीच.


मांडू मधली पहा प्रसन्न पहाट. चौघीजणी लवकरच उठल्या. सहा - सव्वासहाला जाग आली. ज्या हॉटेलात त्या थांबल्या होत्या, त्याच्या बाजूला छानशी छोटीशी बाग केलेली होती. तिथे चक्कर मारून आल्या .
हॉटेल मध्ये भरपेट नाश्ता झाला.खास इंदौरी पोहे,कचोर्‍या,खाऊन झाल्या. नाश्ता झाल्यावर चौघीजणी, मस्त नटून-थटून तयार झाल्या. आजचा ड्रेसकोड होता नेव्ही ब्ल्यू. चौघींनी ही नेव्ही ब्लू कलर च्या छान जीन्स आणि त्याच्या वरती लाईट ब्ल्यू कलर चे टॉप चढवले होते .खास ट्रीपसाठी एकत्र केलेले शाॅपिंग होते.
छान फोटोसेशन आधी हॉटेलमध्ये झालं .काही सेल्फी, काही वेगवेगळ्या पोझमध्ये .
नंतर हॉटेलवाल्यांच्या ओळखीने त्यांनी एक गाईड ठरवला. तो त्यांना मांडू फिरवून आणणार होता. गाईड असल्याशिवाय मांडू फिरण्याची मजा येणारच नव्हती. त्यांना मिळालेला मोहन हा गाईड ही खूप छान बडबडा आणि मोकळा होता. भरभरून माहिती देणारा होता.त्याचं हिंदीही खूप छान होते. सुरुवातीला पाहिली जामा मस्जिद. नंतर इको पॉइंट बघितला. त्यानंतर राणी रूपमती चा हिंडोला महाल ,जहाज महाल , तेथिल म्युझियम,सारं बघता-बघता त्या थक्क झाल्या. तिथलं सौंदर्य, तिथली वास्तुशिल्प कला. आणि त्याच्यासोबतच तिथे असणारा रंजक इतिहास ,मोहनकडुन ऐकत दुपारचे दोन कसे वाजले ,ते कळलच नाही. प्रत्येक पॉईंटवर चौघीजणी असल्यामुळे आणि सोबतीला गाईड असल्यामुळे छान पोझ मधले आणि तिथल्या माहिती असणाऱ्या, बोर्ड खाली फोटो, असं सारं काढणं झालं.
दुपारी दोन वाजता पुन्हा हॉटेलवर पोचल्या आणि जेवण करून ,पुढे महेश्वरला निघाल्या मांडू पासून महेश्वर जवळच होतं त्यामुळे फारसा प्रवास नव्हताच .महेश्वरला ही घाटावरती छान पैकी बोटिंग झालं. बोटिंग झाल्यावर गाईड घेऊन अहिल्याबाई चा किल्ला बघितला . महेश्वर चा किल्ला अहिल्याबाईच्या जीवन कार्यातला महत्त्वाचा टप्पा होता .तिथलं प्रशस्त देवघर ,त्यातल्या चांदीच्या वस्तू सारंकाही बघून, चौघीजणी भारावून गेल्या.फोटो ठर काढलेच तिथे.
तो प्रसन्न शांत घाट ,तो किल्ला हे सारं काही मनाला तृप्तता देणारं होतं ,आणि समाधान देणारं होतं. आपली ट्रिप सार्थकी लागली, याचा चौघीजणी आनंद मानत होत्या. अर्थातच महेश्वरला आलं आणि माहेश्वरी साड्या घेतल्या नाहीत, असं होणारच नाही, नाही का?
चौघीजणी तिथे किल्ल्याजवळच असणारी 3-4 दुकान फिरल्या .चौघांनीही घरच्यांसाठी ,स्वतःसाठी काही साड्या, ड्रेस मटेरियल याची मनसोक्त खरेदी केली, आणि महेश्वर च्या आठवणी मनात घेऊन, त्या निघाल्या इंदोरला. त्यांचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम असणार होता ,इंदोरला.सांस्कृतिक वारसा असणार्‍या इंदोरमध्ये. परंतु मुक्कामाच्या आधी ,इंदोरच्या सराफा गल्लीतली खाबूगिरी काही सुटणार नव्हती.छप्पन चाटलाही जायचे होते, त्यामुळे मक्कामी जाण्याआधी, जेवण न करता खादाडी करायला त्या पोहोचल्या इंदूरच्या खास ,सराफा बाजारात.
चाट,भुट्टेका कीस,जिलेबी,पकोडे,मस्त टाईमपास.
खाणे,पिणे,फिरणे,खरेदी सारंकाही मस्त जमुन आलं होत.
इंदोरला सकाळी उठुन काचमंदीर,म्युझायम,छोटासा अहिल्याबाईचा वाडा पाहुन झालं.
काचमंदीरजवळच्या मार्केटमध्येही खरेदी झाली. तिथेच एका हाॅटेलमध्ये दालबाफला थाली सर्वांनी खाल्ली आणि सार्‍याजणी परत निघाल्या ,नाशिकला.
आता वर्षातून एकदा तरी चौघीनी जायचेच,अशा तीनचार दिवसाच्या टुरला असं परतीच्या प्रवासात ठरवलं.
खूप सारा उत्साह आणि चैतन्याची उधळण चौघींच्याही मनात झाली होती.



भाग्यश्री मुधोळकर