Login

आदरणीय वैशाली देवरे : वैचारीक समृद्धीने नटलेली लेखिका

माणसे जोडण्याची कला ही जीवनातील मुक्त हिरवळ आहे.

जीवनात शांत , संयमी असणं नेहमी फायदेशीर असतं.जीवन जगत असताना अनेक अडचणी समस्या येतात अशावेळी आपली संयमी भूमिका उपयोगी पडते.आपला स्वभाव जरी तामसी असला तरी त्यावर सकारात्मक विचारांचा प्रभाव पडला असता स्वभावात चांगला बदल घडून येतो.आपल्यातील हा बदल जरी विस्मयकारक वाटत असला तरी आपण आपल्या चुकीच्या वागण्यावर नकळत मात केलेली असते. स्रीयांच्या बाबतीतही कमालीचा संयम पहायला मिळतो.अनेक जबाबदारीचे ओझे वाहताना स्री थकून जाते.आपण आनंदी रहावं, स्वच्छंदी जीवन जगावं , जीवनाचा मनमुराद आस्वाद घ्यावा असे मनोमन वाटत असते; पण हे कधिच तिच्या वाट्याला सहजासहजी आलं नाही. या सर्वावर तिने निरंतर मात केली आहे.स्री जीवन किती झळकू शकतं , चमकू शकतं हे पदोपदी दाखवून दिले आहे.अशाच अतिशय शांत , निर्गवी व संयमी लेखिका आदरणीय वैशाली देवरे या आहेत.

ईरावर लेखन करणाऱ्या लेखिकांंचा लेखनप्रवास असा सहजासहजी झालेला नाही.विविध गोष्टीत गुंतलेल्या या महिलांना विचारांचे वेध लागले आणि त्यांचे विचार माध्यमांमुळे झळकू लागले.अशा विचारांची देवाणाघेवाण सहवासातून वाढत गेली आणि आपण चांगल्या व्यासपीठाला लिहले पाहिजे ही भावना वाढीस लागली यातूनच ईरा व्यासपीठाची ओळख झाली आणि स्रीयांना आपले हक्काचे विचार व्यक्त करण्याचे व्यासपीठ मिळाले. या व्यासपीठावरील लेखन म्हणजे " आयुष्याचा खजिना " आहे.अशा व्यासपीठावर वैशाली देवरे यांचे लेखन मनाला स्पर्श करते.विविध विभागात त्यांचे लेखन सातत्याने वाचकांना समृद्ध करते.त्यांच्या लेखनातुन सामाजिक संदेश दिलेला असतो.त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे कवितेवर त्यांच्या लेखणीची हुकमत आहे. ईरावरील त्यांचे प्रगल्भ लेखन वाचकांना सुखावते. सावज, चार दिवसाचे माहेरपण हवचं, सुलभा, बेरीज वजाबाकी आयुष्याची, मतलबी नितीगोती,नात्यांची वीण, धागे नात्यांचे, जिद्द, अनोखे नाते नात्यांंची वीण , रहस्यमय टेकडी अशा अनेक कथा त्यांची वैचारिक प्रतिभा स्पष्ट करतात.ईरावरील ऐतिहासिक चॕम्पियन ट्राॕफीत त्यांना उत्कृष्ट लेखिका पुरस्कार मिळाला आहे. ईराच्या विविध स्पर्धेत त्यांचा सहभाग मोलाचा असतो.कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना दोन मुलांचे शिक्षण आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करुन सुयोग्य संस्कार केले आहेत.विविध कला जपत असताना लेखनही मनापासून केले आहे.मैत्रीचे बंध जोपासताना अनेक लेखक व लेखिकांंसोबत सौहादपुर्ण नाते जोडले आहे.

वैशालीजी यांचे व्यक्तिमत्व शांत व संयमी आहे.सतत हसमुख चेहरा, उत्साही वृती, नवे बदल स्विकारणे,आदरपुर्वक बोलणे, मैत्री करणे, चांगले विचार यांचे आचरण करणे यामुळे त्यांचे जीवन नेहमी सकारात्मक विचारांने प्रेरीत आहे. एक उत्तम गृहिणी, सुस्वभावी व तेजस्वी लेखिका , उत्कृष्ट सुगरण आणि सुसंस्कारीत माता आशा बहुआयामी लेखिकेच्या कार्याला सतत प्रोत्साहीत करावे वाटते. त्यांचे पुढील जीवन आरोग्यदायी व सुखीसमाधानी जावे. त्यांची लेखणी अशीच बहरत जावी यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा …!!


©®नामदेवपाटील