Login

लग्न – एक छलावा भाग ८०

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
कॉलेजमध्ये असतानाचे आपले ते जुने फोटो , त्या प्रोजेक्ट बद्दलची माहिती , मिस्टर विश्वास यांच्या डायरीमध्ये असलेले भार्गवीचे वर्णन... भार्गवी या सगळ्या गोष्टी एकेक करून पाहू लागते.... त्यांची डायरी वाचताना मात्र तिला आश्चर्याचा धक्का बसतो.... कॉलेजमध्ये असताना तिच्या ग्रुप सोबतचे, तिचे स्वतःचे असे कितीतरी वेगवेगळे पोझ मधले , वेगवेगळ्या ड्रेस मधले फोटोज त्या अल्बम मध्ये असतात.... भार्गवी आश्चर्याने पुन्हा पुन्हा तो अल्बम आणि त्यांची ती डायरी सारखी उघडून पाहू लागते..... या सगळ्या गोष्टी पाहून तिला काय रिऍक्ट व्हावे तेच समजत नसते... आजी मात्र शांतपणे त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत असतात....

आत्ता पुढें,

" काय झालं भार्गवी ? तू काही बोलत का नाही ? " आजी शांतपणे तिच्याकडे पाहून तिला विचारतात...

" हे सगळं पाहून खरं तर मी काय बोलावे तेच मला समजत नाही आहे... " भार्गवी आश्चर्याने आजीकडे पाहून उत्तर देते...

" का नाही समजत आहे... तुझ्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करावे , तुझ्या विचारांचा तुझ्या स्वप्नांचा आदर करावा, तुझ्या प्रेमाला महत्त्व द्यावे, असाच लाईफ पार्टनर तू शोधत होतीस ना... आता चढतो तुझ्यासमोर आहे तर मग तू का अशी गोंधळल्यासारखी वागत आहेस... " आजी शांतपणे तिच्याकडे पाहून तिला प्रश्न विचारतात...

" आजी माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे ना ते सगळं पाहून आता कोणावर विश्वास ठेवण्याची हिंमत होत नाही आहे... मी मनापासून ज्या व्यक्तीवर प्रेम केले होते त्याने माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात केला, शिवाय  त्याला मी माझ्या डोळ्यासमोर जीव सोडताना पाहिले....  त्याची ती अवस्था पाहून खूप वाईट वाटले.....  कसाही असला तरी नवरा होता माझा आणि आता मी विधवा आहे त्याची...

मिस्टर विश्वास हे खरंच खूप चांगला विचाराचे आणि समजदार  इसम आहेत.... त्यांनी माझ्यासाठी जे काही केले हे मी कधीच विसरू शकत नाही... ज्या मुलीच्या आयुष्यात त्यांच्यासारखी व्यक्ती येईल ती मुलगी खरं तर नशीबवान असेल ,  कारण ते आपल्या बायकोला आयुष्यभर सुखात ठेवतील , तिच्या विचारांचा आदर करतील , तिच्यासाठी सगळं करण्याची तयारी दाखवतील.....  " भार्गवी त्यांचा विचार करत बोलत असते...


" भार्गवी तू दुसऱ्या कोणत्या मुलीचा विचार करू नको तू तुझ्याबद्दल सांग... त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे... तुझ्या मनामध्ये काय आहे ते मला ऐकायचा आहे... " आजी शांतपणे तिला विचारते...

" आजी तू असे का विचारत आहेस ? तू एकदा त्यांच्या बाजूने विचार कर... त्यांचे अजून लग्न झालेले नाही शिवाय त्यांचं घर त्यांची संस्कृती पाहून ते खूपच मोठ्या घराण्यातले वाटतात... सध्या ते आपल्या फॅमिली पासून वेगळे इकडे एकटे राहत असले तरीही त्यांचे हे किती मोठं घर आहे... मी त्यांच्याबद्दल असा काही विचारच करू शकत नाही कारण मी त्यांच्या लायक नाही... " भार्गवी नाराजीच्या स्वरात बोलू लागते....

" आणि हे कोणी ठरवले आहे की,  तू माझ्या लायक आहेस की नाही... मुळात लायक असणे म्हणजे नक्की काय असणे मला सांगशील का ? " मिस्टर विश्वास यांनी नुकतेच घरामध्ये पाऊल टाकलेले असते तेव्हा त्यांच्या कानावर भार्गवीची शब्द पडतात हे पाहून ते तिच्या दिशेने पुढे येत तिला विचारतात...

त्यांना अचानक असे समोर आलेले पाहून भार्गवी गोंधळून जाते आणि तिला काय बोलावे ते सुचत नाही... आजी पण त्यांना समोर पाहून थोडा वेळासाठी गडबडून जातो... त्यांचे अल्बम जुनी आठवणी सगळ्याच समोर ठेवलेले असतात त्यांना न विचारता आपण असे त्यांचे सामान बाहेर काढले या गोष्टीचा त्यांना राग तर येणार नाही ना असा विचार आजींच्या मनात चालू असतो...

" सॉरी बाळा, तुझ्या वस्तूंना मी तुला न विचारता हात लावला ते बाहेर काढून भार्गवीला दाखवले खरच सॉरी, पण काय करू तिचीही अवस्था पाहून माझा जीव तीळ तीळ तुटतो... आयुष्यात तिने आता पुढे जायला पाहिजे असेच मला वाटत होते आणि त्यामुळे त्या दिशेने पुढे चालण्यासाठी मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते.... " आजी त्याच्याकडे पाहून त्याची माफी मागतात...

" आजी प्लीज!  तुम्ही अशी माफी मागू नका... तुम्ही जे काय केलं ते आमच्या दोघांचा विचार करूनच केले आहे त्यामुळे तुम्हाला असे माफी मागण्याची गरज नाही , पण भार्गवीच्या मनातले विचार ऐकून मात्र मला खूप वाईट वाटले... तिचे विचार ऐकण्यासाठीच मी तिला प्रश्न विचारला आहे आणि तिच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे.... " ते भार्गवी कडे पाहून सरळ तिच्या समोर उभारात तिच्या डोळ्यात आरपार पाहत तिला विचारतात...

" मिस्टर विश्वास तुम्हाला तर माहीतच आहे,  माझे आधीच लग्न झाले आहे ते आणि ज्याच्या सोबत झाले होते तो आता या जगात नाही... तरीही कायद्याने मी त्याची विधवा आहे... कदाचित हे माझंच पूर्व जन्माचे भोग असतील जे माझ्या नशिबी अशा रूपाने आले आहे ते... माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात काही वाईट होऊ नये एवढीच इच्छा आहे... तुम्ही खूप चांगले आहात , तुम्हाला कोणतीही चांगली मुलगी जीवन संगिनी म्हणून भेटू शकते... मग तुम्ही माझ्यासारख्या विधवा सोबत का लग्न करावे... मी तुमच्या लायक नाही... " भार्गवी बोलत असताना तिच्या मनाला खूपच त्रास होत असतो ती आपली नजर खाली ठेवूनच कसं बस बोलण्याचा प्रयत्न करू लागते बोलतानाही तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात... तिचे शब्द तीरासारखे तिच्या हृदयाला घाव करू लागतात...

" भार्गवी पहिला तर तू माझ्या लायक नाहीस ही गोष्ट मनातून काढून टाक... जे काही घडलं त्यामध्ये तुझ्या काही दोष नव्हता... नेहमी प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्हच विचार केला पाहिजे असे का , कधीतरी या घडून गेलेल्या गोष्टीचा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून पहा...

जर धर्मेश तुझ्यासोबत वाईट वागलाच नसता तर तुमच्या संसारामध्ये काही अडचण आली नसती पण त्याच्या मनात काहीतरी वेगळे होते, त्याने तुला ज्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा एकमेकांच्या समोरासमोर आलो.....

कदाचित देवाला माझी इच्छा पूर्ण करायची असेल, माझे पहिले प्रेम माझ्या नशिबात देण्यासाठी त्याने एवढ्या सगळ्या गोष्टी घडवले असतील जेणेकरून याच्या निमित्ताने का होईना पण आपण एकमेकांना भेटलो , तुझ्या आयुष्याबद्दल मला समजले आणि तुला त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग मी शोधू लागलो.... या सगळ्या दलदली मधून तुला सुखरूप पणे बाहेर घेऊन येणे हीच माझी जबाबदारी मला वाटत होती आणि ती पार पाडण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो...

बोलतात ना, प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी जेव्हा आपल्या सोबत होत असते तेव्हा ती खूप सुंदर वाटत असते परंतु जेव्हा प्रेम निभावण्याची वेळ येते तेव्हा तू माणूस आपल्या प्रेमासाठी किती काय करू शकतो याचीही देव परीक्षा पाहत असतो... आज मी जे काही केले ते माझ्या प्रेमाला सगळ्या संकटातून सोडवण्यासाठी केले... हे सगळं करताना मी तुझ्यावर उपकार केले नाही तर मी स्वतःच्या प्रेमाला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्लीज यापुढे चुकूनही असे बोलू नकोस की , तुझी माझ्या लायक नाहीस... कारण तुझ्याशिवाय मी तर दुसऱ्या कोणत्याही मुलीचा माझ्या आयुष्यात विचारही करू शकत नाही...

मी लग्न करेल तर फक्त तुझ्याशी नाही तर आयुष्यभर लग्न करणार नाही... आता निर्णय तुझा आहे तुला हवा तेवढा वेळ घे आणि मला उत्तर दे मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे... " मिस्टर विश्वास शांतपणे तिच्याकडे पाहून बोलून आपल्या बेडरूमच्या दिशेने निघून जातात...

" आता तरी समजले ना त्यांचे अजूनही तुझ्यावर किती प्रेम आहे ते तेव्हा आता स्वतःला दोष देणं कमी कर आणि त्यांच्या प्रेमाचा विचार कर.... आयुष्यात जे घडून गेले आहे त्याबद्दल खंत करत बसण्यापेक्षा आयुष्यात येणाऱ्या नवीन स्वप्नांना पंख दे म्हणजे आयुष्य सुंदर होईल.... " आजी तिच्याकडे पाहून समजावण्याच्या स्वरात बोलतात आणि तिला तिचा वेळ मिळावा म्हणून तिकडून निघून जातात....

भार्गवी पुन्हा एकदा समोर असलेले अल्बम आणि ती डायरी आपल्या हातात घेऊन तिकडेच असलेल्या सोफ्यावर बसते.... अल्बम मध्ये असलेले स्वतःचेच फोटो पाहत की मिस्टर विश्वास यांच्या बोलण्याचा विचार करू लागते.... त्यांच्या डायरीमध्ये लिहिलेल्या शब्दांपेक्षा त्यांनी आता स्वतः बोलून दाखवलेल्या शब्दांचा तिच्या हृदयावर जास्त असर होऊ लागतो....

’मी लग्न करेल तर फक्त तुझ्याशी नाही तर आयुष्यभर लग्न करणार नाही... ’ मिस्टर विश्वास यांनी बोललेलं हे वाक्य तिला असं ऐकू येऊ लागतं आणि ती त्यांच्या या वाक्याचा मनापासून विचार करू लागते....

’ मिस्टर विश्वास हे माणूस म्हणून तर समजूतदार आहे पण त्यांचं प्रेमही तितकच निर्मळ आहे... कोणी कोणावर इतकं कसं काय प्रेम करू शकतो ? जे प्रेम मी माझ्यासाठी धर्मेश मध्ये नेहमी शोधण्याचा प्रयत्न केला तेच प्रेम मला आता विश्वास यांच्या डोळ्यात, त्यांच्या बोलण्यात , त्यांच्या प्रत्येक कृती मधून दिसून येत आहे.... ’ भार्गवी शांत बसलेली तर असते पण तिचे मन मात्र मिस्टर विश्वास यांचाच विचार करत असते....

.


..


...


To be continued.....


*******************************
( कथा आवडत असल्यास कॉमेंट्स आणि स्टिकर्स द्यायला विसरू नका.... )

🎭 Series Post

View all