Login

तिने आत्महत्या केली म्हणे भाग तीन

मृदुलाची मनस्थिती


मागील भागात आपण पाहिलं कि, मृदुलाला एक मुलगा आवडतो, घरच्यांच्या विरोधात जाऊन ती त्याच्याशीच लग्न करायचं म्हणते, आता पाहूया पुढे,


इकडे मृदुलाला निशांतच बोलणे ऐकून खूप टेन्शन आलं...
आपल्या आईवडिलांना काय सांगायचं?
ज्यांच्यासमोर ती ठाम उभी राहिलीमागील भागात आपण पाहिलं कि, सुनिधीच्या मैत्रिणीने आत्महत्या केल्याने तिला जबरदस्त धक्का बसतो. आता पाहूया पुढे,

सुनिधी विचार करत होती... तिच्या डोळ्यासमोर तिचं पूर्ण आयुष्यच उभ राहील......

तस तर मृदुला खूप हुशार होती. अभ्यासात पण नेहमी पुढे असायची. त्यात खूप वर्षांनी तिच्या आईवडिलांना झालेली, त्यांची एकुलती एक मुलगी, त्यांचं सगळं जग तिच्याभोवतीच होतं.

पण कॉलेजमध्ये असताना तिचं एका मुलावर प्रेम बसलं.
निशांत त्याच नाव, तो तिला सिनिअर होता. ती त्याच्यावर मनापासून प्रेम करायची. त्याच्याशिवाय आयुष्य कल्पनाच करू शकत नव्हती. हे ती कधीतरी सुनिधीला कॉल केल्यावर सांगायची... असेच लपूनछपून त्यांचं प्रेमप्रकरण चालू होत.... पण एक दिवस अचानक
तिच्या घरी समजलं.... पण तिच्या आईवडिलांना कुठून तरी कळताच त्यांच्या घरात भांडणं सुरू झाली. ते या नात्यासाठी अजिबात तयार नव्हते. तेव्हा ती खूप रडली,आरडाओरडा देखील केला तिने आणि हट्ट धरला कि हे माझं आयुष्य आहे  आणि मला त्याच्याशिवाय लग्न करायचंच नाही!”

कधी रडून,कधी अबोल राहून,कधी आजारी पडून तर कधी उपाशी राहून...तिने सगळे मार्ग वापरले जेणेकरून तिचे आईवडील ऐकतील...शेवटी मुलीच्या प्रेमापुढे आईवडीलांनी हात टेकले व ते नाईलाजाने तयार झाले.
पण त्यांनी एक अट घातली.

“आधी खूप शिकायचं. करिअर घडवायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आणि मगच आम्ही लग्न लावून देऊ.”

ती खूप खुश झाली. तिने ती गोष्ट निशांत आणि सुनिधीला देखील सांगितली...तिला वाटलं आता या जगात माझ्यासारखी सुखी मीच....

ती हुशार होतीच पण आता तिने अभ्यासात झोकून दिलं स्वतःला आणि इकडे घरच्यांची परवानगी मिळाल्यामुळे ते दोघे हवं तेव्हा भेटू लागले आणि ह्यादरम्यान त्याच्याशी नातं अजून पुढे गेलं....इतकं पुढे…की आता मागे फिरणं शक्य नव्हतं.तिने त्याला आपल सर्वस्व बहाल केल...

काही वर्षं गेली. तिने आपल डॉक्टर होण्याचं स्वप्न देखील पूर्ण केल.... आता तिला वेध लागले होते लग्नाचे.... तिने सुनिधीला देखील लवकर मी लग्न करेन असं सांगितलं होत... इकडे सुनिधीची आई आजारी पडल्यामुळे काही महिने तिचा सगळ्यांशी संपर्क तुटला आणि अचानक इकडे निशांत बदलला.

एक दिवस त्याने सरळ सांगितलं

“मला दुसरी मुलगी आवडते. आपलं इथेच थांबवूया.... हे सगळं......”

ते ऐकूनच ती हादरली. तिला विश्वासच बसला नाही.
ज्याच्यासाठी तिने आईवडिलांशी भांडण केलं,
ज्याच्यासाठी आपल सगळं पणाला लावलं,
तोच असा निघेल, असं तिला वाटलंच नव्हतं.

ते ऐकूनच ती पूर्णपणे खचली.


हेच कारण असू शकेल काय तिच्या आत्महत्येच????

@हर्षला "सान्वी"

क्रमश :-

होती,
ज्यांना ती म्हणाली होती
“माझी निवड चुकीची नाही. आता कसं सांगायचं
की सगळं संपलं?

त्यांचं नातं खूप पुढे गेलं होतं.समाजाला सांगता येणार नव्हतं.आईवडिलांच्या डोळ्यांत डोळे घालून
बोलण्याची हिंमत आता मात्र तिच्यात नव्हती.

ती गप्प झाली...एकटी पडली.आणि हळूहळू आतून तुटत गेली.... निशांतमुळे तिचा एकही मित्र किंवा मैत्रीण नव्हती सुनिधी सोडून ज्याच्याकडे ती आपलं मन मोकळ करेल....


ती त्याच दिवसापासून पूर्ण बदलली. तिचं फोन वापरणे कमी झालं. तिचं खळखळून हसणं देखील बंद झालं.
ती आरशात पाहणंही टाळू लागली होती...

तिच्या आईवडीलाना काहीतरी चुकतंय हे समजत होते,
पण त्यांनी विचारल्यावर ती एकच उत्तर द्यायची,

“काही नाही…नवीन जॉब त्यामुळे कामाचा ताण आहे.”

खरं सांगायची हिंमतच होत नव्हती तिची... त्यात रात्री झोप लागत नव्हती तिला....डोक्यात सतत एकच विचार

नातं खूप पुढे गेलंय…हे आईबाबांना कसं सांगू?
कुणाला समजलं तर काय उत्तर देऊ?

तो मात्र तिच्या आयुष्यातून अगदी सहज निघून गेला.
त्याने परत कधी कॉल नाही केला कधी मेसेज नाही. हिने केलेल्या कॉल msg ला तो उत्तर देखील द्यायचा नाही...

एक दिवस तिने त्याला शेवटचा फोन केला.

“निशांत मी नसल्याने तुला खरंच काही फरक पडत नाही का?”
ती रडत रडत त्याला विचारत होती.

“आता उगाच ड्रामा नको, माझं आयुष्य वेगळ्या वाटेवर आहे... माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे....”

तो म्हणाला, व फोन कट झाला.

तिने खूप वेळ फोन हातात धरून ठेवला. स्क्रीन बंद झाली होती,पण मनातले विचार काही केल्या संपत नव्हतं.

त्या रात्री तिने हट्ट करून स्वयंपाक केला. सगळं घर आवरलं.. आईवडिलांचे पाय देखील दाबून दिले

आईला ते थोडं विचित्र वाटलं....पण तिने तेव्हा काही विचारलं नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी...ती खूप उशिरापर्यंत खोलीतून बाहेर आली नाही... काळजी वाटली म्हणून आईने दरवाजा उघडला तेव्हा ती फॅनला लटकलेली होती...

पोलीस आले.....पंचनामा झाला. कोणी म्हणालं,
“आत्महत्या आहे.”


खरच तिने आत्महत्या केली असेल का??