" काकी, आज पर्यंत कोणीही माझ्यावर एवढे प्रेम केले नाही... सगळ्यांसाठी मी एक ओझ म्हणून होते... एकाने भार दुसऱ्याच्या अंगावर सोपवून मला झटकून मोकळे झाले.... " ती मुलगी रडतच त्यांच्याकडे पाहून बोलू लागते.... तिचं बोलणं सगळे शांतपणे ऐकत असतात....
आत्ता पुढें,
" माझे नाव सुखदा... माझ्या वडिलांना मुलगा पाहिजे होता पण जन्माला आले मी... आईच्या सांगण्यावरून त्यांनी मला सांभाळले परंतु कधीही वडिलांचे प्रेम भेटले नाही... जशी अठरा वर्षे झाले लगेच माझं शिक्षण अर्धवट ठेवून माझं लग्न लावून दिले मला एकदाही कोणी विचारले नाही.... विचार केला लग्न झाल्यावर तरी सुख मिळेल निदान सासरकडची मंडळी तरी प्रेमाने स्वीकार करतील... पण तिकडेही हातात निराशा आली....
दिवस-रात्र सासू घरातली सगळी काम माझ्याकडून करून घेत होती.. प्रत्येक गोष्टीमध्ये मला घालून पाडून बोलत होती... तरीही तिच्या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या... त्यांनी कधी मला माहेरी पाठवल नाही, नाही माझ्या माहेरकडचे कधी मला भेटायला आले..... माझ्या मैत्रिणींसोबत ही कधी बोलायला भेटत नव्हते... दिवसभर घराच्या आत राहूनच घरातली सगळी कामे करू लागत होती.... घराच्या बाहेर असलेली दुनियाच मला दाखवत नव्हते...
माझा नवरा अमित वरवर व्यवस्थित पण रागाचा झटका आला की काय होईल सांगता येत नसे. कधी हातचाही उपयोग व्हायचा... "तुला एवढं काही केलंय आम्ही, आणि तू काही करू शकली नाहीस," असं रोज ऐकायला यायचं. घरात कधी वेळेवर जेवण मिळायचं नाही, कधी कपड्यांसाठी अपमान व्हायचा....
दिवसभर घरातली सगळी काम केल्यामुळे रात्री मला खूपच थकवा यायचा पण अमितला कधीही त्या गोष्टीचा फरक पडला नाही तो रात्री एका हैवानासारखा माझ्यावर तुटून पडायचा... स्वतःच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायचा माझ्या मनाचा अजिबात विचार करायचा नाही.... त्याचं तसे वागणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जायचे तरीही मला निमूटपणे सहन करावे लागायचे... एखाद्या वेळी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर तो उलट माझ्यावरच हात उचलून मला शांत करत होता परंतु स्वतःच मन भरेपर्यंत थांबत नव्हता...
असेच काही महिने गेले आणि एक दिवस मला समजले की मी गरोदर आहे... माझ्या मनामध्ये एक आशे चा किरण जागा झाला.... निदान या बाळाच्या निमित्ताने तरी माझा स्वीकार करतील आणि माझ्यावर आनंदित होतील... जेव्हा ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली आणि माझ्या नवऱ्याने त्याच्या आई-वडिलांना सांगितले तेव्हा पहिले तीन महिने तर सगळं व्यवस्थित झाल्यासारखे वाटत होते....
एक दिवस माझा नवरा मला चेकअप साठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि माझे चेक अप करण्यात आले.... मला वाटले रेग्युलर चेकअप साठी आणले असेल परंतु जेव्हा मला समजले की, त्यांनी माझ्या पोटातलं बाळ मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला आहे, तेव्हा मात्र मला खूपच भीती वाटू लागली.... रिपोर्ट पाहून समजले की माझ्या पोटात मुलगी आहे तसे लगेच माझ्या सासर च्या माणसांचा छळ पुन्हा एकदा चालू झाला....
एक दिवस तर अमितने माझ्या अशा अवस्थेतही माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असताना त्याने माझ्या पोटावर जोरात लाथ मारली... त्याच्यामुळेच मला त्रास झाला आणि माझं बाळही गेले..... त्यादिवशी मात्र मला समजले की, या घरात माझी कोणालाही काही किंमत नाही आणि मी या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला....
चार दिवसानंतर जेव्हा मला थोडं बरं वाटत होते... तेव्हा रात्री सगळे झोपल्यावर मी हळूच घराचा दरवाजा उघडून बाहेर पडून आले...... रस्ता मिळेल तशी पुढे पुढे चालत होते... काय करू, कुठे जाऊ याबद्दल काहीही कल्पना नव्हती... या जगात आपले कोणीही नाही हेच फक्त मनात घुमत होते... माझं बाळ गेल्याचे दुःख माझ्या मनाला खात होते.... मी तेव्हाच जर काही पाऊल उचलल असत तर आज माझ बाळ माझ्याजवळ असतं , असा विचार मनामध्ये येऊन मनाला असंख्य वेदना होत होत्या....
या दुःखामध्येच समोर दिसणाऱ्या नदीच्या प्रवाहामध्ये उडी मारून स्वतःच्या जीव देण्याचा मी विचार केला आणि त्या दिशेने चालत ही होते.... मी जवळ जाऊन त्या नदीच्या प्रवाहात उडी मारणार इतक्यात यांनी माझा हात धरून मला मागे खेचले आणि मला जीव देण्यापासून वाचवले....
.
..
...
To be continued....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा