तुही मेरा... (भाग ८)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे 

तुही मेरा...

भाग ८


नयनाला पूर्ण विश्वास असतो की विरेन खोट बोलतोय पण विरेनला धडा शिकविण्यासाठी ती मुद्दाम कँटीनमध्ये जाते. पण....

तिथे राघव, अभय आणि त्याचे मित्र थट्टा मस्करी करत असतात..

1 मित्र : शेवटी तु पैज जिंकली मित्रा...

अभय : but we are really happy for you राघव... पार्टी तो बनती है|

पण राघवच त्यांच्या गप्पांत अजिबात लक्ष नसत.. तो तर छान फक्त नयनाचाच विचार करत असतो... प्रेमात अखंड बुडालेला तो यासगळ्यांत असूनही हरवल्यासारखा होता.. पण नयना रागाने लालबुंद झाली होती.. तिने फक्त अभय आणि त्याच्या मित्राची पैजेची बोलणी ऐकली आणि राग मनात धरून बसली...

नयना : राघव!!! मला तुझ्याकडून हि अपेक्षा नव्हती.. ????

तिच्या अशा ओरडण्याने कँटिनमधले सगळेच त्यांच्याकडे बघू लागले..

राघव : (कसलीच कल्पना नसल्याने) काय झालंय नयना??

नयना : माझ्या भावनांशी खेळताना लाज वाटली.. तु पैज लावली???

अभय : नयना तुझा काहीतरी गैरसमज होतोय? ??

नयना : just shut up... तु मध्ये पडू नकोस... राघव खर सांग पैज लागली होती की नाही???

राघव : अग हो... पण तु समजतेस तस नाहिए...

नयना : जर तस नाही तर जयपूर बद्दल बाहेर कस माहीत पडल???

राघव : (शॉक होउन ) जयपूर?? नयना इथे सीन नको... मी काहीही सांगितल नाहीए...

नयनाने रागात संपूर्ण कँटीनसमोर राघवच्या कानाखाली मारली.. तसा राघवही चिडला आणि रागाच्या भरात नको ते बोलून गेला..

राघव : हो लावली पैज कळल तुला... जा काय करायचे ते कर जा...????

नयनाला त्याच्या अशा बोलण्याने भरुन आलं होतं पण ती रागातच बाहेर निघून गेली.. संपूर्ण कँटीन आता राघवकडे बघत होत..

राघव : (बाजूला नजर फिरवत ) काय बघताय सगळे कधी आमची भांडण पाहिली नाही का???

तसे सगळेच आपापल्या कामाला लागले.. अभय राघवला धीर देतो पण राघव त्याचा हात खांद्यावरून उडवून लावतो.. तो तसाच कँटीनमधून बाहेर पडतो... थोड्यावेळाने त्याच्या लक्षात येत की तो रागाच्या भरात आपली चुक नसतानाही ती मान्य करून बसला.. त्याने नकळत नयनाला हर्ट केले...

इथे नयना गाडीत येऊन बसते... आधी तर खूप रागात असते पण नंतर तिच्या अश्रूंचा बांध फुटतो.. ती खूप रडत असते..

राघव नयनाला शोधत पार्किंगमध्ये येतो... गाडीत तिला रडताना बघून तो धावत तिच्या जवळ येतो... नयना त्याला जवळ येताना बघून रागात गाडी स्टार्ट करून कॉलेजच्या बाहेर निघते... राघव तिला थांबण्याचा प्रयत्न करतो पण ती निघून जाते.. मागोमाग राघवही गाडी घेऊन निघतो...

गाडी चालवता चालवता राघव तिला फोन करतो.. ती फोन कट करते.. मोकळ्या रस्त्यावर आल्यावर राघव गाडीचा वेग वाढवून नयनाच्या गाडीला ओवरटेक करत गाडी अडवतो.. दोन्ही गाड्या थांबतात.. राघव गाडीतून उतरून नयनाकडे जातो...

राघव : नयना ऐकुन तर घे माझ...

नयना : काय ऐकुन घेउ राघव??? फक्त मला पटवण्यासाठी जयपूरचा येवढा खटाटोप केलास?? मला सांग पैज नक्की कसली लागली होती मला पटवण्याची की माझ्या शरीर सुखाची...

राघव : नयना!!! (रागातच ओरडत तिच्यावर हात उचलतो पण संयम ठेवून मागे होतो) नयना त्या दिवशी जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं.. भावनेच्या जरा जास्तच आहारी गेलो आपण.. अग पण मी त्याचा बाजार नाही मांडला... (काकुळतीला येऊन तिला समजावत होता)

नयना : (रागात काही एक ऐकुन घेण्याच्या मनःस्थितीत नसते) राघव leave me alone... मला आता जाउ दे.. मला तुझ्याशी काहीही बोलायच नाही...

आणि नयना गाडी स्टार्ट करुन रीव्हर्समध्ये मागे घेत निघून जाते.. राघव बराच वेळ तिथेच बसून असतो. थोडावेळ डोक शांत झाल्यावर परत नयनाला फोन ट्राय करतो पण ती फोन कट करते.. तिला सॉरीचा मेसेज सुद्धा टाकतो पण ती काहिच रिप्लाय देत नाही..

थोड्यावेळाने फोन स्वीच आॅफ येतो... संध्याकाळी राघव नयनाच्या घरी जातो.. पण ती भेटायला सुद्धा तयार नसते.. राघव तर खंगत चालला होता.. नयना पेक्षा कितीतरी जास्त तो तिच्यावर प्रेम करत होता...

इतक्यात त्याला अभय फोन करतो.. राघव कुठे आहेस तू सकाळपासून काकू घरी वाट बघत आहेत... तु त्यांचा फोन पण रीसिव्ह नाही केलास?? त्यांना मी सांगितलं की तु माझ्या घरी आहेस...आता तू घरी जा आधी... अभय एका दमात बोलुन गेला..

हो बोलुन राघव घराच्या दिशेने वळला... राघव परत एकदा नयनाला फोन ट्राय करतो पण फोन बंद येतो..

???????? प्यार है या सज़ा, ए मेरे दिल बता

टूटता क्यूँ नहीं दर्द का सिलसिला

इस प्यार में हो कैसे कैसे इम्तिहान

ये प्यार लिखे कैसी कैसी दास्तान

या रब्बा दे दे कोई जान भी अगर

दिलबर पे हो ना, दिलबर पे हो ना कोई असर

हो या रब्बा दे दे कोई जान भी अगर

दिलबर पे हो ना, दिलबर पे हो ना कोई असर

हो हो हो प्यार है या सज़ा, ए मेरे दिल बता

टूटता क्यूँ नहीं दर्द का सिलसिला ????????

इथे नयना पण खूप रडत असते.. ???? तिला राघवसोबत घालवलेला एकुण एक क्षण आठवत असतो.. आपण आपल सर्वस्व त्याला पण त्याने फक्त मजा म्हणून पाहिले हा गैरसमज तिला मनातून खूप त्रास देत होता...

राघवच तर गाडी चालवताना पण लक्ष नव्हत.. तो आतुन पूर्णपणे तुटला होता..????

???????? कोई ना सुने सिसकती आँहों को

कोई ना धरे तड़पती बाहों को

आधी आधी पूरी ख्वैशें

टूटी फूटी सब फरमाइशें

कहीं शक हैं कहीं नफरत की दीवार है

कहीं जीत में भी शामिल पलपल हार हैं

या रब्बा दे दे कोई जान भी अगर

दिलबर पे हो ना, दिलबर पे हो ना कोई असर

हो या रब्बा दे दे कोई जान भी अगर

दिलबर पे हो ना, दिलबर पे हो ना कोई असर ????????

राघव आपल्याच विचारात गुंग असतो... अचानक गाडीसमोर एक मुलगी पळत आल्याने तो गोंधळतो आणि गाडीवरच नियंत्रण सुटून गाडी थोड्या अंतरावर झाडाला आदळतो.. सुदैवाने जास्त काही होत नाही.. राघव थोडक्यात बचावतो...

ती मुलगी खूप घाबरलेली होती.. धावत पळत आल्याने खूप दमल्यासारखी वाटत होती.. तिच्या अंगात त्राणच उरले नव्हते.. ती तिथल्या तिथेच बेशुद्ध पडते.. एव्हाना आसपास गर्दी होऊन अपघाताने ती बेशुद्ध पडली अस समजून लोक राघवलाच बोलायला लागतात... ????

राघव प्रसंगावधान राखून आधी घरी बाबांना फोन करून सगळा प्रसंग सांगतो.. बाबा त्याला धीर देतात आणि मुलीला हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगतात... आणि काळजी करू नकोस आम्ही पोहचतो तिथे... बाबांच्या धीर देण्याने तो थोडा सावरतो.. लोकांच्या मदतीने त्या मुलीला गाडी घेऊन जवळच्याच हॉस्पिटलला नेतो..

थोड्यावेळाने राघवचे आईबाबा सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहचतात.. मागून पोलिसही हजर होतात.. राघव पोलिसांना बघून आधी घाबरतो पण काही प्रोब्लेम नको म्हणून राघवचे बाबाच स्वतः पोलिसांना बोलावतात...

पोलिस : आम्ही डॉक्टरांना भेटुन येतो.. मि. देशमुख...

बाबा : sure...

आई : कशी आहे ती मुलगी??

राघव : बेशुद्धच आहे..

बाबा : काळजी करू नको.. होईल सगळ नीट..

पोलिस डॉक्टरांना भेटून येतात.. ती मुलगी गाडीला धडकली नाही किंबहुना हा अपघात नाही.. ती घाबरलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडली.. तिच्या अंगावर अपघाताची कसलीही खुण नाही हे त्यांना डॉक्टरांच्या तपासणीतून कळाल.. तरीही येवढ्या रात्री अशा अवस्थेत ती का पळत होती हे कळण गरजेच आहे म्हणून ती मुलगी शुद्धीवर आल्यावर आम्ही परत चौकशीसाठी येऊ अस सांगून ते निघून गेले..

राघवने सुटकेचा निःश्वास सोडला.. ती मुलगी शुद्धीवर आल्यावर पहिले पोलिस तिला भेटतील आणि मगच तुम्हाला भेटता येईल अस डॉक्टरांनी सांगितले होते.. त्यामुळे बाहेर वाट बघण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हता.. मि. देशमुखांनी म्हणजेच राघवच्या बाबांनी राघव आणि राघवच्या आईला घरी पाठवले.. आणि ते स्वतः तिथे थांबून राहिले...


क्रमशः

(वाचकांच्या आग्रहाखातर ही कथा मी परत पोस्ट करत आहे आणि म्हणूनच ही कथा ईरावर repeat होत आहे. शिवाय कथा वाचताना ती अधिक जवळची वाटावी यासाठी काही ठिकाणी मी emojis वापरले आहेत.. पण पेजवर emojis ऐवजी ???? असे प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे. तरी थोडं समजून घ्यावं. ईमोजी काढून पोस्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण server down झाल्यामुळे पोस्ट नाही झाले आणि संपूर्ण मेहनत वाया गेली. शेवटी आहे तस डायरी मधून अपलोड केला आहे.. त्यासाठी क्षमस्व.. तरी कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)

🎭 Series Post

View all