सगळे घाबरलेल्या नजरेनेच त्याच्याकडे पाहू लागतात.... काही क्षणासाठी तिकडचे वातावरण, सगळी माणसं, थोड्या वेळापूर्वी चाललेला सगळा गोंधळ शांत झालेला असतो..... गोळीच्या आवाजाने सगळे घाबरूनच त्या दिशेला पाहू लागतात... धर्मेश मात्र विचित्रपणे हसत असतो...
आत्ता पुढें,
धर्मेश विचित्रपणे हसतच मागे वळून पाहतो तर रोहन त्याच्या दिशेने बंदूक रोखून उभा असतो... धर्मेश ने भार्गवीवर आपल्या हातात असलेली बंदूक रोखलेली असते तो तिला मारण्यापूर्वी आपला राग तिच्यावर काढू लागतो... तू बोलत असतानाच त्याची बोट बंदुकीवर चालणार त्याच्या आधीच रोहन त्याच्याजवळ उभ्या असलेल्या पोलीस ऑफिसर च्या हातातली बंदूक हिसकावून घेतो आणि कोणालाही काही समजायच्या आत धर्मेश वर गोळी झाडतो....
धर्मेश आणि रोहन दोघांमध्येही फक्त काही फुटाचे अंतर असल्यामुळे रोहनचा निशाणा थेट त्याच्या पाठीवर रोखलेला असतो... बंदुकीची गोळी त्याच्या पाठीतून शिरून छातीतून बाहेर पडते आणि छातीतून रक्त व्हायला सुरुवात होते... या सगळ्या गोष्टी इतक्या जलद गतीने झालेले असतात की कोणालाही काही समजायच्या आत धर्मेश मागे वळून रोहन कडे बघतच विचित्रपणे हसत खाली जमिनीवर कोसळलेला असतो...
" रोहन , तू हे बरोबर केलं नाहीस... " धर्मेश आपल्या छातीवर हात ठेवूनच रोहन कडे पाहून बोलतो...
" बस कर यार धर्मेश... अजून किती त्रास देणार होतास तू भार्गवीला.... मी मान्य करतो की गेल्या काही वर्षापासून आपण एकत्रच काम करत आहे आणि असे भरपूर लोकांना आपण त्रास दिलेला आहे, पण जेव्हा माझी भार्गवी सोबत फ्रेंडशिप झाली होती तेव्हा ती खरच खूप चांगली मैत्रीण आहे असे जाणवले... आपल्या धंद्याचा नियम मला मोडता आला नाही म्हणूनच मी तुमची बाजू घेतली... आज पर्यंत मी तुमची साथ देत होतो, पण आता तर आपल्याला सजा मिळाली आहे , आपल्यावरचा गुन्हा सिद्ध झाला आहे , तिने या सगळ्या गोष्टींमधून स्वतःचे रक्षण केले आहे... तरीही आता तिला त्रास देण्यात काय अर्थ आहे... आता तरी तिला सुखाने जगू दे... " रोहन उदास भावनेने त्याच्याकडे पाहून बोलू लागतो....
" धंद्यामध्ये मैत्री नाही.... " असे शेवटचे शब्द बोलतच धर्मेश आपले प्राण सोडतो.... पोलीस रोहन च्या हातात असलेली बंदूक आपल्या हातात घेतात आणि दोन्ही बाजूने त्याला पकडून ठेवतात.... मेघा आणि भार्गवी मात्र अजूनही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतात...
" इतके दिवस मैत्रीच्या नावाने मी तुमच्या दोघींच्याही विश्वासाचा घातच करत होतो... आज एक संधी मिळाली मला माझी मैत्री सिद्ध करण्याची, तर ती संधी सोडण्याची इच्छा झाली नाही... तुम्ही मला माफ करावा किंवा माझ्याबद्दल काही विचार करावा यासाठी मी हे अजिबात केलं नाही... कुठेतरी माझ्याही मनात तुम्ही दोघींनी मैत्रीची भावना निर्माण केली होती जी आज बाहेर पडली... यापुढे तुमच्या दोघांनाही कोणाचा त्रास होणार नाही नव्याने आयुष्य सुरू करा... " रोहन त्या दोघींकडे पाहून बोलतच समोर असलेल्या गाडीमध्ये जाऊन बसतो....
भार्गवी शांत चेहऱ्याने त्याच्याकडे पाहतच एक नजर खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धर्मेश कडे पाहू लागते.... तिच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू वाहू लागतात... कसाबसा ती स्वतःचा हुंदका आवरण्याचा प्रयत्न करते... धर्मेश ने जरी तिच्यावर प्रेम केले नसेल तरी तिने मनापासून त्याच्यावर प्रेम केले होते... त्याच्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी होती आणि आज आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती अशी रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडलेली पाहून तिच्या मनाला असंख्य वेदना होत होत्या.....
मिस्टर विश्वास यांनाही तिच्या मनाची अवस्था संतत होती त्यामुळे त्यांनी तिच्या खांद्यावर हलकाच हात ठेवून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला..... तिकडे ॲम्बुलन्स आली आणि त्यातल्या लोकांनी धर्मेशचे शेव ॲम्बुलन्स मध्ये ठेवून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.....
मिस्टर विश्वास यांनी भार्गवीला शांतपणे गाडीमध्ये बसवले सगळेजण शांतपणे आपापल्या गाडीत बसले आणि त्यांनी आपापल्या वाटा पकडल्या..... भार्गवी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी आम्ही तरीही ती शांतच होती....
" काय झालं भार्गवी ? केस चा निकाल आपल्याच बाजूने लागला ना... मला विश्वास होता, जोपर्यंत मिस्टर विश्वास तुझ्यासोबत आहे तोपर्यंत विजय तुझाच होणार... " आजी तिच्याकडे पाहून सौम्य शब्दात बोलतात...
" आज्जी..... " आपल्या आजीला आपल्यासमोर पाहून मात्र भार्गवीच्या भावना अनावर झाल्या आणि ती पटकन आपल्या आजीच्या गळ्यात पडून जोरजोरात हुंडके देत रडू लागली.... तिची ती अवस्था पाहून आजीने तिला सावरण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः मात्र घाबरलेल्या नजरेने मिस्टर विश्वास यांच्याकडे पाहत होत्या....
" धर्मेश.. " असे बोलून मिस्टर विश्वास फक्त नकारार्थी मान हलवतात त्यांच्या त्या चेहऱ्यावरूनच आजीला काय समजायचे ते समजून जाते... आजी तिला आपल्या खोलीमध्ये घेऊन जातात..... आजीच्या मांडीवर डोकं ठेवून भार्गवी मनसोक्त रडू लागते...
" भार्गवी ज्या नात्यांमध्ये कधी प्रेमच नव्हते त्या नात्यासाठी स्वतःला एवढा त्रास करून घेण्यामध्ये काय अर्थ आहे ? जे घडायचं होतं ते घडून गेलं आपण आधीच ठरवलं होतं ना नव्याने सुरुवात करायची म्हणून... " आजी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावण्याच्या स्वरात बोलतात...
" मला मान्य आहे आजी पण काय करू, त्याने मला त्रास दिला होता पण मी तर त्याच्या वर मनापासून प्रेम केले होते ना... " भार्गवी आपल्या मनातली भावना आजीला सांगू लागते.... तिचं बोलणं ऐकून मिस्तरी विश्वास जे दरवाज्याच्या उभे असतात त्यांनाही वाईट वाटते.... तो दिवस तसाच शांततेत जातो...
पुढचे काही दिवस असेच निघून जातात... सगळे मिळून भार्गवीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात आता ती बऱ्यापैकी सावरलेली असते.... एक दिवस असेच मिस्टर विश्वास आपल्या कामासाठी घरातून बाहेर पडलेले असतात आणि भार्गवी आजी सोबत एकटीच घरात बसलेली असते...
पुढचे काही दिवस असेच निघून जातात... सगळे मिळून भार्गवीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात आता ती बऱ्यापैकी सावरलेली असते.... एक दिवस असेच मिस्टर विश्वास आपल्या कामासाठी घरातून बाहेर पडलेले असतात आणि भार्गवी आजी सोबत एकटीच घरात बसलेली असते...
" आजी मला निकम सरांनी परत ऑफिस जॉईन करण्यासाठी विचारले आहे... खर तर मला परत त्या ऑफिसमध्ये जाण्याची इच्छा नाही पण सध्या तरी माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही..... आपण असे किती दिवस मिस्टर विश्वास यांच्या घरात राहणार आहोत... त्यांच्यावर किती दिवस आपण आपले ओझं लागणार आहोत... त्यासाठी काही बोलत नसले तरी आपल्याला या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे ना... मला असे वाटते की आता आपण त्यांना सांगावे आणि त्यांच्या घरातून निघून जावे... " भार्गवी शांतपणे आजीकडे पाहून आपल्या मनातली भावना सांगू लागते....
" तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे , पण मला सांग इकडून निघून आपण कुठे जाणार आहोत ? जे तुझा स्वतःचं घर होतं ते तर नीलामी मध्ये विकलं गेलं... आता आपल्याकडे कसला आसरा आहे ? " आज्जी शांतपणे तिच्याकडे पाहून तिला विचारतात....
" आज्जी, मला असे वाटते की मी एकदा निकम सरांना जाऊन भेटावे आणि त्यांच्याकडून काही पैसे ऍडव्हान्स मध्ये उचलावे त्यातून आपण एका घर भाड्याने घेऊन तिकडे स्वतःचे सामान घेऊन जाऊ.... मला खरंच आता इकडे राहायला कसे तरी वाटत आहे... मिस्टर विश्वास यांनी मला वाचवण्यासाठी खूप काही केले त्यांचे उपकार कसे फेड होते समजत नाही आता अजूनही ते काही बोलत नाही म्हणून किती दिवस आपण त्यांच्या घरी असे पडून राहणार आहोत ? " भार्गवी विश्वास यांचा विचार करत बोलते...
" भार्गवी त्यांनी आपल्याला इकडे राहायला जागा दिली आहे आणि ते आपल्याला काहीही बोलत नाही याच्यामागे खूप मोठे कारण आहे.... " आजी शेवटी मनातून तिला सगळी गोष्ट सांगण्याचा निर्णय घेते...
" कसले कारण ? " भार्गवी प्रश्नार्थक नजरेने आजीकडे पाहून तिला विचारते...
" भार्गवी तू अजूनही मिस्टर विश्वास यांना नीट ओळखले नाही... ते एकेकाळी तुझ्या कॉलेजमध्ये तुझ्या सोबतच शिकत होते... ते तेव्हापासूनच तुला ओळखतात आणि फक्त ओळखत नाही तर कॉलेजमध्ये असल्यापासूनच तुझ्यावर मनापासून प्रेम करतात... तुला आठवते का एक दिवस तू तुझा एक प्रोजेक्ट विसरली होती तर तुला सापडत नव्हता तेव्हा तुला लायब्ररीमध्ये सेम तसाच नवीन प्रोजेक्ट सापडला तर तो तुझ्या नावाने कॉलेजमध्ये सबमिट केला... तो प्रोजेक्ट मिस्टर विश्वास यांनीच तुला दुःखात पाहून पटकन बनवून दिला होता.... त्यांच्या त्या प्रेमाच्या सगळ्या आठवणी त्यांनी मला दाखवल्या आहेत ,एक मिनिट थांब... " असे बोलून आज्जी तिला आपल्या सोबत घेऊन जातात आणि त्यांनी ज्या कपाटामध्ये त्यांच्या आठवणी जपुन ठेवलेल्या असतात, ते कपाट उघडून त्या सगळ्या आठवणी बाहेर काढून भार्गवी ला दाखवू लागतात.....
कॉलेजमध्ये असतानाचे आपले ते जुने फोटो , त्या प्रोजेक्ट बद्दलची माहिती , मिस्टर विश्वास यांच्या डायरीमध्ये असलेले भार्गवीचे वर्णन... भार्गवी या सगळ्या गोष्टी एकेक करून पाहू लागते.... त्यांची डायरी वाचताना मात्र तिला आश्चर्याचा धक्का बसतो.... कॉलेजमध्ये असताना तिच्या ग्रुप सोबतचे, तिचे स्वतःचे असे कितीतरी वेगवेगळे पोझ मधले , वेगवेगळ्या ड्रेस मधले फोटोज त्या अल्बम मध्ये असतात.... भार्गवी आश्चर्याने पुन्हा पुन्हा तो अल्बम आणि त्यांची ती डायरी सारखी उघडून पाहू लागते..... या सगळ्या गोष्टी पाहून तिला काय रिऍक्ट व्हावे तेच समजत नसते... आजी मात्र शांतपणे त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत असतात....
.
..
...
To be continued....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा