Login

माहेरचं संपलं

भावला बायका बरोबर भेटायला नाही म्हणून राधिका पोरकी झाली
ही एक सत्य घटना आहे. दादर मध्ये हिंदमता या ठिकाणी पवार नावाचे कुटुंब राहत होते, त्याचे नाव माधव पवार म्हणून होते. त्याच्या पत्नीचे नाव सरिता असे होते. त्यांना चार मुलं आणि एक मुलगी होती. त्याचा मोठा मुलगा अनंता आणि दुसरा मुलगा आकाश हे दोघेही पोलीस मध्ये होते. तीन नंबर मुलगा बँक मध्ये वाटचमेन म्हणून काम करत होता. मुलगी राधिका शेवटचा मुलगा राजू हा शाळेत होता. यांचा जसा कुटुंब वाढत गेला तशी कुटुंबामध्ये जे प्रेम होत ते संपत गेलं. घरात नेहमी वाढ़ असायचे. मोठा मुलगा याची बायको लतिका खूप हट्टी आणि भांडखोर होती. तिला फक्त नवरा पाहिजे होता फक्त मज्जा मारण्यासाठी, तिला नवऱ्या कडून फक्त पैसा पाहिजे होता. त्यांना दोन मुलं झाली पण लतिका मध्ये काही फारसा फरक झाला नाही, रोज रोज भांडण होत होती, म्हणून अनंता ने दुसरी कडे भाड्याने घर घेतलं, तरी काही सुधारणा नाही. दुसऱ्या मुलाचे हेच होत त्यांची बायको संगीता ती देखील तशी होती. त्याचे हे सगळं चालत होते तो देखील भाड्याने दुसऱ्री कडे राहत होते. आता फक्त माधव याच्या घरी त्याची बायको आणि दोन मुलं एक मुलगी राहत होते. माधव आणि सरिता आपल्या नशिबाला दोष देत होते. काही वर्षाने राधिका हीच लगन तिच्या आत्याच्या मुलाबरोबर झालं. ती खुश होती. पण राधिकाच्या लग्नला दोन महिने नाही येत तर तिचा मोठ्या भावाला अटॅक येऊन तो देवाघरी गेला. भावाला अटॅक यायला कारण म्हणजे एकच बायकोचे नेहमी भांडण करत राहणं, नेहमी पैसा पैसा करत राहणं जुन्या काळी पोलीसना येवडा पगार नव्हता पण त्याच्या बायको चे पैसे उडवने कमी झाले नाही. माधव आणि सरिताच्या डोळ्या समोरून त्याचा मुलगा देवा घरी गेला होता आणि एक आई काही करू शकली नाही.