Login

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी (भाग - चार )

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी चा चौथा भाग
लगेच अनिरुद्ध जी स्टेजवर आले. तर विद्यार्थी पुष्पहार घेऊन आले स्वागतासाठी.

"आज आपल्या स्वरसाक्षी संगीत विद्यालयाला 20 वर्ष पूर्ण झाली विश्वासच वाटत नाही अस वाटत की आत्ता आत्ता स्वरसाक्षी विद्यालय सुरु केलय. या विद्यालयाने आज पर्यंत अनेक विद्यार्थी घडवले आणि आज तगायत घडवत आहेत मला अभिमान वाटतो या स्वरसाक्षीतुन बाहेर पडलेले माझे विद्यार्थी आज संगीत क्षेत्रात आपलं नाव कमवत आहेत आणि त्याच विद्यार्थ्यां मध्ये आहेत आजचे ते विद्यार्थी ज्यांनी स्वरसाक्षी संगीत विद्यालयाचा हा संगीतमय प्रवास अगदी जवळून पाहिला आहे आणि ते माझे पहिले विध्यार्थी देखील आहेत आज तुम्ही त्यांना त्यांच्या प्रत्येक गाण्या सह ओळखता ते म्हणजे स्वररागिणी म्हणजे स्वराज आणि रागिणी या विद्यालयाचे पहिले विद्यार्थी. आज या समारोह ची सुरवात त्यांच्या सुरेल आवाजाने होणार आहे याचा मला खरच खूप आनंद आहे. आता मी सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपले दोन शब्द संपवतो " अनिरुद्ध जी बोलले

आणि लगेच स्टेजवरून खाली उतरले. व पुढचा पदभार लगेच निवेदक गायत्री दातार यांनी उचलला.

"मी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते त्यांनी सरस्वती च्या फोटोला हार घालून आजच्या समारोहला सुरवात करावी." गायत्री दातार म्हणाल्या

प्रमुख पाहुण्यांनी सरस्वती ची पूजा केली आणि लगेच कार्यक्रमाला सुरवात झाली. काही वेळातच स्वराज आणि रागिणी स्टेजवर परफॉम करायला आले हा त्यांचा पहिलाच परफॉर्मन्स होता अस नव्हत या वीस वर्षात दोघांचे एकत्र खूप परफॉर्मन्स झाले होते पण हा परफॉर्मन्स एकदम खास होता आणि कारण पहिल्यांदच हे दोन सुरु एकत्र प्रितीच्या बहरलेल्या नात्यातून गाणार होते.

लहानपणी दोघांना ही मैत्रीच्या सुरांनी एकत्र जोडल होतच आणि त्याच मैत्रीच नातं पुढे प्रेमात कधी जुळल हे दोघांना ही कळलं नाही आणि आता हीच जोडी स्टेजवर आपली सुरांची उधळण करायला सज्ज झाली होती.

गाण्याला सुरवात झाली दोघांनी आपला पहिला सुर लावला तस सगळा हॉल एकाएकी शांत झाला आणि सगळे रसिक श्रोते त्यांच गाणं अगदी तल्लीन होऊन ऐकू लागले.

काही वेळा नंतर...

राग मालकौंस संपला तस सगळे भानावर आले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला एकच झाल्लोष झाला आणि टाळ्यांच्या गजरात समारोह सुरु झाला.
स्वररागिणी नंतर एक एक विद्यार्थ्यांचे परफॉर्मन्स होत गेले.

काही वेळा नंतर...

संगीताचार्य अनिरुद्ध जी स्टेजवर आले आणि त्यांनी आपल्या सुंदर आवाजात भैरवी गाऊन समारोह ची सांगता केली.

त्यांनी जसा आपला सुर लावला सगळे परत मंत्रमुग्ध झाले आणि परत एकदा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजराने निनादुन गेला आणि अशा रीतीने समारोहची सांगता झाली.

वर्तमानात....

काही वेळा नंतर...

स्वराज एकदम भानावर येतो. पण का?

"आज खूप वर्षांनी रागिणीच नाव समोर आलं सगळ्या जुन्या आठवणी एकदम जाग्या झाल्या आम्ही कधी एकत्र येऊ शकुत का? (थोडस थांबून ). नाही नको तो विचारच नको माझ्या आयुष्याची काळी सावली ही तिच्यावर पडायला नको. मी असा अयशस्वी एकटाच बरा." खिडकीत उभ राहून स्वराज आपल्या मनाशीच बोलतो.

तोच दारावर कुणी तरी नॉक करत.

" मे आय कमीन ब्रो? " वसुंधरा स्वराज ची मानलेली बहीण विचारते.

"यस कमीन." भानावर येत स्वराज म्हणतो

आणि वसुंधरा रूम मध्ये येते.

" अस किती दिवस कुढत बसणार आहेस राज? कधी ना कधी तुला यातून बाहेर पडावच लागेल आयुष्य खूप किमती असत अरे असा हताश नको हाऊस." वसुंधरा स्वराज ला समजावत म्हणाली.

"तुला काय वाटत वसू मला अस राहायला आवडत? पण आयुष्यात काय झालय हे तुला ही चांगलच माहितीये ती घटना आणि माझा पास्ट मी कधीच विसरू शकत नाही त्या एका घटनेने माझ सगळ आयुष्याच बदलून गेलं बघ आता फक्त त्या आठवणी राहिल्या आहेत बस." निराशेच्या स्वरात स्वराज म्हणाला

"आयुष्य? तूच म्हणायचास न आयुष्य खूप सुंदर असत म्हणून आणि आता तुझे सुरच बदलले आहेत वेड्या अरे गाण्यात आनंद शोधणारा मुलगा आहेस तु मग हे अस कस वागण आहे तुझ मला वाटत तु परत एकदा नव्याने आपल्या आयुष्याकडे बघायला हवस आणि आपलं गाणं परत सुरु करायला हवस बघ विचार कर एकदा." वसुंधरा ने समजावत विचारलं.

"वसू, मी फक्त दोन गोष्टींवर अतोनात प्रेम केलय आणि आता माझ्यातली शक्ती संपलीये मी परत नव्याने जगू शकेन अस मला तरी नाही वाटत. अस वाटतय आता माझ्यातला सुर हरवलाय कुठे तरी जाऊ दे सोड तु कशी काय आलीस?" स्वराजने विचारलं.

"तु सोशल मीडिया चेक केलस?" वसुंधरा विचारते

"हो, आत्ताच चेक केलय मला हे कळत नाही आमच्या दोघांच्या नावाचा हॅशटॅग कुणी बनवला असेल आणि गुरुकुलची काय भानगड आहे?" स्वराजने विचारलं

"मी पण तुझ्याशी हेच बोलायला आले होते तुला गुरुकुल बद्दल काही कळालय का?" वसुंधराने विचारलं

"नाही मला फक्त हा मेल आलाय बस." मेल दाखवत स्वराज म्हणाला

"हा मेल? हाच मेल मला ही आलाय हे बघ" वसुंधरा ने ही आपला मेल दाखवत सांगितलं

"अरे अस कस? पण अनिरुद्ध सर आपल्याला काहीच बोलले नाहीत याबद्दल तसच जर काही असत तर सरांचा आपल्याला एखादा तरी फोन आला असता. आणि नेमक काय प्रॉब्लेम आहे हे ही कळायला मार्ग नाहीये सरांचे मॅनेजर रघुनाथजींना कॉल करून बघावा का." काळजीने स्वराज म्हणाला

"मला ही तेच वाटतय मी करून बघते कॉल." वसुंधरा म्हणाली.

आणि लगेच तिने अनिरुद्ध जींचे मॅनेजर रघुनाथ जींना कॉल लावला.

एक सुंदर म्युझिक वाजलं...

आणि लगेच रघुनाथ जींनी कॉल उचलला.

"हॅलो, सर कसे आहात?" वसुंधराने विचारलं

"मी मजेत आहे पण इतक्या वर्षांनी माझी कशी काय आठवण झाली तुला" रघुनाथ जींनी विचारलं

"म्हणजे, सर तुम्हाला काहीच माहित नाही का?" वसुंधरा ने आश्चर्याने विचारलं.

"नाही ग मला काहीच आयडिया नाही" रघुनाथ जी म्हणाले

"अस कस म्हणता सर एकदा तुमचा मेल चेक करा मला एक मेल आलाय "गुरुकुल धोक्यात आहे एक नवीन सुरवात करायची असेल तर गुरुकुल मध्ये परत ये." असा" वसुंधरा म्हणाली

"ओके मी लगेच मेल चेक करतो वेट" रघुनाथ जी म्हणाले.

आणि लगेच त्यांनी आपला मेल चेक केला.