वणवा - भाग - 16

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 16

निशा घरी येते आणि सुलभा काकींना बोलते मी फ्रेश होऊन माझ्या रूममध्ये झोपते आहे मला दोन, तीन तास कोणीही डिस्टरब करू नकां, निशा तिच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा आतून लावून घेते. सुलभा काकू तिचं वागणं बघून अचंबित होतात. ती नेहमी कुठून आली की त्यांना अगदी प्रेमाने विचारत असे पण आजच तिचं वागणं वेगळंचं होतं.

सानिका ऑफिसमध्ये असते. निशा फ्रेश होऊन मनातल्या मनात विचार करत बसते - कां मला पण आईप्रमाणेच कायम प्रेमाशिवाय राहावं लागतंय, कां आईच्या नशिबी पण प्रेम नव्हतं, आणि आता माझ्या नशीबी पण आईसारखंच झूरत राहणे आले. कां देवा हे असं, त्या वामनरावामुळे माझे आई - बाबा कधीच एक होऊ शकले नाही, आणि आता ह्या सानिकामुळे मला माझा साहिल मिळू शकत नाही आहे.

दुसऱ्याच क्षणी तीला सानिकाचा प्रचंड राग येतो आणि ती मनातल्या मनात बोलते ही सानिका पण त्या पार्थची चं मुलगी, त्या वामनरावांची नातं ना रक्ताची नाती त्यांची, ती अशीच उलटी फिरणार, सावत्र बहीण ना मी तिची, तीला माझं सुखं कसं बघवेल. सगळे शास्त्री कुटुंब असलेचं बेईमान कुठले, प्रेम हिरावून घेणारे, तो साहिल बोलतो मी लग्न करणार सानिकाशी, अरे मी इकडे जीव घालवतेय तुझ्यासाठी आणि तू त्या सानिका बरोबर संसाराची स्वप्न बघतोस काय....

निशा तीन, चार तास तिच्याच रूममध्ये असते. सानिका रात्री आठ वाजता ऑफिसमधून येते, तीला आल्यावर सुलभा काकीं सांगतात निशा तीन तास झाले, दरवाजा बंद करून आत आहे, तू जरा बघतेस कां. सानिका बरं मी बघते बोलते, सानिका दार ठोठावते आणि निशा ताई अशी हाक मारते. निशा आतून ओरडून बोलते काय झालं, सानिका बोलते तू बरी आहेस ना, बराच वेळ बाहेर आली नाहीस.

निशा बोलते तुम्ही दोघीं जेवून घ्या, मला जेवायला नको आहे, माझं डोकं दुखतंय मी झोपते, सकाळी बोलते तुझ्याशी. सानिका मनातल्या मनात बोलते,सकाळी लवकरच मी साहिल बरोबर लग्न करण्यासाठी निघून जाणार आहे. सकाळी ताईने थांबवलं तर. ताई नेहमी फ्रेश होऊन साडे - आठ ला बाहेर येते तर उदया मी साडे - सात, किंवा आठ वाजताच बाहेर पडून जाईन म्हणजे तिच्या प्रश्नांना सामोरे जायला नको. तशीही ताई आम्ही दोघांनी लग्न केले की चिडणारच आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका आम्ही तीन, चार मैत्रिणीं एका जवळच्या देवस्थानाला जातोय, दुपारपर्यंत मी येईन असं सुलभा काकींना खोट सांगून लग्न करण्यासाठी घरातून निघते. साहिलने लग्नाची सगळी तयारी करून ठेवलेली असते सानिका तिथे पोचल्यावर तो तीला काल हॉटेलमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतो. निशा कशी त्याला जबरदस्ती करत असते आणि लग्न होऊनच देणार नाही बोलते हे सर्व ऐकून सानिका बोलते ताई अशी कशी वागू शकते.

साहिल तीला बोलतो, बॉस आपलं लग्न होऊ देणार नाहीत म्हणून मी घाई केली अगं सॉरी हा, सानिका बोलते अरे सॉरी कां बोलतोस आपण करतोय ते योग्यच आहे. ताई दुपारी आपलं लग्न झालेलं बघून चिडेल अरे खूप, पण आता पर्याय नाही आहे, जे होईल त्याला आपण दोघे साथीने सामोरे जाऊ. थोड्या वेळात लग्न होतं. सानिका बोलते आता कसं काय करूया, आपण दोघे घरी जाऊन ताईला ऑफिसमधून घरी बोलवून घेऊ आणि मग बघू.

साहिल बोलतो, सानिका मी एक फ्लॅट आपल्यासाठी घेऊन ठेवला आहे तिथे आपण शिफ्ट होऊया, तुझ्या ताईने कितीही हट्ट केला तरी तिथे घरी थांबायचं नाही आहे, सानिका हो चालेल बोलते. सानिका आणि साहिल लग्न करून वाड्यावर जातात. सुलभाकाकीं नवीन जोडप्याला बघून खुप खुश होतात, त्यांना ओवाळून घरात घेतात.

इकडे ऑफिसमध्ये दुपार झाली तरी साहिल आला नाही म्हणून निशा त्याला कॉल करत असते पण त्याने मोबाईल स्विच ऑफ केलेला असतो म्हणून ती चिडलेली असते. तेवढ्यात सानिका तीला कॉल करते आणि बोलते ताई जरा लगेचं घरी ये एक अर्जंट कामं आहे, निशा अगं काय कामं आहे असं बोलेपर्यंत सानिका तू आधी घरी ये असं बोलून फोन ठेवते.

निशा अर्ध्या तासात घरी येते, आणि सानिका आणि साहिलला त्या लग्नाच्या वैशात बघून अचंबित होते आणि जाऊन सानिकाच्या एक कानाखाली मारते आणि साहिलला बोलते, आधी मी हिला बघते आणि मग तुझ्याकडे येते आणि ती सानिकाचा हात धरून तीला बेडरूममध्ये ओढत नेते. साहिल ओरडून बोलतो मॅडम ती आता माझी बायको आहे जे काही बोलायचं आहे ते इथे बोला...

निशा खूप चिडते, आदळा- आपट करते. आणि बोलते ये सानिका माझ्या प्रेमाच्या आड आलीस काय, तुला सोडणार नाही मी....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - निशा साहिलला नोकरीवरून काढून टाकते, आणि अजून त्याला काय काय त्रास देते ते )

🎭 Series Post

View all