कथा- वारी भाग 2
कैलास सैन्यातून निवृत्त झाला होता. त्याची पत्नी त्याला अल्पशा आजाराने सोडून गेली होती. पत्नी वर जीवापाड प्रेम करणारा कैलास, मनातून कोलमडून गेला होता. परंतु त्याच्यातली शक्ती आणि ऊर्जा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
हे प्रकरण ऐकून तो चांगलाच संतापला. त्या स्त्री ने त्याला दादा म्हटल्यामुळे तो त्या मुलांचा मामा बनला.
"बरं का, प्रल्हाद आणि प्रेमा, मला तुम्ही मामा म्हणायचं. मी तुमचा मामा"...
मंदिरात वारीत ल्या सर्व लोकांची त्यांच्या अर्जा वरून हजेरी घेण्यात आली. त्यात कैलास नव्हता. काहींनी त्याला त्या घरी जाताना पाहिलेलं होतं. त्याला निरोप आला. 'माऊली' चला वारी निघाली.
कैलास ने निरोप पाठविला. तुम्ही व्हा पुढे. मी येतो मागून. माझ्या बहिणीकडे मला काम आहे. त्याला या प्रकरणाचा छडा लावून त्या कुटुंबाला त्यांची जमीन परत मिळवून द्यायची होती.
त्याने गावातल्या तलाठ्याकडे जाऊन त्या कुटुंबाच्या जमिनीचा तपशील मागितला. तलाठ्याने शिताफिने फेरफार करून, जमीन त्या बाईच्या पुतण्याच्या नावाने केली होती. त्यासाठी मोबदला सुद्धा घेतला होता. कैलास ने त्याला समज दिली. मी सैन्यातील माणूस. त्यामुळे काहीही झालं, तर आमचे वरिष्ठ थेट गावात येतात. त्यात कायद्याचं ज्ञान आम्हाला सुद्धा असतं. बऱ्या बोलाने ते खोटे दस्तऐवज माझ्या सुपूर्द करा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.
त्याने गावातल्या तलाठ्याकडे जाऊन त्या कुटुंबाच्या जमिनीचा तपशील मागितला. तलाठ्याने शिताफिने फेरफार करून, जमीन त्या बाईच्या पुतण्याच्या नावाने केली होती. त्यासाठी मोबदला सुद्धा घेतला होता. कैलास ने त्याला समज दिली. मी सैन्यातील माणूस. त्यामुळे काहीही झालं, तर आमचे वरिष्ठ थेट गावात येतात. त्यात कायद्याचं ज्ञान आम्हाला सुद्धा असतं. बऱ्या बोलाने ते खोटे दस्तऐवज माझ्या सुपूर्द करा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.
तलाठी गावच्या पाटलाकडे गेला. पाटील म्हणाले, "पाव्हणं ,तुम्ही ह्यात कशाला पडता? आमच्या गावचा मामला आहे". " तुम्ही कोण"? "मी या पोरांचा मामा. वारीतून इथे थांबलो".
"आषाढी एकादशीला आठ दिवस बाकी आहे. या वेळेत तुम्ही हे प्रकरण पूर्ण करा. माझ्या बहिणीच्या नावे असलेली जमीन त्यांच्या सुपूर्द करा. अन्यथा आम्ही सैनिक काय करू शकतो हे तुम्हाला माहीत आहेच" .आता पाटील व तलाठी दोघेही नरमले. त्यांनी त्या बाईच्या पुतण्याला सर्व हकीगत सांगून हे प्रकरण जर वाढविले, तर माझी नोकरी जाईल. तुमच्या पाटलाची व गावाची बदनामी होईल.
कैलास ने त्या ठिकाणी राहून दोन्ही मुलांना शाळेत घातले. त्यांना नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणाची गोडी लावली.
प्रल्हाद व प्रेमाच्या आईला तर, साक्षात विठ्ठलच आपल्या दारी आला असे वाटले. वारीत जाणारा एक माणूस आपल्याकडे थांबतो काय, आपली जमीन आपल्याला परत मिळवून देतो काय, तिला तर हे आपण स्वप्नच बघतो की काय असे वाटले.
प्रल्हाद व प्रेमाच्या आईला तर, साक्षात विठ्ठलच आपल्या दारी आला असे वाटले. वारीत जाणारा एक माणूस आपल्याकडे थांबतो काय, आपली जमीन आपल्याला परत मिळवून देतो काय, तिला तर हे आपण स्वप्नच बघतो की काय असे वाटले.
छाया बर्वे राऊत अमरावती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा