वीरभद्र मंदिर हे आंध्रप्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यात असून एक अद्भुत आणि प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराची निर्मिती १५३८ साली शिल्पकार असलेल्या विरुपन्ना आणि वीरन्ना या दोन भावंडांनी केली. हे मंदिर शंकराचा अंश म्हणून समजल्या जाणाऱ्या ' वीरभद्र' यांच्या नावावरून मंदिराला नाव देण्यात आले आहे. वीरभद्र हे शंकराचे संहारक रूप आहे. वीरभद्र यांचा जन्म राजा दक्ष यांच्या यज्ञानंतर झाला. वीरभद्र मंदिराला 'लेपाक्षी मंदिर' म्हणूनही ओळखले जाते.
या मंदिराला ७० दगडी खांब आधार देतात. या मंदिराचे मुख्य रहस्य म्हणजे या मंदिराचा एक खांब अधांतरी आहे. जमिनीच्या पृष्ठभागापासून हा खांब वर उचललेला दिसतो. या खांबाचे रहस्य अजूनही कोणी शोधू शकलेले नाही. वीरभद्र मंदिराशी निगडित अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अधांतरी असलेल्या खांबावरून 'हँगिंग पिलर ऑफ टेंपल' म्हणून नाव ठेवण्यात आले.
'मंदिराचे रहस्य'
१९०२ मध्ये ब्रिटिश इंजिनियरने हवेत उभ्या असणाऱ्या या खांबाच्या रहस्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी त्या खांबाला हातोड्यानी वार करूनही पाहिले , तर याचा परिणाम म्हणून २५ फूट दूर असलेल्या खांबाला भेग पडली. यावरून असे समजले की, या मंदिराचे सर्व वजन हे या खांबावर आहे.
या मंदिराच्या संबंधित अनेक वेगवेगळी मते आहेत. या मंदिरात एक शिवलिंग आहे ज्याला 'शंकराचा रुद्रावतार' म्हणून ओळखले जाते. हे शिवलिंग १५ व्या दशकात मोकळ्या आकाशात स्थित होते. या मंदिराच्या परिसराची निर्मिती ऋषी अगस्त्य यांनी केलेली आहे.
लेपाक्षी मंदिराशी जुळलेली एक कथा प्रचलित आहे. एके काळी वैष्णव म्हणजेच भगवान विष्णू यांचे भक्त आणि शैव म्हणजेच भगवान शिव यांचे भक्त यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ बनण्याचा वाद सुरू झाला. हा वाद अनेक काळ चालू होता. या वादाला रोखण्यासाठी अगस्त्य ऋषी यांनी तपश्चर्या करून तो नष्ट केला. त्यांनी भक्तांना विष्णू आणि शिव हे एकमेकांचे पूरक आहेत हे सांगितले. या मंदिराजवळच विष्णूचे एक अद्भुत रूप म्हणजे 'रघुनाथेश्वर' आहे .
भगवान शंकराने विष्णूचा क्रोध शांत केलेला तेव्हापासून भगवान विष्णू हे शंकराच्या पाठीवर आसन म्हणून विराजमान आहेत. भगवान विष्णू यांना रघुनाथ स्वामी या रूपात प्रतिष्ठीत केले त्यामुळे ते 'रघुनाथेश्वर' म्हणूनही ओळखले जातात.
'लेपाक्षीचा संदर्भ'
तसेच लेपाक्षी या मंदिराचा संबंध रामायणाशी जोडलेला आढळून येतो. असे म्हंटले जाते की, सीतेला हरण करुन जात असताना रावण आणि पक्षीराज जटायू यांच्यामध्ये युद्ध झाले. युद्धानंतर जटायू जखमी होऊन तिथेच पडून राहिले. जेव्हा भगवान श्रीराम सीतेचा शोध घेत तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी जटायूला " ले पाक्षी ( तेलगु भाषेत बोलल्या जाणाऱ्या ले पाक्षीचा अर्थ ' हे पक्षीराज , उठा.')" हाक मारत आपल्या उराशी कवटाळले.
या मंदिर परिसरामध्ये एक पायाचा ठसा आहे ज्याला ' त्रेता पुरावा ' म्हणून ओळखले जाते. जटायू जेव्हा जमिनीवर पडले तेव्हा सीतेने जमिनीवर आपल्या पायाचा ठसा निर्माण करून विश्वास दिला की जोपर्यंत श्रीराम इथे पोहचणार नाही तोपर्यंत पायाच्या ठश्यामध्ये जमा असलेले पाणी त्याला जीवित ठेवेल.
दुसऱ्या कथेनुसार विजयनगर राज्यात विरुप आणि वीरपन्ना दोन भाऊ राहत होते. विरुपन्ना यांचा मुलगा आंधळा होता आणि शिवलिंगाभोवती खेळत असताना त्याला दृष्टी प्राप्त झाल्याची सांगितले जाते. तर वीरपन्ना हे विजयनगरच्या फायनान्सरपैकी एक होते.
शाही खजिना वापरल्याबद्दल इतरांवर आरोप केले जाते. काही जण म्हणतात की मंदिर पुर्ण व्हावे म्हणून किंवा कोणी मुलगा बरा व्हावा म्हणून राजाने डोळे काढण्याची आज्ञा दिली. खोट्या आरोपामुळे व्यथित होऊन त्याने शिक्षा टाळली आणि आपले डोळे मंदिराच्या भिंतीवर टाकले.
त्यामुळे या ठिकाणाला 'लापे - अक्षी' म्हणजेच 'अंधांचे गाव' असे नाव पडले.
त्यामुळे या ठिकाणाला 'लापे - अक्षी' म्हणजेच 'अंधांचे गाव' असे नाव पडले.
भयानक गोष्ट म्हणजे या मंदिराच्या भिंतीवर अजूनही डोळ्यांच्या रक्ताच्या खुणा आहे.
'झुलणारा खांब'
वीरभद्र मंदिराच्या झुलणाऱ्या खांबाला घेऊन एक परंपरा चालत आली आहे. असे म्हंटले जाते की, झुलणाऱ्या खांबाखालून एक कपडा काढला जातो, त्यामुळे जे दुःखी -पीडित आहेत, त्यांच्या जीवनात दुःखाचा कोणताच त्रास होत नाही. या मंदिराच्या खांबावर पुरातन काळातील वेगवेगळ्या चित्रांनी कोरीव काम केले आहे. तसेच या मंदिराचे वातावरण मनाला प्रसन्न करणारे आहे. वीरभद्र महाराजांवर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा देव अशी मान्यता असलेल्या वीरभद्राला हजारो लोक त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून नवस करतात.
असे हे मंदिर पुरातन काळाचा वारसा ह्या आधुनिक युगातही जपत आहे.
©भाग्यश्री परब
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा