गेल्या भागात आपण पाहिले की, स्वराजने एका लहान मुलीचा जीव वाचवला होता. सगळेच इंप्रेस झाले होते. आता पाहू पुढे.
मधुरा घरी गेली आणि घडलेला प्रकार तिने आईला सांगितला.
"खरंच खूप चांगलं काम केलं आहे स्वराजने. कौतुकास्पद आहे." मंदा म्हणाली.
"हो ना आई, त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे."
मधुरा सहजासहजी इतकं कोणाचं कौतुक करायची नाही.
स्वराजचं मात्र मनापासून कौतुक करत होती.
स्वराजचं मात्र मनापासून कौतुक करत होती.
"मधुरा, तुझा वाढदिवस येतोय तर काय प्लान आहे का?"
"आई, तुला माहितीये ना माझा वाढदिवस तुझ्यासोबत साजरा करायला आवडतो."
"हो गं राणी मला माहित आहे; पण मी काय म्हणते ह्यावेळेस तुझ्या मित्र मैत्रिणींना बोलवशील का?"
मंदाची कल्पना आवडली.
"हो चालेल ना. असंही अर्चना मला म्हणतच होती ह्यावेळेस तरी पार्टी देणार आहेस की नाही?"
"ठीक आहे मग सर्वांना घरीच बोलव. हो आणि स्वराजला देखील बोलव."
"माहीत नाही तो येईल की नाही; पण त्यालाही इनवाईट करते."
इथे केशवचा जीव वर खाली होत होता.
त्याचेही मन हेच म्हणत होते की, स्वराज खूप चांगला मुलगा आहे; पण त्याच्या डोळ्यात मधुरासाठी प्रेम बघून त्याला रागही येत होता.
त्याचेही मन हेच म्हणत होते की, स्वराज खूप चांगला मुलगा आहे; पण त्याच्या डोळ्यात मधुरासाठी प्रेम बघून त्याला रागही येत होता.
त्याच्या मनाची घालमेल होत होती.
'मधुरा फक्त माझी आहे. ती माझं पाहिलं प्रेम आहे. असं मी तिला जाऊ देणार नाही.'
त्याचं मन तर हेच म्हणत होतं, मात्र मधुरा स्वराजच्या प्रेमात पडली होती.
हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा काय होईल.
मधुराचा चार दिवसावर वाढदिवस होता.
कॉलेजवरून घरी जात असताना तिने विषय काढला.
कॉलेजवरून घरी जात असताना तिने विषय काढला.
"सर्वांनी ऐका ह्यावेळेस वाढदिवसाला सर्वांनी माझ्या घरी यायचं आहे."
"काय?" अर्चना.
"हो तू ऐकलं ते बरोबर आहे." मधुरा तिला हलकासा चिमटा घेत म्हणाली.
"आम्ही नक्की येणार." विलास केशवकडे पाहत म्हणाला.
"रात्री ठीक आठ वाजता यायचं आहे." मधुरा.
मधुरा स्वराजला फोन लावत होती.
"काय गं कोणाला फोन लावतेय?" अर्चनाने तिला विचारले.
"स्वराजला फोन लावतेय गं. आज कॉलेजला आला नाही. त्यालाही आताच सांगते."
मधुराचा कॉल आलेला पाहून तो भलताच खुश झाला.
"हाय मधुरा." स्वराज.
"हॅलो स्वराज, आज कॉलेजला का आला नाही?" मधुरा.
"थोडा ताप होता,म्हणून नाही जमलं."
"ओहह, काळजी घे."
"हम्म."
"बरं ऐक चार दिवसाने माझा वाढदिवस आहे तर आपल्या ग्रुपला इनवाईट केलं आहे. तू देखील यायचं आहे. हो आणि आईने सांगितले आहे स्वराजला देखील बोलव."
हे ऐकून त्याला खूप बरं वाटलं.
"आईने बोलावलं आहे तर नक्की येणार."
"हो आणि काळजी घे."
"थँक्स डिअर."
स्वराजला खूप बरं वाटलं.
मधुराच्या आईने खास सांगितले म्हणून तो भलताच खुश झाला.
इथे दोघांचा संवाद अर्चना,केशव आणि विलास ऐकत होते.
"स्वराज VIP दिसतोय." अर्चना चिडवत म्हणाली.
"तसं नाही गं. ते त्या दिवशी त्या लहान मुलीला वाचवलं ना स्वराजने तेच आईला मी सांगितले, ती फार खुश झाली आणि हे बघ असेही तो देखील आपल्याच ग्रुपचा हिस्सा आहे तर त्याला इनवाईट करायला पाहिजे ना."
मधुरा.
मधुरा.
"मधुरा, ह्या आधी तर कधी घरी वाढदिवस साजरा केला नाही आणि आता स्वराज काय आपल्या ग्रुपमध्ये आला तर लगेच घरी सेलिब्रेशन?" अर्चना म्हणाली.
"खूप डोकं चालवायला लागली आहेस हं."
मधुरा तिला हलकासा फटका देत म्हणाली.
मधुरा तिला हलकासा फटका देत म्हणाली.
"बरोबर बोलतेय ती." विलास म्हणाला.
"आता तू ही सामील झाला का? तुम्ही दोघेही एकाच माळेतील मनी. माझा एकच चांगला मित्र आहे केशव, तोच मला समजून घेतो."
केशव खरंतर असं काहीच बोलायचा नाही. शांत होता. त्यामुळेच मधुराच्या मनात त्याच्याविषयी मैत्रीची भावना दृढ होत गेली.
मधुराला कल्पना नव्हती, ज्याला ती फक्त मित्र मानते त्याच्यासाठी ती काय आहे.
मधुराला कळेल त्याच्या मनातल्या भावना.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
इतर कथा लिहीत असल्यामुळे कथेचा पुढचा भाग खूपच उशिरा पोस्ट केला त्यासाठी सॉरी. नियमित भाग पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.