Login

लग्न – एक छलावा भाग ७७

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गूढ रहस्य
" कदाचित समोर आलाही असेल परंतु तुमच्या मैत्रिणीनेच अजून त्याच्याकडे लक्ष दिले नसेल तर... " तिचं बोलणं ऐकून पटकन मिस्टर विश्वास बोलून मोकळे होतात... त्यांचं बोलणं ऐकून मेघा आणि भार्गवी दोघी पण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागतात....

आत्ता पुढें,

भार्गवी तिच्या मनामध्ये मिस्टर विश्वास यांच्या बोलण्याचा विचार करू लागते... त्यांच्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द तिच्या हृदयात घर करू लागतात... ' आपण यांना या आधीही कुठेतरी पाहिल्यासारखे तिला वाटू लागते परंतु नक्की कुठे पाहिले हेच तिला आठवत नाही... ' त्यानंतर त्या दोघी ही शांत झालेल्या असतात... मिस्टर विश्वास ही शांतपणे गाडी चालवतात... काही वेळातच ते मेघाच्या घराच्या जवळ पोहोचलेले असतात...

" भार्गवी तुला आता खंबीर व्हायला पाहिजे... उद्या कोर्टामध्ये ही अशीच हिम्मत दाखव आणि त्या लोकांना चांगली अद्दल घडव... " मेघा गाडीमधून खाली उतरून बाहेरगावीकडे पाहून तिला समजावते....

" हो मेघा, आता माझ्या मनाचा निर्णय झाला आहे , आता मी मागे हटणार नाही... तसेही तुम्ही सगळे आहेत ना माझ्यासोबत... " भार्गवी एक नजर मिस्टर विश्वास यांच्याकडे पाहून मेघा ला बोलते...

" आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत आणि यापुढे कायम असणार आहे... चला मी निघते... Thank you विश्वास जी... " मेघा एक नजर विश्वास यांच्याकडे पाहून त्यांना बोलते...

" विश्वास जी, हे थोडा अनोळखी वाटत आहे त्यापेक्षा तू सरळ दादा बोल ना... या शब्दात आपलेपणा जाणवतो... " विश्वास हसतमुखाने तिच्याकडे पाहून तिला बोलतात...

" हो दादा... " मेघा हसून उत्तर देते आणि त्यां दोघांना बाय करून निघून जाते... विश्वास गाडी चालू करतात आणि पुढच्या काही वेळात असते दोघेपण विश्वास यांच्या घरी पोहोचलेले असतात.... घरी आजी त्या दोघांची आतुरतेने वाट पाहत असतात... घरी आल्यावर भार्गवी आजीला तिकडे घडलेली सगळी गोष्ट सांगते... आजीलाही भार्गवीच्या या निर्णयाचे कौतुक वाटते.....

दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये पुन्हा एकदा ती केस उभी राहते... यावेळी भार्गवीच्या बाजूने सगळेजण कोर्टामध्ये हजर असतात... मिस्टर विश्वास यांनी या केससाठी त्यांच्या विश्वासातला आणि जवळचा असा एक नामांकित वकील निवडलेला असतो.... त्या वकिलाला ते आपला मुद्दा आणि भार्गवी बद्दल व्यवस्थित समजावून सांगतात....

कोर्टामध्ये धर्मेश , रोहन , अरुण ,योगेश या चौघांसोबत त्यांच्या इतर माणसांनाही कोठरी मध्ये उभ केले जाते.... दोन्ही पक्षाचे वकील एकमेकांवर आरोप लावण्याचे काम करत असतात...

जेव्हा भार्गवीला आपली बाजू सत्या करण्यासाठी पुढे बोलवले जाते तेव्हा मात्र भाडखावी यावेळी घाबरता आपल्या सोबत सुरुवातीपासून काय झाले आणि कसे झाले हे सगळं कोर्टाला सांगू लागते... तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी तिच्या ऑफिस मधला सगळा स्टाफ , तिचे स्वतःचे निकम सर , तिची मैत्रीण मेघा आणि असे अनेक लोक तिच्या बाजूने कोर्टामध्ये साक्ष देतात....

धर्मेश कोर्टामध्ये असतानाही तिला आपले खोटं प्रेम दाखवून आपल्या बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु यावेळी मात्र ती त्याच्या बोलण्यामध्ये अडकत नाही...

पोलीस अधिकारीही तिला पोलिसांच्या तावडीतून कसे पळवण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यासोबत काय काय झाले हे सगळं कोर्टामध्ये सांगत त्याबद्दल त्यांच्या जवळ असलेले पुरावे ही कोर्टामध्ये सादर करतात.... मुख्य अधिकारी आणि विश्वास फॉरेनसिक लॅब मध्ये काम करणाऱ्या माणसालाही भार्गवीचा लॅपटॉप चोरीला गेल्याबद्दल कोर्टात पुराव्याच्या बाजूने हजर करतात... तेव्हा तो अरुण आणि योगेश त्याच्याजवळ येऊन त्याला पैशाचा अमिष दाखवून भार्गवी चा लॅपटॉप घेऊन गेले होते हे सगळं कोर्टामध्ये सांगतो....

धर्मेश आणि रोहन या लोकांनी वापरलेले भार्गवीने पळून घेऊन आलेला लॅपटॉप , त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणावरून मिळालेल्या वस्तू , तिकडे असलेला त्यांचा कम्प्युटर आणि त्यामध्ये असलेली सगळी माहिती हे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेली असते ते सगळं पुराव्या म्हणून पोलीस आज कोर्टामध्ये हजार करतात...

कोर्ट सुटण्याची वेळ होते त्यामुळे निकाल पुढच्या हप्त्यावर ढकलला जातो... या सगळ्यामुळे विश्वासाने मुख्याधिकारी यांचे निराशा होते त्यांना लवकरात लवकर निकाल पाहिजे असतो... तरीही ते कोर्टाची ऑर्डर शांतपणे मान्य करतात...

या दरम्यान भार्गवी आपल्या आज्जी सोबत मिस्टर विश्वास यांच्या घरात राहत असते... तिच्या आज्जी ला मिस्टर विश्वास यांचे तिच्यावर असलेले प्रेम आणि त्यांची जुनी ओळख भार्गवी ला सांगायची असते परंतु आदिती या सगळ्या गोष्टी मधून मुक्त झाल्यावर आपण तिला या सगळ्याबद्दल सांगूया असा निर्णय त्यांनी घेतलेला असतो...

मेघा अजून मधून मिस्टर विश्वास यांच्या घरी येऊन तिला भेटत असते जेणेकरून तिचं मन शांत व्हावं आणि पूर्वीसारखी भार्गवी पुन्हा एकदा हसत खेळत राहावे असे मिस्टर विश्वास यांना वाटत असते त्यामुळे ते त्यांच्या परीने शक्यतो प्रयत्न करत असतात....

निकम सर भार्गवीला ऑफिस ला बोलवतात... तेव्हा मिस्टर विश्वास दिला स्वतः ऑफिसमध्ये घेऊन जातात... जोपर्यंत या केस चा निकाल लागत नाही तोपर्यंत ते तिच्यासोबतच असतात तिला कुठेही एकटा पाठवत नाही.... हे दोघेपण ऑफिसमध्ये आल्यावर भार्गवीचे ऑफिसमध्ये छान पैकी स्वागत केले जाते...

" या आपण केबिनमध्ये बसून बोलूया.... " निकम सारख्या दोघांकडे पाहून त्यांना बोलतात... तसे मिस्टर विश्वासने भार्गवी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसतात....

" सॉरी भार्गवी, जेव्हा तुला आमची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा आम्ही कोणीही तुझ्या बाजूने उभे राहिला तिकडे कोर्टामध्ये हजर राहिलो नाही... " निकम सर भार्गवी कडे पाहून ची माफी मागतात....

" इट्स ओके सर... जुन्या गोष्टी उकरून काढून आता काही अर्थ नाही... माझ्या मनामध्ये तुमच्या सगळ्यांबद्दल काही वाईट विचार नाही... " भार्गवी त्यांच्याकडे पाहून समजावण्याच्या स्वरात बोलते....

" तू पहिल्यापासूनच निर्मळ मनाची आहेस त्यामुळे तुला काही वाटत नाही परंतु मला खरंच या सगळ्याबद्दल खूप गिल्ट वाटत आहे... त्यावेळी पण आम्हा सगळ्यांना तुझी मदत करायची होती... आम्ही सगळे पोलीस स्टेशनला येण्यासाठी , कोर्टात येण्यासाठी ही तयार होतो परंतु तेव्हा धर्मेश इकडे ऑफिसमध्ये आला आणि त्यांनीच आम्हाला तिकडे येण्यासाठी मनाई केली...

तेव्हा त्याचं बोलणं, त्याचं वागणं आपल्या सगळ्यांनाच योग्य वाटत होतं म्हणून तो जे काही सांगत आहे ते बरोबर असेल , असा विचार करून आम्ही सगळे शांत झालो... आम्ही पण त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास केला... माझ्या कंपनीचा जो काही प्रॉब्लेम झाला होता तो त्याने आणि रोहनने मिळून केला होता, ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा माझ्या पायाखालची जमिनीत सरकली होती.... ज्या व्यक्तीने मला त्रास देण्याचा, माझ नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता, मी त्याच व्यक्तीची साथ दिली आणि ज्या व्यक्तीने मी संकटात असताना मला त्या संकटांमधून बाहेर काढले माझे साम्राज्य परत उभ करण्यामध्ये माझी मदत केली मी त्या व्यक्तीची मदत करू शकलो नाही ही गोष्ट सतत माझ्या मनाला खलत राहणार... " निकम सर शर्मिने आपली नजर खाली करून बोलू लागतात....

" सर प्लीज ! तुम्ही उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नका ... या सगळ्यांमध्ये तुमच्या सगळ्यांची काही चुकत नव्हती... ते धर्मेश जे काही सांगत गेला आपण डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवत गेलो ... सर तुम्हीच काय मी स्वतःही त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणून तर एवढ्या मोठ्या संकटात सापडले ना, पण आता सगळं ठीक झाला आहे.... आता तुम्ही सगळ्यांनी माझी साथ दिली आहे..... मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांचं बोलणं आणि ते सगळे पुरावे बघून कोर्ट त्याच्या विरोधातच निकाल देईल... " भार्गवी तरीही शांत शब्दांमध्ये त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते.....


" ते तर होईलच त्या दुष्ट माणसांना कोर्टाने खूप भयानक शिक्षा सुनावली पाहिजे.... असो, भार्गवी मी तुला थोडा वेगळ्या कामासाठी इकडे बोलावले होते... " निकम सर स्वतःला शांत करा त्याच्याकडे पाहून तिला बोलतात...

" कोणत्या कामासाठी ? " भार्गवी प्रश्नार्थक नजर ने त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते...

" भार्गवी माझ्या या ऑफिसमध्ये जी तुझी पोझिशन होती ती अजून तशीच आहे.... त्या पोझिशन साठी मला तुझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही व्यक्ती बरोबर वाटत नाही... हे कोर्ट कचेरी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतर तू पुन्हा एकदा आपलं हे ऑफिस जॉईन करशील का ? मला माझी हुशार एम्पलोयी माझ्या ऑफिसमध्ये परत पाहिजे आहे.... " निकम सर आशेने तिच्याकडे पाहून तिला विचारतात.... त्यांचं बोलणं ऐकून भार्गवी काही क्षणासाठी एक शांत होते.... काय उत्तर देऊ हे तुला समजत नाही... मिस्टर विश्वास शांतपणे तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत असतात....

" ही तर खूप चांगली गोष्ट आहे... तुमचे हुशार एम्पलोयी तुमचा ऑफिस नक्कीच परत जॉईन करेल.... या सगळ्या गोष्टीचा निकाल लागल्यावर तिलाही तिचं लाईफ नव्याने सुरू करायचा असेल ना.... आपल्या माणसांमध्ये आल्यावर तिलाही बरं वाटेल...... कोणाच्या जाण्याने आपलं आयुष्य थांबत नाही आपल्याला आयुष्यात पुढे पुढे जावंच लागते... या केस चा निकाल लागल्यावर तिच्या बाजूने सगळं व्यवस्थित झाल्यावर ती हे ऑफिस जॉईन करेल आणि रेग्युलर इकडे यायला सुरुवात करेल हा मी शब्द देतो.... " मिस्टर विश्वास एक नजर तिच्याकडे पाहून स्वतःच बोलून मोकळे होतात... त्यांचं बोलणं ऐकून मात्र भार्गवी शांतपणे त्यांच्याकडे पाहू लागते....