वणवा - भाग - 28

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 28


( मागच्या भागात आपण बघितले - श्रावणी कॉल करून थोडंसच बोलून फोन कट करते आता पुढे )


इकडे श्रावणी अशा एका मुलाबरोबर पळून गेलेली असते ज्याला त्याच्या पहिल्या बायकोने सोडून दिलेले असते ज्याच्याबरोबर ती पळून गेलेली असते तो व्यक्तीं तिच्या ट्युशनचा शिक्षक असतो. श्रावणी ज्या क्लास मध्ये जात होती तिथे तीन महिन्यापूर्वीच नितेश जॉबला लागला होता.


वयाने नऊ वर्षांनी मोठा असणारा नितेश श्रीमंत मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याकडचा पैसा लुबाडून, मौज- मज्जा करून दोन, तीन महिन्यांनी त्या मुलींना गुंगीच औषध देऊन गुपचूप आहे त्या ठिकाणावरून गायब होतं असे, आणी पुन्हा पैसे संपले की दुसऱ्या शहरात जाऊन नोकरी शोधत असे.


श्रावणी एकवीस वर्षाची तर तो तीस वर्षाचा असतो. त्याच्या सतत पैश्याच्या मागे धावण्याच्या वृत्तीमुळे आणी त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याची बायको लग्नानंतर एक वर्षानेच त्याला सोडून गेलेली असते. नितेशला वाईट सवयी पण खूप होत्या. त्यामुळे त्याची बायको कंटाळून माहेरी निघून गेली होती.


नितेश दिसायला गोरा - गोमटा, सुंदर असल्याने मुली त्याच्या प्रेमात पडत असत. त्याच्या गोड मधाळ बोलण्याला मुलीं बळी पडत आणी मग हा त्यांना फिरायला ने, गिफ्ट्स दे, असं करून पटवत असे. श्रावणी नेमकी त्याच्या बोलण्यात येऊन त्याचं खरोखर आपल्यावर प्रेम आहे असं समजून त्याच्या विश्वासावर त्याच्याबरोबर घरातून पळून गेली.


श्रावणी खूप श्रीमंत आहे, तिच्याकडे पैसे आहेत हे पाहून त्याने तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं असतं, त्याने तीला प्रेमाने गोड गोड बोलून फसवलेलं असतं, तीला तिच्या घरचे सतत ओरडत असतात हे तीने सांगितल्यावर तर त्याचं अजूनच फावतं. त्याने तिच्या ह्या वागण्याचा फायदा घेतला असतो आणी तीला तू त्या घरात कशी असाह्य आहेस हे तीला जाणून - बुजून पटवून दिलेलं असतं.


मला घरचे सतत ओरडत असतात आणी हा नितेश माझ्यावर खूप प्रेम करतो, मला जराही न ओरडता माझे खूप खूप लाड करतो. मला पाहीजे तसं वागायला त्याचं बंधन नाही आहे, मला अजिबात न ओरडणारा असा नितेश आहे आणी त्यामुळे त्याच्या प्रेमासाठी घर सोडावं लागलं तरी चालेल ह्या विचाराने श्रावणी घर सोडून निघून जाते.


नितेश आणी ती घर सोडून गेल्यावर आठ दिवस एका मोठ्या हॉटेलमध्ये राहत असतात. घर सोडून गेल्यावर मात्र श्रावणी पस्तावलेली असते, नितेशच्या वागण्या - बोलण्यातला बदल तीला जाणवत असतो, तीने आणलेले सर्व दागिने आणी पैसे त्याने घेतलेले असतात. तिचा मोबाईल त्याने बंद करून ठेवलेला होता. त्यामुळे दिवसभर हॉटेल च्या रूममध्ये बसून ती कंटाळू लागली.


नितेश मात्र मजेत होता. रोज हॉटेलमध्ये वेगवेगळे पदार्थ ऑर्डर करून खात होता. श्रावणीने फोन मागितला की तीला तो ओरडत असे. तुझ्या घरचे तुला शोधण्यासाठी तुझा फोन ट्रॅप करतील त्यामुळे मी तुला फोन देणार नाही असं तो बोलत असे.


श्रावणी अगदीच रडकुंडीला आली होती, एवढा मोठा वाडा सोडून मी ह्या नितेशबरोबर पळून आले आणी राहतेय कुठे तर हॉटेलच्या रूममध्ये ह्याचे तीला वाईट वाटतं होते, पण परत जाण्यासाठी आपण कुठे आलो आहोत हे पण तीला माहित नव्हते, ती दोघं राहत असलेले हॉटेल एकदम आड ठिकाणी होते. आणी नितेशला काही विचारायला गेलं की तो तीला गोड बोलून मस्का मारून तिचे लाड करून तीला गप्प बसवत असे.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ह्या सगळ्यातून सुटून श्रावणी तीन महिन्यांनी कशी घरी येते ते )

🎭 Series Post

View all