प्रेमाचे क्षण गवसले
भाग 16
"हो आजी हे ठीक नाही करत ,तू आमच्या पार्टी मध्ये आहेस..आमची बाजू घे..उलट पप्पांना ही आमची बाजू घ्यायला लावणार..आईचे बोलणे आता नेहमीचे होत आहे.." समर्था अगदी पेटली
सून आता सासूबाईला म्हणाली ,"आई तुम्हाला अजून ही माझी बाजू घ्यायची आहे का बघा ,नाहीतर मी वाईट ठरले तश्या तुम्ही ही वाईट ठरालं त्यांच्या नजरेत.."
"जिथे चूक ,तिथे चुकच म्हणत असते मी..आज ह्यांनी चूक केली आहे..मोठ्यांसोबत बोलण्याची पद्धत चुकीची आहेच..आई सोबत ही बोलायची मर्यादा विसरत चालले आहेत..त्यात घरात विरोधक पैदा करत आहेत स्वतःच्या फायद्यासाठी..नात्यात भांडण लावून देत आहेत..ह्यांना वाटते बाप आणि आजी आईच्या विरुद्ध गेले म्हणजे त्यांच्या चुका सांभाळून घेतल्या जातील दरवेळी..हे शक्य नाही..."
"तशी अजून एक चूक केली आहे ह्यांनी..पण आता ही एकच चूक त्यांना सरळ करायला भरपूर होईल " आई त्यांच्या कडे नजर रोखून म्हणाली
आईला गप्प करायला बऱ्याचदा बाबा कामी पडत..म्हणून आज दोघे बाबांची वाट बघत होते..थोडे वाद झाले बाबा आणि आई मध्ये म्हणजे आई प्रकरण मिटते घेते...आणि मुलांची चूक लपली जाते..
"बाबा आलेच की हे प्रकरण मिटते घ्यावे लागेल आईला.." समर्था
"हो धाकात आहे का आपली आई बाबांच्या..ती तर आजीची बाजू घेत आहे म्हंटल की बाबा ही काही करणार नाहीत तिला"
"हो धाकात आहे का आपली आई बाबांच्या..ती तर आजीची बाजू घेत आहे म्हंटल की बाबा ही काही करणार नाहीत तिला"
"तुझा बाबा आज तुमची बाजू कशी घेतो ते मीच बघते..सवय लागली आहे आणि आता तर हद्दच केली आहे हे मी स्वतः सांगेन मग बघते तो तरी कशी तुम्ही चुकीची बाजू घेतो.."आजी ने सुनेच्या बाजूने बोलून आज मुलांना अद्दल घडवायची हे ठरवले .
"तुझं का ऐकून घेतील बाबा, तूच तर हे चुकीचं शिकवलं आहेस .आईने तरी समर्थन केले नाही ,ती काही म्हंटली त्या विरुद्ध तू मुद्दाम आमची बाजू घेत होतीस..." शशु म्हणत होता
आता तर आई आणि आजीचा पारा चढला ,त्या दोघांची इतकी हिम्मत!! आजच काही केले नाही आणि खुद बाबांनी त्यांना त्यांची चूक दाखवून दिली नाही तर ह्या दोघांना आई आणि आजीचा धाकच रहाणार नाही असे दोघी ही विचार करत होत्या ,त्यांना टेन्शन आले होते..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा